Headlines

निकृष्ट जेवणावरून खडे बोल:आदिवासी मंत्र्यांच्या मुलांना आश्रमशाळेचे सडके जेवण खाऊ घाला- अभिजीत दिपके

आदिवासी मुलांना आश्रमशाळेत सेंट्रल किचनचे निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते. मंत्री-संत्र्यांची पोरे फाईव्ह स्टार जेवण जेवतात. मात्र जनावर देखील खाणार नाही असे निकृष्ट जेवण आदिवासी मुलांना दिले जाते. सेंट्रल किचनचे हे जेवण मुख्यमंत्री, आदिवासी मंत्री व त्यांच्या मुलांना खाऊ घाला, असा जोरदार घणाघात कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी सरकारवर केला. बारा दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे…

Read More

सातारा गुन्हेगारी वार्ता:विवाहितेवर जबरदस्तीचा प्रयत्न, मुलांनाही मारहाण; गुन्हा दाखल

शिवथर परिसरात घरात घुसून २९ वर्षीय विवाहितेवर जबरदस्ती केल्याचा आरोप करत एका तरुणाविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराला विरोध केल्यानंतर संबंधित महिलेला तसेच तिच्या मुलांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याशिवाय घटनेची माहिती पतीला दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सुशांत शुक्राचार्य साबळे (रा….

Read More

कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करा:मनोज जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन; मंत्र्यांचे शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत

गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणामधून एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्य सरकारच्या मंत्र्यांची शिष्टाई अखेर कामाला आली असून, 4 सप्टेंबरपासून कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन मराठा समाजाला करण्यात आले आहे. त्यासाठी नातं, रक्ताचं नातं आणि कुळ या मुद्द्यांच्या आधारे ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना हा अर्ज करण्याचे आवाहन…

Read More

नागपुरात डीजे बंदीवरून भाजपमध्येच "ध्वनी'प्रदूषण:शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी आणि आमदार प्रवीण दटके यांनी संदीप जोशींविरोधी भूमिका घेतली

नागपूर शहर पोलिसांनी आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर डीजे, डॉल्बी आणि बीम-लेझर लाईट्सवर बंदी घातली आहे. या बंदीवरून नागपूर भाजपमध्ये अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. पक्षाचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी आणि आमदार प्रवीण दटके यांनी डीजे बंदीचे समर्थक माजी आमदार संदीप जोशी यांच्या भूमिकेविरोधात आवाज उठवला आहे. दयाशंकर तिवारी आणि प्रवीण दटके यांनी डीजे आणि साऊंड सिस्टिमवर पूर्ण…

Read More

अजित पवार अपघाताचे राजकारण करू नका:सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळे, रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाल्या- दुःख आम्हालाच जास्त

दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजितदादांच्या जाण्याचे दुःख त्यांच्या आईला, मुलांना आणि आपल्याला सर्वाधिक आहे. त्यामुळे या दुर्दैवी घटनेचे कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्याकडे असल्याचे मानले जात आहे….

Read More

महापालिका लिपिक मालमत्ता कर कमी करण्यासाठी लाच घेताना पकडला:1 लाख 20 हजार रुपयांसह सांगवीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एका लिपिकाला मालमत्ता कर कमी करण्यासाठी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याने १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी दुपारी सांगवी परिसरातील आनंदनगर येथे ही कारवाई केली. पकडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव उमेश सुभाष कुटे (वय ३७) आहे. तो पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सांगवी येथील कर आकारणी आणि कर संकलन विभागीय…

Read More

विद्यापीठ विकास मंचची कुलगुरूंना मागणी:प्राधिकरण आणि छात्रसंघाच्या निवडणुका घ्या, विद्यार्थी हिताचे प्रलंबित प्रश्न सोडवा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचने अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांना गुरुवारी लेखी निवेदन दिले. विद्यापीठातील विविध प्राधिकरणांच्या निवडणुका आणि विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. विद्यापीठ कायदा २०१६ नुसार, विद्यापीठातील सर्व प्राधिकरणांच्या निवडणुका ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पूर्ण करून त्यांचे गठन करावे, अशी मागणी मंचने…

Read More

अमरावती विद्यापीठातील मेसमध्ये अस्वच्छता, निकृष्ट अन्न आणि दारूच्या बाटल्या:अभाविपने प्रशासनाचा निषेध करत कुलगुरूंना निवेदन दिले; कारवाईची मागणी

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मेसमध्ये अस्वच्छता आणि निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) आंदोलन केले. विद्यापीठाच्या परिसरात दारूच्या बाटल्या आढळल्यानेही विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. अभाविपच्या महानगर शाखेने गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन केले. हे आंदोलन विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून प्रशासकीय इमारतीपर्यंत काढण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी…

Read More

एसटीच्या NCMC कार्डमुळे प्रवाशांच्या सवलती बंद; राज्यभरात गोंधळ:ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांसह इतरांना फटका; आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) १ सप्टेंबरपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) लागू केले आहे. कोणतीही पूर्वकल्पना किंवा तयारी न करता हा निर्णय घेतल्याने अमरावतीसह राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, दिव्यांग आणि लहान मुलांना प्रवास दरात मिळणाऱ्या सवलती जवळपास बंद झाल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी हा निर्णय…

Read More

555 ग्रामपंचायतींवर आता विस्तार अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त:माजी सरपंचांचा कार्यकाळ संपल्याने निवडणूक होईपर्यंत हीच व्यवस्था

अमरावती जिल्ह्यातील ५५५ ग्रामपंचायतींसाठी आता विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने ही प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या ग्रामपंचायती प्रशासकांशिवाय होत्या. सरपंचांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. त्यामुळे तेव्हापासूनच या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक राजवट सुरू आहे. या काळात शासनाने माजी सरपंचांना प्रशासकांचे…

Read More