Headlines

Admin

शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा:बनावट, खते निविष्ठांपासून सावधान राहा, दापोरीत फलोत्पादन पिकांच्या कीड-रोग व्यवस्थापनावर शेतकरी प्रशिक्षण‎

“हवामान बदलाच्या या काळात शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. तसेच खते व बियाणे खरेदी करताना विशेष दक्षता घेऊन बनावट कृषी निविष्ठांपासून स्वतःचा बचाव करावा. माती परीक्षणावर आधारित अल्प खर्चिक नैसर्गिक शेतीकडे वळावे,” असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तालुक्यातील दापोरी येथे कृषी विभागातर्फे सन २०२६-२७ अंतर्गत आयोजित “फलोत्पादन पिकांवरील कीड…

Read More

दिंडाेरीतील मतदान केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटी‎:डेटा मॅपिंग व एसआयआर प्रणालीत त्रुटी खपवून घेतल्या जाणार नाही जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या दिंडोरी तालुक्यात विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम वेगाने सुरू आहे. या मोहिमेची प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलवर काय परिस्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी आणि मतदार याद्या शंभर टक्के अचूक करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिंडोरी शहरातील मतदान केंद्रांचा धावता दौरा करत अचानक भेटी दिल्या. ​तालुक्यात मतदान केंद्रस्तरीय…

Read More

टंचाई कायम:हरसुलला खतांसाठी पहाटेपासून रांगा, बफर स्टॉक सर्वसामान्यांना खुला करण्याची मागणी‎

या आदिवासीबहुल परिसरामध्ये भात लागवडीच्या ऐन हंगामात खतांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. खत मिळवण्यासाठी पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला. दिवसभरात कृषी विभागाच्या मध्यस्थीनंतर सहकारी संस्था व खत विक्रेत्यांना ६८३ गोणी खताचे वाटप करण्यात आले असले, तरी परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आहे. सहकारी संस्थेत केवळ सभासदांनाच खत दिले जात असल्याने सर्वसामान्य शेतकरी खासगी विक्रेत्यांवर अवलंबून…

Read More

दहा दिवसांत पीक विमा द्या, अन्यथा सरण आंदोलन:निफाड येथे आयाेजित पीक विमा योजना तक्रार निवारण समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा‎

खरीप २०२५ मधील अतिवृष्टीमुळे ९० टक्के पीक हातचे गेल्यानंतरही विमा कंपनीने उत्पन्नात घट नाही, असे कारण देत सर्व दावे फेटाळल्याने देवगाव मंडळातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. . तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांच्या उपस्थित झालेल्या तालुकास्तरीय पीक विमा तक्रार निवारण समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या मनमानी कारभाराचा पाढाच…

Read More

अचूक नोंदींसाठी बीएलओंना नागरिकांचे सहकार्य आवश्यक:इगतपुरीचे तहसीलदार अभिजीत बारवकर यांचे आवाहन‎

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत प्रत्येक पात्र नागरिकाची अचूक नोंद होणे आवश्यक असून, बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांना नागरिकांनी पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अभिजित बारवकर यांनी केले. तहसील कार्यालयात आयोजित बीएलओ व बीएलए यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. बैठकीस निवडणूक…

Read More

स्वच्छ सुंदर बसस्थानकाचा दावा, मात्र प्रत्यक्षात चिखल-गैरसोयींचा सामना:सटाणा बसस्थानकाच्या आवार कार्यशाळेची दुरवस्था, प्रवासी हैराण‎

राज्यस्तरीय ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान २०२५-२६’मध्ये सलग दुसऱ्यांदा प्रादेशिक स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून १० लाख रुपयांचे पारितोषिक पटकावलेल्या सटाणा बसस्थानकातील आगार कार्यशाळेत चिखल, दुर्गंधी, अस्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या अपुऱ्या सुविधां . आगाराच्या कार्यशाळा आवारात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. उन्हाळ्यात धुळीचा त्रास तर पावसाळ्यात चिखलामुळे कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज करताना अडचणींचा सामना…

Read More

Uttarakhand-Himachal Landslides | 438 Roads Closed; Rajasthan-Gujarat Clouds Missing

Marathi News National Uttarakhand Himachal Landslides | 438 Roads Closed; Rajasthan Gujarat Clouds Missing भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मध्य प्रदेश, राजस्थानसह देशातील 10 राज्यांमध्ये पुढील 5 दिवस मान्सून कमकुवत राहील. या राज्यांमध्ये पावसाची शक्यता कमी आहे. याचे कारण म्हणजे देशाच्या पश्चिम भागातून ढग नाहीसे होणे. नवीन उपग्रह प्रतिमांमध्ये ढग उत्तराखंड, यूपी, बिहार, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा…

Read More

सावळदबारा परिसरात सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती:आता शेतकऱ्यांच्या नजरा मोठ्या पावसाकडे, यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा‎

अजिंठा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या सावळदबारा आणि परिसरात यंदा मान्सूनने वेळेत हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. सुरुवातीलाच समाधानकारक आणि पेरणीलायक पाऊस झाल्याने यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक मका व कपाशीच्या पिकाला फाटा देत सोयाबीन पिकाला पसंती दिली आहे. परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी पेरणी झालेल्या सोयाबीनची उगवण उत्कृष्ट झाली असून, सध्या शेतातील कोवळी हिरवीगार रोपे डोलताना…

Read More

‘एसआयआर'च्या कामात दिरंगाई केल्यास कारवाई:जिल्हाधिकारी गौडा यांचा कर्मचाऱ्यांना इशारा‎

शासनाच्या वतीने आयोजित विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करावे. या राष्ट्रीय महत्त्वाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिला. कन्नड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. तालुक्यात केवळ १७ टक्केच उद्दिष्ट पूर्ण झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेची झाडाझडती घेतली. उपविभागीय…

Read More

देवगाव रंगारी ते गल्लेबोरगाव राज्य मार्गाची दुरवस्था:वाहनधारक त्रस्त, 6 किमी प्रवासाला लागतोय 40 मिनिटांचा वेळ, विद्यार्थ्यांचे हाल‎

कन्नड आणि खुलताबाद तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या गावांना जोडणारा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील थेट अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग अशी ओळख असलेला राज्य महामार्ग क्रमांक ३९ म्हणजेच अमळनेर-नाग द-कन्नड-गल ्लेबोरगाव-देवगाव रंगारी-लासूर स्टेशन ते कायगाव टोका हा रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर जागोजागी जीवघेणे खड्डे पडले असून डांबरीकरण पूर्णपणे उखडून गेले आहे. गेल्या १५ ते…

Read More