Headlines

राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लावंडे यांना दिलासा:3 आठवड्यांनंतर मोबाईल परत करण्याचे पुणे न्यायालयाचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) प्रवक्ते विकास सदाशिव लावंडे (वय-54) यांचा वाघोली पोलिसांनी जप्त केलेला मोबाईल फोन अखेर तीन आठवड्यांनंतर पुणे न्यायालयाने परत करण्याचे आदेश दिले आहेत. लावंडे यांना वाघोली पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. लावंडे यांच्यावर 29 एप्रिल 2026 रोजी यूट्यूबवरील एका व्हिडिओमध्ये वारकरी संप्रदायातील संत, कीर्तनकार आणि धार्मिक व्यक्तींना ‘घुसखोर’…

Read More

विहिरीच्या कामावरून तलवार, काठ्यांनी तुंबळ हाणामारी:4 जणांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात विहिरीच्या कामावरून एकाच कुटुंबातील चौघांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांवर शुक्रवारी ता. 12 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गारमाळ येथील युसुफ भिका नंदावाले यांचे पिंपळखुटा शिवारात शेत आहे.या शेतात विहिरीचे काम करण्यात आले आहे. मात्र मजूरांच्या कारणावरून युसुफ यांचा…

Read More

मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर:221 बोगस प्रमाणपत्रे जारी, बावनकुळेंच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदारांच्या डिजिटल स्वाक्षरीचा (DSC) गैरवापर करून बोगस प्रमाणपत्रे वाटल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी थेट राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले होते. मंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबईतील एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात उपजिल्हाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

ओबीसींना बेदखल कराल तर निवडणुकीत पाडू:ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी 'चलो मुंबई'चा नारा, प्रा. लक्ष्मण हाकेंचा सरकारसह पवार कुटुंबियांवर हल्लाबोल

ओबीसी आरक्षणाचे रक्षण, जातीनिहाय जनगणना आणि समाजाची एकजुट या मागण्यांसाठी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी एल्गार पुकारला आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे झालेल्या जनजगृती सभेत त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली असून लवकरच ‘चलो मुंबई’चा नारा देणार असल्याचे जाहीर केले आहे. जयपूर येथील जनजागृती सभेनंतर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. यावेळी प्रा. हाके म्हणाले…

Read More

कांदा उत्पादकांना दिलासा:केंद्र सरकारने वाढवला खरेदी दर; आता 1580 वरून 1650 रुपये प्रतिक्विंटलने होणार खरेदी

महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बफर स्टॉक कार्यक्रमांतर्गत कांदा खरेदीच्या दरात वाढ करण्यात आली असून आता सरकार 16.50 रुपये प्रति किलो म्हणजेच 1,650 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करणार आहे. सुधारित दर आजपासून लागू होणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. कांदा…

Read More

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाने यश मिळवावे- बोरुडे:दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; करिअरविषयक मार्गदर्शन

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल झाले असून विद्यार्थ्यांसमोर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आवडत्या क्षेत्रात यश संपादन करावे. दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे टप्पे असून याच काळात त्यांच्या पुढील शिक्षणाची दिशा निश्चित होत असते. त्यामुळे योग्य वेळी योग्य…

Read More

सत्ता, पैशांद्वारे परस्पर संबंधांची तुलना केल्यामुळेच दुरावा- विष्णू महाराज:कन्नड येथील हनुमान मंदिरात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची सांगता‎

संत कबीरांनी सब पैसे के भाई, अपना साथी कोई नहीं असे जगाचे वर्णन केले आहे. जग कमालीचे व्यावहारिक झाले आहे. सत्ता, पैशांद्वारे परस्पर संबंधांची तुलना माणसा-माणसांत दुरावा निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन विष्णू महाराज काळे यांनी भोलेश्वर कॉलनीतील हनुमान मंदिरात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाच्या सांगता प्रसंगी शुक्रवारी केले. भोलेश्वर कॉलनी येथे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन…

Read More

नाशिकमध्ये भाजपच्या बंडखोराची माघार तरीही जळगावात शिंदेसेनेचे बंड कायम:विधान परिषदेचा गुंता सोडवणे एकनाथ शिंदेंच्या हाती

थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप केल्यावर आणि मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसेंच्या मनधरणीनंतर भाजप बंडखोर प्रसाद हिरे, गोकुळ गितेंनी माघार घेतली. मात्र, जळगावातून शिंदेसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे ‘नॉट रिचेबल’ झाल्याने मह . जळगावमुळे नाशिकमध्ये ऐनवेळी दगाफटका होण्याची धास्ती शिंदेसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडेंना सतावत आहे. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, जळगावातील गुंता सोडवणे उपमुख्यमंत्री…

Read More

शिर्डी येथील प्रकरणात जाफराबादच्या पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल:सावत्र मुलाला अमानुष मारहाण, व्हिडिओ पाठवत दीड हजाराची खंडणी मागणारा अटकेत

आपल्या पाच वर्षीय सावत्र मुलाला अमानुष मारहाण करून त्याचा व्हिडिओ नातेवाइकांना पाठवत दीड हजारांची खंडणी मागणाऱ्या अनिस शेखविरुद्ध जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शिर्डी येथील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आरोपी अनिस हा पत्नी व पाच वर् . भीक मागण्याची जबरदस्ती आरोपी अनिस शेख सावत्र मुलगा व पत्नीला घेऊन शिर्डी येथील तिनशे रुपये दररोज…

Read More

उद्धव ठाकरेंनी बोलावली खासदारांची बैठक:14 जून रोजी 'मातोश्री'वर ठरणार पुढील रणनीती, 'ऑपरेशन टायगर'मुळे ठाकरेंची सावध भूमिका

राज्याच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा रंगली असतानाच, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक 14 जून रोजी वांद्रे येथील मातोश्री या निवासस्थानी पार पडणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा काही मोठ्या घडामोडी घडणार आहेत का, याविषयी तर्कवितर्क लढवले जात…

Read More