Headlines

पुणे मनपात राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपविरोधात ठिय्या आंदोलन:आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कामांच्या चौकशीमुळे विकास निधी शून्य केल्याचा निषेध

पुणे मनपा येथे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपविरोधात ठिय्या आंदोलन केले. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कामांची चौकशी करण्याच्या प्रस्तावामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा विकास निधी भाजपने शून्य केल्याचा आरोप करत हा निषेध व्यक्त करण्यात आला. स्थायी समितीचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांनी चंद्रकांत…

Read More

जंतरमंतर वरील आंदोलनानेच युवकांनी क्रांतीची मशाल पेटवली:कॉ. वैभव चोपकर यांचे प्रतिपादन, कॉ. शेख काका व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना साताऱ्यात अभिवादन

आजची तरुण पिढी वाया गेलेली आहे. रिल्स पाहणारी पिढी, तासनतास मोबाईलच्या आहारी गेलेली अशी टीका करणारे सूर समाजात सर्रास पाहायला मिळतात. परंतु त्याच मोबाईलच्या व्यसनाने रस्त्यावरच्या लढाईला बळ दिलं आणि जंतर मंतरवरील आंदोलनाने या देशात पुन्हा एकदा युवकांनी क्रांतीची मशाल पेटवली व ही तरुण पिढी आगामी काळात मनुवादी, जातीवादी व भांडवलदारी शक्तीला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय…

Read More

तामिळनाडूत DMK आमदारांचा सरकारी गाडी घेण्यास नकार:उदयनिधी म्हणाले- सरकार कर्जात आहे, आधी मालमत्तेची चौकशी व्हावी

DMK च्या ५९ आमदारांनी नवीन कार घेण्यास नकार दिला आहे. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, “विजय स्वतःच म्हणाले आहेत की सरकार कर्जात आहे, त्यामुळे आम्ही ही ऑफर स्वीकारणार नाही.” शुक्रवारी विधानसभेत विजयच्या कार योजनेवर चर्चा झाली. ज्यात उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, आमदारांची आर्थिक स्थिती पाहूनच त्यांना कार द्यावी. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी राज्यातील प्रत्येक…

Read More

सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत खो-खो असोसिएशनची बैठक:कामकाज पेपरलेस करण्यासाठी 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉप

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत असोसिएशनचे कामकाज पेपरलेस करण्याच्या उद्देशाने २३ जिल्ह्यांच्या सचिवांसह तांत्रिक समितीला लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. बदलत्या युगात नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे काळाची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी सांगितले. त्या म्हणाल्या की, लॅपटॉपमुळे पेपरलेस कामकाजाला सुरुवात होईल. खेळ आणि खेळाडूंच्या सन्मानासाठी…

Read More

कन्हैयाकुमार म्हणाले- 'छात्रों की गुंज' विरोधक सावित्रीबाईंवर दगडफेक करणारेच:राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यापूर्वी भाजपवर गंभीर आरोप

काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींच्या २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला विरोध करणारे तेच लोक आहेत, ज्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर दगड आणि शेण फेकले होते, असे कन्हैयाकुमार म्हणाले. राहुल गांधी पुण्यात सावित्रीच्या लेकींशी संवाद साधणार आहेत. कन्हैयाकुमार यांच्या मते, राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यामुळे…

Read More

पुणे शिक्षण मंडळाकडून विशेष नैपुण्य प्राप्त शिक्षक, विद्यार्थ्यांचा गौरव:ज्ञानासोबत प्रामाणिकपणा, शिस्त अंगीकारावी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित विशेष नैपुण्य प्राप्त शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळविण्याची प्रक्रिया नसून व्यक्तिमत्त्वाला आकार देऊन अस्तित्वाला अर्थ देणारी प्रक्रिया आहे, असे त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत संवेदनशीलता, प्रामाणिकपणा, शिस्त आणि कृतज्ञता हे गुण अंगीकारावे, असे आवाहन त्यांनी केले. बालगंधर्व…

Read More

NTA म्हणाले- 'आन्सर की' वर शुल्क घेणे पैसे कमावणे नाही:विद्यार्थ्याची हरकत योग्य असल्यास पैसे परत मिळतील, इतर विद्यार्थ्यांनाही फायदा होईल

नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA ने परीक्षेच्या नंतर जारी केलेल्या ‘आन्सर की’ला आव्हान देण्याच्या शुल्कावर गुरुवारी स्पष्टीकरण दिले. NTA ने सांगितले की, आन्सर कीमध्ये जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे वाटले तर उमेदवार आव्हान देऊ शकतो. यासाठी प्रत्येक प्रश्नावर ₹200 शुल्क भरावे लागते. एजन्सीने सांगितले की, शुल्क यासाठी आहे जेणेकरून अनावश्यक आक्षेप येऊ नयेत. याचा उद्देश…

Read More

टीसीएसवर कर्मचारी मॉनिटरिंगचा आरोप:कंपनी म्हणाली- फक्त सिस्टमची कार्यक्षमता ट्रॅक करत आहोत; मेटावरही कीस्ट्रोक्स रेकॉर्डबद्दल टीका झाली होती

कर्मचाऱ्यांच्या मॉनिटरिंगवरून देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) वादात सापडली आहे. अहवालानुसार, कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या लॅपटॉप आणि वर्कस्टेशनवर मॉनिटरिंग टूल्सचा वापर करत आहे. मात्र, टीसीएसचे म्हणणे आहे की, या टूल्सचा उद्देश कोणत्याही कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक हालचालींवर लक्ष ठेवणे नाही, तर संपूर्ण नेटवर्कची एकूण कार्यक्षमता आणि सिस्टम सुरक्षा सुधारणे हा आहे. वादाचे मुख्य कारण:…

Read More

साखरेच्या बाजारात 20-22 हजार कोटींच्या काळ्या बाजाराची शक्यता:राजू शेट्टींचा आरोप, म्हणाले- मुठभर व्यापारी-कारखानदारांसाठी जनतेला वेठीस धरले

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देशातील साखरेच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीवर चिंता व्यक्त केली आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण करून काही मोजक्या साखर कारखानदार आणि व्यापाऱ्यांना फायदा मिळवून दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. साखरेच्या दरातील ही तेजी पुढील तीन महिने कायम राहिल्यास सुमारे 20 ते 22 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त नफा काही…

Read More

आदिनाथ कोठारेच्या बॉलिवूड प्रवासातील आणखी एक मोठा टप्पा!:दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर 'नई नवेली' प्रेक्षकांच्या भेटीला येणार

विविधांगी भूमिका असोत किंवा वर्षभर सुरू असलेले काम असो आदिनाथ नेहमीच प्रेक्षकांना नव्या भूमिकेत दिसतो. सध्या रामायणसारख्या भव्य चित्रपटाची चर्चा सुरू असतानाच भरताची भूमिका साकारणारा आदिनाथ मराठी टेलिव्हिजन विश्वात निर्मिती करतानाही दिसणार असल्याचे समोर आले आहे. अभिनयासोबतच त्याने दिग्दर्शन आणि निर्मितीचा प्रवासही तितक्याच सातत्याने सुरू ठेवला आहे. रामायणमधील त्याच्या लूकची चर्चा सुरू असतानाच अभिनेता आदिनाथ…

Read More