छत्रपती संभाजीनगर-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांवरून संताप:अंबादास दानवेंनी सरकारला धारेवर धरलं; नितीन गडकरींना थेट पत्र
छत्रपती संभाजीनगर ते नाशिक महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे. विशेषतः वैजापूरजवळील चार ते पाच किलोमीटरचा पट्टा अत्यंत धोकादायक बनला असल्याचे…