Headlines

'सलमान नशेत होता, मला शिवीगाळ केली':सुभाष घई यांनी सांगितले- भांडणानंतर सलीम खान यांनी सलमानला माफी मागण्यासाठी पाठवले होते

चित्रपट निर्माता सुभाष घई यांनी नुकतेच सांगितले की, सलमान खानसोबत झालेल्या त्यांच्या भांडणानंतर सलीम खान यांनी सलमानला त्यांची माफी मागण्यासाठी पाठवले होते. ही घटना ‘युवराज’ चित्रपटात दोघांनी एकत्र काम करण्यापूर्वी घडली होती. घई यांच्या मते, एका पार्टीत सलमानने कथितरित्या त्यांना शिवीगाळ केली होती. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत सुभाष घई यांनी सांगितले, “युवराजसाठी सलमान खानच्या भावाने…

Read More

राष्ट्रवादी पक्ष एकच अन् तो शरद पवारांचाच:पक्षाची घटना डावलून आमच्यावर अन्याय झाला; सर्वोच्च न्यायालयात न्यायाची अपेक्षा- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकच आहे. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना ही शरद पवार यांनी केली आहे. चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडून पक्ष काढून घेण्यात आला. पक्षाचे संविधान बघितले तर हा आमच्यावर अन्याय करण्यात आला. या संदर्भात आमची सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे. तो पक्ष शरद पवारांना परत करावा हीच आमची मागणी आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. सुप्रिया…

Read More

चेंबूरमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची हत्या:‘बाळ माझं नाही, बाप दुसराच’ म्हणत डांबराच्या गोळ्या मिसळलेलं शीतपेय पाजलं

मुंबईच्या चेंबूरमधून एक धक्कादायक हत्या प्रकरण समोर आलं आहे. ‘बाळ माझं नाही, बाप दुसराच’ या संशयातून प्रियकराने गर्भवती प्रेयसीचा जीव घेतल्याचा आरोप आहे. चेंबूरच्या मैसूर कॉलनी परिसरात आशिष मगर याने आपल्या प्रेयसी विष्णूमायाला डांबराच्या गोळ्या मिसळलेलं शीतपेय पाजल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विषारी पदार्थामुळे विष्णूमायाची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरसीएफ…

Read More

मेळावा घ्याल तर तिथेच येईन, राज्य अस्थिर करू नका:खासदार संजय जाधवांना फोन करून मनोज जरांगेंचा संतप्त इशारा

मनोज जरांगे यांनी खासदार संजय जाधव यांना फोन करत संताप व्यक्त केला आहे. शिरसाट प्रमाणपत्र रद्द करतात आणि तुम्ही मेळावे घेत आहात. तुम्ही मेळावा घेऊ नका नाही तर मी कार्यक्रमस्थळी येईल, मग एकनाथ शिंदेंना नांदेडला जाणं अवघड होईल, राज्य अस्थिर करू नका. बंडू जाधव यांनी शिरसाट यांचे ऐकूण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. शिरसाट यांचे…

Read More

CJI म्हणाले-गंभीर प्रकरणांत न्यायपालिका संसदेची वाट पाहत नाही:डिजिटल अरेस्टची स्वतःहून दखल; केंद्राला कठोर कायदे बनवण्याचे निर्देश

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले की, भारतीय न्यायव्यवस्था ‘डिजिटल अरेस्ट’ सारख्या नवीन प्रकारच्या फसवणुकीवर संसदेने कायदा बनवण्याची वाट पाहण्याऐवजी सक्रियपणे कारवाई करते. शनिवारी लंडनमध्ये 43व्या आंतरराष्ट्रीय सिम्पोजियम ऑन इकॉनॉमिक क्राईमच्या समारोप समारंभात त्यांनी हे सांगितले. सरन्यायाधीश म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच ‘डिजिटल अरेस्ट’ घोटाळ्याची स्वतःहून दखल घेतली आहे. यात ठग व्हिडिओ कॉलद्वारे स्वतःला पोलीस अधिकारी,…

Read More

सुप्रीम कोर्ट अमित शहांच्या खिशात आहे का?:मी आहे ना, सर्व सेट होईल; अमित शहा-एकनाथ शिंदेंच्या कथित संवादावरून संजय राऊतांचा हल्लाबोल

मोहन भागवत जी विधाने अमेरिकेत करत आहे ती विधाने भारतात आल्यावर केली पाहिजे. नागपूर आणि दिल्लीमध्ये असे विधाने त्यांनी केली पाहिजे. संघाने भारतात एक आणि बाहेर देशात एक अशी भूमिका घेऊ नये, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे विलीनीकरण होणार नाही, शरद पवारांनी काय सुनेत्रा पवार यांच्या हाताखाली काम करायचे…

Read More

एफडीए, सरकारी लॅबचाच निकृष्टतेचा रिपोर्ट:पण ब्लॅकलिस्ट करण्याऐवजी एकाच औषधीवर बंदी, औषधांच्या 46 बॅचेस निकृष्ट, तरीही‘हिंदुस्तान’लाच 21 कोटींचे कंत्राट

राज्यातील सरकारी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या गरीब रुग्ण, गरोदर माता आणि कुपोषित बालकांना हिंदुस्तान लॅबोरेटरीज लिमिटेडकडून निकृष्ट दर्जाच्या औषधांचा पुरवठा झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कंपनीने पुरवलेल्या आयर्न फॉलिक ॲसिड सिरपच्या 103 पैकी तब्बल 46 बॅचेस प्रयोगशाळा चाचणीत निकृष्ट व अप्रामाणित आढळल्या आहेत. सरकारी प्रयोगशाळेनेही यावर शिक्कामोर्तब केले. मात्र, कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याऐवजी आरोग्य विभागाने त्याच…

Read More

‘सोनं-चांदी सगळं घ्या, पण लेकराला सोडून द्या…’:‘समृद्धी’वर दरोडेखोरांनी 19 महिन्यांच्या बाळाला टाकले रस्त्यावर

‘तुला जे हवं ते घे, सोनं घे, पैसे घे, पण माझ्या लेकराला हात लावू नकोस…,’ समृद्धी महामार्गावर शुक्रवारी रात्री दरोडेखोरांसमोर आई विनवणी करत होती… दरोडेखोरांना मात्र पाझर फुटला नाही. त्यांनी त्या कोवळ्या जीवाला थेट सिमेंटच्या रस्त्यावर फेकून दिलं अन् आईनं जिवाच्या आकांतानं गाडीबाहेर झेप घेतली. रडणाऱ्या बाळाला छातीशी कवटाळलं… समृद्धी महामार्गावर सिन्नरजवळ अंधाऱ्या रात्री दरोडेखोरांनी…

Read More

शाळेमध्ये पाऊल ठेवताच सुरू झाला प्रश्नांचा भडीमार:आ. पाचपुते यांचा जि. प. शाळांचा अनपेक्षित भेटींचा दौरा‎

शाळांची परिस्थिती कागदावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वर्गात जाऊन जाणून घेण्याचा उपक्रम आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी सुरू केला आहे. श्रीगोंदे-नगर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांना त्यांनी अचानक भेटी देत शैक्षणिक वातावरण, भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या अडचणींची पाहणी केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नारायण आश्रम येथे भेटीदरम्यान पाचपुते यांनी शिक्षकांशी चर्चा करण्याबरोबरच विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. शाळेत…

Read More

नागपुरात पहाटेचा थरार:भरधाव कारने पादचाऱ्याला चिरडले, दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात, चालकाने मद्यपान केल्याचा संशय

नागपुरातील जपानी गार्डन रोडवर आज पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कैलास सनोडिया असे या अपघातात प्राण गमावलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास 3 गाड्या अत्यंत वेगाने एकमेकांशी शर्यत लावत जात असल्याचा संशय आहे. या शर्यतीदरम्यान एका भरधाव…

Read More