री-नीटचा निकाल योग्य असल्याचे सिद्ध:4 विद्यार्थ्यांना खंडपीठाचा दंड, पाहणीत मूळ उत्तरपत्रिका अन् एनटीएचे गुण तंतोतंत जुळले
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) घेतलेल्या री-नीटच्या गुणपत्रात फेरफार आणि निकालात त्रुटी असल्याचा दावा करणाऱ्या ४ विद्यार्थ्यांचे आरोप बिनबुडाचे आणि चुकीच्या माहितीच्या आधारे असल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांच्या ४ याचिका फेटाळून लावल्या. त्याचबरोबर औरंगाबाद खंडपीठाने प्रत्येक याचिकाकर्त्याला ५,००० रुपये दंडात्मक खर्च ठोठावला आहे….