ओबीसींना बेदखल कराल तर निवडणुकीत पाडू:ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी 'चलो मुंबई'चा नारा, प्रा. लक्ष्मण हाकेंचा सरकारसह पवार कुटुंबियांवर हल्लाबोल
ओबीसी आरक्षणाचे रक्षण, जातीनिहाय जनगणना आणि समाजाची एकजुट या मागण्यांसाठी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी एल्गार पुकारला आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे झालेल्या जनजगृती सभेत त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली असून लवकरच ‘चलो मुंबई’चा नारा देणार असल्याचे जाहीर केले आहे. जयपूर येथील जनजागृती सभेनंतर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. यावेळी प्रा. हाके म्हणाले…