दोन्ही ठाकरे एकत्र लढले, तरी बेस्ट निवडणुकीत पराभूत झाले:आदित्य ठाकरेंच्या टीकेला नितेश राणेंचे प्रत्युत्तर
बिहारमधील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आता मंत्री नितेश राणे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. एका पोटनिवडणुकीच्या निकालाने हुरळून जाणाऱ्यांनी आधी नुकत्याच झालेल्या बेस्ट निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊनही कसा पराभव झाला, हे विसरू नये, असा घणाघात नितेश…