वणीत मंडप काढताना उच्चदाब वाहिनी धक्क्याने तरुणाचा मृत्यू:तारा 15 फुटांवर; संतप्त ग्रामस्थांचा महावितरणवर निष्काळजीपणाचा आरोप
शहरातील वृंदावन नगर परिसरात लग्नाचा मंडप काढताना लोखंडी पाईप ११ केव्ही उच्चदाब विजवाहिनीच्या संपर्कात आल्याने २७ वर्षीय मंडप व्यावसायिकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी महावितरणविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवरे येथील ऋषीकेश कैलास मत्सागर (२७) हा शनिवारी सायंकाळी मंडप काढण्यासाठी वृंदावन नगर येथे गेला होता. काम सुरू असताना लोखंडी पाईपचा वरून गेलेल्या…