Headlines

बीएमसीसी, दगडूशेठ ट्रस्टमध्ये अथर्वशीर्ष पठण अभ्यासक्रमासाठी सामंजस्य करार:राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत भारतीय ज्ञान परंपरेला अनुसरून अभ्यासक्रमाची निर्मिती

बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी) आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांच्यात अथर्वशीर्ष पठण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. बीएमसीसी येथे हा करार तीन वर्षांसाठी करण्यात आला. या उपक्रमाद्वारे आध्यात्मिक, सामाजिक आणि साहित्यिक ज्ञानाचा डिजिटल माध्यमातून प्रसार करण्यावर भर दिला जाईल, तसेच गाणपत्य तत्त्वज्ञानाचा अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रचार केला जाईल. या सामंजस्य…

Read More

पॅपाराझींवर भडकली करीना कपूर:वारंवार उजवीकडे-डावीकडे जाण्यास सांगितले, वेगवेगळ्या अँगलने फोटो काढल्याने म्हणाली- मी हील्स घातल्या आहेत

अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या आगामी ‘दायरा’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात पापाराझींवर संतापली. मुंबईत आयोजित या कार्यक्रमादरम्यान, जेव्हा ती पापाराझींना पोज देत होती, तेव्हा तिला राग आला. खरं तर, फोटो काढताना पापाराझी तिला सतत उजवीकडे आणि डावीकडे वळायला सांगत होते. यामुळे वैतागून करीना पापाराझींवर ओरडली आणि म्हणाली की, कधी इकडे, कधी तिकडे, मी हील्स घातल्या…

Read More

Raju Shetti vs Rajesh Kshirsagar: Kolhapur Shaktipith Highway Controversy

शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून कोल्हापुरातील राजकारण चांगलेच तापले आहे. शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महामार्गासाठी मोजणी सुरू केल्यास अधिकाऱ्यांना ‘चोपून काढू’ असा इशारा दिल्याने या वक्तव्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- . शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरात विरोधाची धार वाढत असताना या प्रकल्पाच्या बाजूने आणि विरोधात राजकीय नेत्यांच्या भूमिका स्पष्ट होत आहेत. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते…

Read More

Laxman Hake Defies Police Ban; OBC Reservation Morcha Marches To Mumbai

महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. एका बाजूला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ‘गनिमी काव्याने’ मुंबईत पोहोचण्याचे आवाहन केले आहे, तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी आज ‘महा एल्गा . लक्ष्मण हाके यांचा संताप- आम्ही काय रणगाडे घेऊन चाललोय का? दौंड तालुक्यातील पाटस टोलनाक्यावरून हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना…

Read More

निवडणुका संपल्या की महागाई वाढवणे हीच सरकारची सवय?:इंधनावरील सेस कमी करून जनतेला दिलासा द्या- सुप्रिया सुळे

1 सप्टेंबर उजाडताच महागाईचा नवा फटका बसला असून, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिक, गृहिणी आणि मध्यमवर्गीय आधीच होरपळून निघाले आहेत. सिलिंडर, दूध, साखर आणि खाद्यतेलाच्या दरात झालेल्या दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणुका संपल्या की महागाई वाढवणे हीच सरकारची सवय झाली आहे…

Read More

पुण्यात अल्पवयीन मुलाचा वापर करून गांजा विक्री:11 लाखांच्या मुद्देमालासह 21 किलो गांजा जप्त

पुण्यातील हडपसर येथील सुरक्षा नगर परिसरात अल्पवयीन मुलाचा वापर करून गांजा विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने या प्रकरणी 11 लाख 44 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोपट मारुती पाडुळे (वय 56, रा. नवीन म्हाडा कॉलनी, सुरक्षा नगर) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबत एका विधिसंघर्षित बालकासह…

Read More

ऑगस्ट कोरडाच; सप्टेंबरमध्येही पावसाची प्रतीक्षा कायम:शेतकरी चिंतेत; आज मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा

ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी दडी मारल्यानंतर आता सप्टेंबरमध्येही राज्यासह देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे खरीप पिके, धरणसाठे आणि आगामी काळातील पाणी नियोजनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सप्टेंबरमध्ये देशभरातील पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या ९१ टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. सप्टेंबरची देशातील दीर्घकालीन सरासरी १६७.९ मिलिमीटर आहे. देशाच्या…

Read More

2 कोटी मतदार वगळले, मुंबईत 36 लाख; हा मोठा कट!:संजय राऊतांचा केंद्र व राज्य सरकारवर निशाणा; निवडणूक आयोग भाजपचा एजंट असल्याची टीका

महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकार, निवडणूक आयोग आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील प्रारूप मतदार यादीत तब्बल दोन कोटी मतदार वगळल्याचा दावा करताना मुंबईतच 36 लाख मतदार कमी झाल्याचे राऊत यांनी म्हटले. ही बाब अत्यंत गंभीर…

Read More

Lawyer Dies, Many Injured in Mumbai Road Mishap

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड परिसरात रविवारी रात्री एक भीषण रस्ता अपघात घडला. या अपघातात 20 जण जखमी झाले असून, एका 35 वर्षीय महिला वकिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ॲड. प्रियांका मयंक सत्रा असे मृत महिलेचे नाव असून त्या मालाड पश्चिम येथील रहिवासी . प्राथमिक माहितीनुसार, मालाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एस. व्ही. रोड आणि मामलेदार वाडी…

Read More

अमरावती रुग्णालय अग्निकांड:दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासही मागेपुढे पाहणार नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचा कडक इशारा

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर व असह्य आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून, अहवाल आल्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा कडक इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. अमरावती व नंतर नागपूर येथे माध्यमांशी संवाद…

Read More