Headlines

…हुश्श, तनपुरे अखेर बिनविरोध! पण अपक्ष पानसरेंनी 6तास फोडला घाम:महायुतीची 5 तास रणनिती, शेवटच्या मिनिटाला पानसरेंनी आणला ट्विस्ट‎

दत्तात्रेय पानसरे (अपक्ष), मच्छिंद्र धुमाळ (अपक्ष) आणि करण ससाणे (अपक्ष) हे ५ उमेदवार रिंगणात होते. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीने पूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यानुसार ४ उमेदवारांनी माघार घेणे अपेक्षित होते. . मात्र, दुपारी २:५९ वाजता अपक्ष उमेदवार दत्ता पानसरे यांचे सूचक शाहबाज सय्यद यांनी माघारीचा अर्ज दिला आणि तिथून पुढे चक्रे वेगाने फिरली….

Read More

पाथर्डीत वादळी वारा अन् गारपिटीचा तडाखा:पत्रे उडाली, गावांत वीज गुल, अवकाळी संकटामुळे नागरिकांची उडाली तारांबळ,मदतीची मागणी‎

पाथर्डी तालुक्यासह शहरात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारपीटयुक्त पावसाने जोरदार हजेरी लावली. जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या अवकाळी संकटामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले असून शहरात काही ठिकाणी फ्लेक्स बोर्ड कोसळले. तसेच अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्रभर अंधाराचा सामना करावा लागला. सोमवारी संध्याकाळनंतर अचानक हवामान…

Read More

एल-निनोचे संकट: पिण्याच्या पाण्याचे नियोजन आधीच करा:जिल्हाधिकारी डॉ. आशियांचे निर्देश, अनधिकृत पाणी उपशावर होणार कारवाई‎

अहिल्यानगर एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या पाणी आणि चारा टंचाईच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. आगामी काळात पर्जन्यमानावर होणारा परिणाम लक्षात घेता, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हास्तरीय आढावा बैठकीत सर्व संबंधित विभागांना ‘वॉटर-फेडर’ नियोजनाचे निर्देश दिले आहेत. “टंचाईची परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन आधीच करा, असे डॉ. आशिया यांनी…

Read More

कॉकरोच जनता पार्टी संस्थापकाचा यू-टर्न:समर्थकांना दिल्ली विमानतळावर न येण्याचे आवाहन; 6 जून रोजी भारतात परतण्यावर बोलावले होते

कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी 6 जून रोजी भारतात परतण्यापूर्वी आपल्या जुन्या आवाहनातून यू-टर्न घेतला आहे. त्यांनी 4 जून रोजी रात्री 10 वाजता सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश जारी करून समर्थकांना दिल्ली विमानतळावर न येण्याचे आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतः समर्थकांना विमानतळावर पोहोचण्याचे आवाहन केले होते. आता त्यांनी म्हटले…

Read More

जिल्हा परिषद नवीन इमारतीला 3वेळा मुदतवाढ मिळाली तरीही काम अर्धवटच:सभापती गरड यांनी कंत्राटदार, अधिकाऱ्यांना धरले धारेवर‎

जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम तब्बल तीन वेळा मुदतवाढ देऊनही अद्याप अपूर्णच आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काम पूर्ण नसतानाही कंत्राटदाराला आतापर्यंत तब्बल ५९ पैकी ५७ कोटी रुपयांची बिले अदा करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. प्रशासकीय काळामध्ये कंत्राटदाराला अधिकाऱ्यांनी पाठीशी घातल्यानेच कामाची गती मंदावली. कामाचा दर्जाही राखला गेला नसल्याचे बांधकाम सभापती सचिन गरड यांनी…

Read More

weather MP UP rajasthan Uttarakhand rain haryana punjab heatwave

नवी दिल्ली7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील 11 राज्यांमध्ये गुरुवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये 70 किमी प्रतितास वेगाने वादळ आले. सुमारे 80 हून अधिक झाडे उन्मळून पडली. उत्तर प्रदेशातील 12 शहरांमध्ये पाऊस झाला. नोएडामध्ये जोरदार वाऱ्यामुळे 400 झाडे उन्मळून पडली. हरियाणातील फरिदाबाद जिल्ह्यात उड्डाणपूल बांधकाम कामात असलेली क्रेन कंटेनरवर उलटली. यात 3 मजुरांचा…

Read More

वाघोळा गावच्या डोंगररांगेत बहरली 10 हजार झाडांची सावली:20 वर्षांपासून ग्रामस्थ, विद्यार्थ्यांकडून करण्यात येते वृक्षारोपण, जांभूळ, लिंबाच्या झाडांची लागवड‎

फुलंब्री51 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक एकीकडे सिमेंटच्या जंगलांमुळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असताना फुलंब्री तालुक्यातील वाघोळा गावाने मात्र पर्यावरणाचा एक अनोखा आणि कौतुकास्पद आदर्श डोळ्यांसमोर ठेवला आहे. गेल्या २० वर्षांच्या अविरत परिश्रमांतून वाघोळा येथील Source link

Read More

खंडाळ्यातील दोन शेतकरी मुलांची भारतीय सैन्य दलात झाली निवड:गौरव, कृष्णा यांनी जिद्द न सोडता तिसऱ्या प्रयत्नात मारली बाजी‎

वैजापुर तालुक्यातील खंडाळ्यातील सावतावाडी येथील सर्व साधारण शेतकरी कुटुंबातील गौरव अर्जुन मगर आणि कृष्णा गोकुळ थोरात या दोघांची भारतीय सैन्यात नुकतीच निवड झाली आहे. दोन वेळा भरतीसाठी केलेल्या प्रयत्नात अपयश आले तरी खचुन न जाता पुन्हा जोमाने भरतीची तयारी करत आपल्याला यश मिळेलच ही भावना मनात धरून तिसऱ्या प्रयत्नात गौरव व कृष्णा या दोघांनी भारतीय…

Read More

आई-वडिलांना चारधाम यात्रा घडवणाऱ्या मुलांच्या इच्छा पूर्ण होतात- इंदुरीकर महाराज:चारधाम यात्रेनंतर आयोजित गंगापूजन कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन‎

ज्या मुलाने आपल्या आई-वडिलांची सेवा केली, वयोवृद्ध आई-वडिलांना चारधाम यात्रा घडवली, अशा मुलाच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात, असे प्रतिपादन प्रख्यात कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कन्नड येथे माजी आमदार तेजस्विनी जाधव यांच्या चारधाम यात्रा-पूर्तिप्रीत्य र्थ आयोजित कीर्तनात केले. कन्नड शहरातील साई मंदिर प्रांगणात ऐंशी वर्षीय माजी आमदार तेजस्विनी जाधव यांच्या चारधाम यात्रेनंतर आयोजित गंगापूजन कार्यक्रमात इंदुरीकर…

Read More

दिल्ली अग्निकांड, एकमेकांच्या मिठीत सापडले कपलचे मृतदेह:IVF साठी थांबले होते; 21 मृत्यू, लायबेरियन महिलेची ओळख पटली, पती रुग्णालयात दाखल

दिल्लीतील मालवीय नगर येथील फ्लरिश स्टे हॉटेलमध्ये 3 जून रोजी लागलेल्या आगीत प्राण गमावलेल्या 21 लोकांमध्ये एक आफ्रिकन जोडपे देखील होते. बचाव पथकाला त्यांचे मृतदेह बाथरूममध्ये सापडले, जिथे ते दोघे एकमेकांना मिठी मारून होते. महिला टॉयलेट सीटवर बसली होती, तर तिचा पती जवळ ठेवलेल्या खुर्चीवर बसला होता. दोघांनी एकमेकांना घट्ट पकडले होते आणि महिलेचे डोके…

Read More