Headlines

Admin

संगमनेरला अखेर नवी एमआयडीसी मंजूर; लवकरच निघेल नोटिफिकेशन:आ.खताळ यांची घोषणा, 600 तरुणांच्या मुलाखती; 125 जणांची निवड‎

संगमनेर तालुक्यातील तरुण-तरुणींच्या हाताला काम आणि हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी आपण संगमनेरला नवीन एमआयडीसी सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. संगमनेरच्या एमआयडीसीला मंजुरी मिळाली आहे. लवकरच याबाबतचे अधिकृत नोटिफिकेशन निघणार आहे. तालुक्यातील तरुणांना रोजगार…

Read More

राहुरी कृषी विद्यापीठाच्या “फुले स्पेड नांगर’ यंत्राला केंद्राचे पेटंट:शेतकऱ्यांचा वेळ अन् पैसा वाचवणारे संशोधन; शेती मशागतीचा खर्च 44 टक्क्यांनी कमी होणार‎

येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पांतर्गत संशोधित करण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टरचलीत स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित’ या उपयुक्त यंत्राल . विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या यंत्राच्या संशोधनात प्रकल्प प्रमुख डॉ. तुलसीदास बास्टेवाड, डॉ. संजय भांगरे, डॉ….

Read More

इंजेक्शनने ब्युटी ट्रीटमेंट्स देण्यावर घालण्यात आली बंदी:सेंट्रल बँक ऑफ इंडियाची 8% हिस्सेदारी विकणार सरकार; 23 मेच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. चंद्रयान-3 ला गोडार्ड एस्ट्रोनॉटिक्स पुरस्कार मिळाला राष्ट्रीय (NATIONAL) 2. 12 राज्यांमधील 26 राज्यसभा जागांसाठी निवडणुकीची घोषणा 3. प्रिसाईज गाईडेड ड्रोन ‘वायु अस्त्र-1’ ची यशस्वी चाचणी 4. सरकार सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील 8% हिस्सा विकणार 5. बीएसएफच्या महिला संघाने माउंट एव्हरेस्टवर…

Read More

अधिक मासात भगवंताचे नामस्मरण केल्यामुळे लाभते अनंतपटीने पुण्य:उमराणे येथे कीर्तनकार केशव महाराज मुळीक यांचा उपदेश‎

अधिक मासात भगवंताचे नामस्मरण केल्यास अनंतपटीने पुण्य लाभते. या पवित्र काळात केलेले एक कीर्तन हजार कीर्तनांचे पुण्य देऊन जाते, असे प्रतिपादन केशव महाराज मुळीक यांनी केले. उमराणे येथे समस्त ग्रामस्थ आणि रामेश्वर भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात त्यांनी कीर्तनातून मार्गदर्शन केले. अखंड हरिनाम सप्ताहामुळे सध्या उमराणे नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे….

Read More

सिन्नरला पूर्व भागातील केमिस्टांचा एकदिवसीय बंद:ऑनलाईन औषध विक्रेत्यांवर कारवाईची मागणी‎

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील केमिस्ट बांधवांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी एकदिवसीय बंद पाळत वावी पोलिस ठाण्यात निवेदन दिले. ऑनलाईन औषध विक्री, बनावट औषधांचा वाढता धोका तसेच विनाप्रिस्क्रिप्शन औषध विक्रीवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तालुक्यातील सर्वच मेडिकल दुकाने दिवसभर बंद ठेवल्याने नागरिकांना औषधे मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. हा बंद केवळ केमिस्ट व्यवसायाच्या संरक्षणासाठी…

Read More

कन्नडला सातशे एकरांवरील एमआयडीसी मंजूर- सामंत‎:कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्ता मेळावा, आमदारांची अनुपस्थिती‎

तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात आहे. मंत्री मात्र पन्नास गाड्यांच्या ताफ्यात. असे विदारक चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे? असा संतप्त प्रश्न माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विचारला आहे. शिवसेनेच्या वतीने कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावर त्यांनी टिका केली. प्रतिनिधी | कन्नड कन्नड तालुक्यात सातशे एकरांवर एमआयडीसीला मान्यता देण्यात आली आहे. मात्र, काही शेतकऱ्यांनी जमीन संपादनास विरोध…

Read More

राज्यातील ब्रह्मपुरीचे 46.7 अंश तापमान देशात सर्वाधिक:जगातील सर्वात उष्ण शहरांत चंद्रपूरसह भारताची 50 शहरे

Marathi News National Brahmapuri In The State Recorded The Highest Temperature Of 46.7 Degrees In The Country, 50 Indian Cities Including Chandrapur Are Among The Hottest Cities In The World नवी दिल्ली43 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भीषण उष्णतेचा सामना करणाऱ्या भारतात शुक्रवारी सकाळी एक असामान्य विक्रम नोंदवला गेला. जगातील ५० सर्वात उष्ण शहरांच्या यादीत सर्व शहरे…

Read More

पैठण अन् जायकवाडी येथे अर्धा तास अवकाळी पाऊस:कांदा, बाजरी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल‎

पैठण शहरासह जायकवाडी, कातपूर, कारखाना परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक जोरदार विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सायंकाळी अचानक ढग दाटून आले. काही वेळातच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठ तसेच जायकवाडी…

Read More

जिल्ह्यात एकूण 27 हजार 375 सौर कृषी पंप,वीज लपंडावापासून सुटका:तालुक्यात 5 हजार 383 शेतकऱ्यांना सौरचा आधार, रात्रपाळीची गरज नाही‎

जिल्ह्यात एकूण २७ हजार ३७५ सौर कृषी पंप उभारण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. पैठण तालुक्यात आतापर्यंत ५ हजार ३८३ सौर कृषी पंप कार्यान्वित झाले आहेत. तर वैजापूरमध्ये ५ हजार ३७९, गंगापूरमध्ये ४ हजार ९८४, सिल्लोडमध्ये ४ हजार ८५१, कन्नडमध्य . सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी सौरऊर्जा कृषी पंप व्यवस्था केल्याने उन्हाळ्यात विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी…

Read More

उंडणगाव येथे बालाजी लळीत महोत्सवात भक्तीचा महासागर:लाखाहून अधिक भाविक-भक्तांनी घेतले बालाजीचे दर्शन‎

लक्ष्मीरमण गोविंदा… गोविंदा…च्या जयघोषाने आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादाने संपूर्ण उंडणगाव परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला. निमित्त होते येथील प्रसिद्ध श्री बालाजी लळीत महोत्सवाचे. या महोत्सवानिमित्त लाखाच्या वर भाविकांनी हजेरी लावली होती. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी ग्रामस्थ, युवक मंडळ आणि स्वयंसेवी संस्थांनी चोख नियोजन केले होते. पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र दर्शन रांगांची व्यवस्था केल्यामुळे उन्हाच्या तीव्रतेतही भाविकांना…

Read More