Headlines

कांतारा, केरळचा पारंपरिक कलाविष्कार:मिरवणुकीतील अघोरी नृत्याने वेधले लक्ष, बार्शीत शिव-बसव जयंती मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर‎

. बार्शीमध्ये शिव-बसव जयंतीच्या मिरवणुकीत विशेष आकर्षण म्हणजे कांतारा व केरळमधील प्रसिद्ध पारंपरिक नृत्यप्रकार, अघोरी नृत्याने लक्ष वेधले. हा कलाविष्कार पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात सादर झालेल्या या नृत्यप्रकारांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत ही मिरवणूक उत्साहात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या…

Read More

आयसीटी योजनेतून जि.प. शाळेमध्ये संगणक लॅब:वाशिंबे शाळेत 23 लाखांच्या प्रकल्पातून विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची दारेझाली खुली‎

वाशिंबे (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्र शासनाच्या आयसीटी योजनेअंतर्गत २३ लाख रुपयांची सुसज्ज आयसीटी लॅब उभारण्यात आली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी शैक्षणिक क्रांती ठरत आहे. या लॅबमुळे विद्यार्थ्यांना संगणक, प्रोजेक्टर आणि विविध मल्टिमीडिया साधनांच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. परिणामी, पारंपरिक शिक्षणपद्धतीला आधुनिकतेची जोड मिळाली असून, विद्यार्थ्यांना विषय अधिक…

Read More

पायरपाडा ते भिकारसोंडा रस्त्याची चाळण:ग्रामस्थांचा मोर्चाचा इशारा, मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचवताना ग्रामस्थांची कसरत‎

साल्हेर परिसरातील पायरपाडा ते भिकारसोंडा या ५ किमी रस्त्याची अवस्था पाहिल्यावर ‘विकास’ नेमका कुणाचा झाला, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामामुळे आदिवासी बांधवांचे हाल होत असून, आता त्यांच्या संयमाचा बांध सुटला आहे. “निधी येतो, पण मुरतो कुठे?’ असा थेट सवाल करत ग्रामस्थांनी साल्हेर ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढण्याचा पवित्रा घेतला आहे. पायरपाडा…

Read More

चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली:छातीत वेदना, डोकेदुखी, मळमळ, उलट्यांचा त्रास; कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली

दैवी शक्तीचा दावा करत महिलांचे शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपांमध्ये अडकलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या चौकशीत नवा वळण आले आहे. विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सुरू असलेल्या चौकशीदरम्यान अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने एकच खळबळ उडाली. छातीत वेदना, डोकेदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने पोलिसांना तातडीने वैद्यकीय मदत बोलवावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून…

Read More

शूटिंग थांबवली तर मधुबालाला कचेरीपर्यंत घेऊन गेले बी.आर.चोप्रा:प्रिन्सने भारताला समजून घेण्यासाठी त्यांचा चित्रपट पाहिला, जवाहरलाल नेहरूंनी लिहिले पत्र

२२ एप्रिल १९१४ आजपासून बरोबर ११२ वर्षांपूर्वी, अखंड भारताच्या पंजाबमध्ये, पीडब्ल्यूडीमध्ये सरकारी नोकरी करणाऱ्या विलायती राज चोप्रा यांच्या घरी बलदेव या मुलाचा जन्म झाला. बलदेव राज चोप्रा, ६ भावंडांच्या कुटुंबात दुसऱ्या क्रमांकावर होते. शिक्षणात अव्वल असलेल्या बलदेवसाठी वडिलांनी लहानपणापासूनच ठरवले होते की, त्याला सरकारी अधिकारी बनवेन. वेळ सरली आणि तयारी सुरू करण्यात आली. पाकिस्तानमधील लाहोर…

Read More

शेवगाव तहसीलमध्ये अस्वच्छतेचा रामभरोसे कारभार:कर्मचाऱ्यांकडूनच ‎गुटख्याची रंगरंगोटी‎

शेवगाव तहसील कार्यालयात सध्या स्वच्छतेच्या नियमांची ऐशीतैशी होताना दिसत आहे. ज्या प्रशासनाने ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवायचे, त्याच कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे, दिव्यांगांसाठी बनवलेला रॅम्प कचराकुंडी बनला असून, कार्यालयातील भिंती गुटखा-माव्याच्या पिचकाऱ्यांनी लालभडक झाल्या आहेत. या अस्वच्छतेमागे बाहेरील व्यक्तींपेक्षा स्वतः कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रवेशद्वाराजवळील रॅम्पवर प्लास्टिक पिशव्या,…

Read More

निवृत्तीनंतर चहासाठीही पुरत नाही पेन्शन; शिक्षकांचा सरकारवर संताप:खुर्च्या रिकाम्या, शाळांना कुलूप अन् सरकारी कार्यालये ठप्प‎

आमदार आणि खासदारांनी एकदा शपथ घेतली की त्यांना आयुष्यभर पेन्शन मिळते, मात्र ३०-३० वर्षे प्रामाणिक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नाकारली जाते, ही मोठी शोकांतिका आहे. सध्या निवृत्त कर्मचाऱ्यांना केवळ १५०० ते १८०० रुपये पेन्शन मिळतेय. वाढत्या महागाईत ही रक्कम चहापाण्यासाठीही पुरणार नाही, मग घरखर्च कसा चालवायचा?” असा सवाल माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट यांनी…

Read More

भरतसारखा भाऊ हवा असेल तर आधी स्वतः राम व्हा-कुमार विश्वास:रामायणात कोणीही खलनायक नाही, शबरी भेटीच्या वर्णनाने अहिल्यानगरकर गहिवरले

राम कथा आपल्याला शौर्य, वचनबद्धता, भक्ती व बंधुप्रेम शिकवते. त्यामुळे ती कुटुंबासह श्रवण करणे महत्त्वाचे आहे. आपला भाऊ भरत सारखा आपल्याला अपेक्षित असेल तर आपण स्वतः आधी राम आहोत का हे तपासले पाहिजे, असे प्रतिपादन रामकथाकार डॉ. कुमार विश्वास यांनी सोम . माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मृतीनिमित्त येथील काका ट्रस्ट व जगताप परिवाराचे…

Read More

स्नेहालयतर्फे ‘बा, बापू, विनोबा’ पुरस्कार प्रदान‎:द्वेष अन् उन्मादातून होणारी हिंसा भारतीय संस्कृतीचा विनाश घडवेल- डॉ. अभय बंग

“समवेदना, प्रेम आणि माणुसकीने प्रेरित कृती हीच धर्म आणि अध्यात्माची खरी अभिव्यक्ती आहे. मात्र, सध्या जगभरात द्वेष आणि उन्मादातून जी हिंसा पसरत आहे, ती केवळ भारतीय संस्कृतीच नव्हे तर जागतिक अध्यात्मिकतेचा विनाश घडवीत आहे,” असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी दिला. स्नेहालय संस्थेच्या वतीने आयोजित वर्ष २०२५-२६ चे ‘बा,…

Read More

टंचाई काळात कामात हलगर्जी नको, अन्यथा थेट कारवाई करू:जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा; अधिकारी,कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे

पाणीटंचाईच्या काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक सतर्क राहून जबाबदारीने काम करावे. लोकप्रतिनिधींच्या सूचनेची वाट न पाहता टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव तातडीने सादर करा. नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे, यात कोणतीही दिरंगाई किंवा कामात शिथिलत . पाथर्डी तहसील कार्यालयात शेवगाव व पाथर्डी तालुक्यांच्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांत प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक…

Read More