Headlines

देवेंद्र फडणवीसांना केंद्रात शिक्षणमंत्री करणार:संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले- फडणवीसांनी कुठे राहायचे हे मोदी-शहांच्या हातात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यक्तीला शिक्षणमंत्री करण्यापेक्षा एखाद्या उच्चशिक्षित व्यक्तीला त्या पदावर बसवले पाहिजे. हे पद उत्तमरीत्या सांभाळू शकणारे अनेक लोक देशात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनाच केंद्रात शिक्षणमंत्री केले जाणार आहे, असा ठाम दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भाजपमध्ये या पदासाठी त्यांचेच नाव चर्चेत आहे. फडणवीस यांना…

Read More

प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने खालच्या पातळीची भाषा वापरली:विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अशिष्ट भाषेचा वापर झाल्याने अनुपम खेर संतापले

विद्यार्थ्यांचे आंदोलन संपल्यानंतर, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी आंदोलनात वापरलेल्या भाषेवर जोरदार टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बचाव केला आहे. त्यांनी कठोर शब्दांत मर्यादा न पाळल्याबद्दल निषेध केला आणि म्हटले की, प्रत्येक वर्गातील व्यक्तीने शब्दांची मर्यादा ओलांडली आहे. अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याने लिहिले आहे,…

Read More

शिंदे गटात गेल्यानंतरही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा:खासदार संजय जाधवांच्या पोस्टची राजकीय वर्तुळात चर्चा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का देत एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आज उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांनी टाकलेल्या पोस्टमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. खासदार जाधव यांना काही काळापूर्वी ठाकरे गटातून बंड केले होते. म्हणून उद्धव ठाकरे यांनीच परभणीत जाऊन…

Read More

अहिल्यानगरात NEET विद्यार्थिनीची आत्महत्या:सुसाइड नोटमध्ये लिहिले- 'तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही', परीक्षेत मिळाले होते 166 गुण

देशभरात सध्या ‘नीट’ परीक्षेवरून मोठा गदारोळ सुरू असतानाच, अहिल्यानगर जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. ‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून जलालपूर येथील अंकिता सांगळे या विद्यार्थिनीने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले आहे. परीक्षेच्या निकालात तिला ७२० पैकी केवळ १६६ गुण मिळाले होते. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली असून, यात तिने आपल्या…

Read More

सेंद्रिय कर्ब संवर्धनातून प्रति एकर सरासरी 82 टन ऊस उत्पादन‎:जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळेच्या शेतकऱ्याचा ‘सुपरकेन’ तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग

. जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे येथील प्रयोगशील शेतकरी विकास हरिभाऊ चव्हाण यांनी सेंद्रिय कर्ब संवर्धन, पाचट व्यवस्थापन आणि ‘सुपरकेन’ रोपवाटिका तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ साधली. त्यांच्या ४० एकर शेतीमध्ये प्रति एकर सरासरी ८२ टन ऊस उत्पादन मिळत आहे. एका हंगामात एकरी सुमारे २ लाख ३० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो….

Read More

वृक्षारोपणासह पर्यावरण संवर्धन‎:स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी उपक्रम‎

येथील सरदवाडी रोडवरील रामेश्वर महादेव मंदिर परिसरात नवसंजीवन वृक्षारोपण अभियान उत्साहात पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप नाशिक जिल्हा चिटणीस मीरा सानप यांच्या संकल्पनेतून या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. . या अभियानास ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे, जयंत आव्हाड, बाळासाहेब हांडे व डॉ. दीपक श्रीमाली यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमादरम्यान दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित…

Read More

जायखेडा विद्यालयामध्ये ईव्हीएमवर शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक:अधिकृत निकालातून विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव‎

लोकशाहीची मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याच्या उद्देशाने येथील कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक पार पडली. मतदान केंद्र, मतदार यादी, ईव्हीएमद्वारे मतदान, मोबाईल ॲपचा वापर, मतमोजणीच्या फेऱ्या आणि अधिकृत निकाल घोषणेमुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. पी. शेवाळे आणि सहाय्यक निवडणूक…

Read More

चांदवडला बाजारतळ गाळ्यांचा लिलाव रद्द करा:विस्थापितांचे नाममात्र भाडेतत्त्वावर पुनर्वसन करावे; श्रमशक्ती हॉकर्स सेलचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन‎

शहरातील बाजारतळात नव्याने बांधण्यात आलेल्या गाळ्यांचा ऑनलाईन लिलाव रद्द करून ते पात्र हॉकर्सना प्राधान्याने नाममात्र भाडेतत्त्वावर वाटप करावेत, तसेच विस्थापित टपरीधारकांचे तातडीने पुनर्वसन करावे, अशी मागणी श्रमशक्ती कामगार संघटना प्रणीत श्रमशक्ती हॉक . २८ फेब्रुवारी २०२५ रोजी चांदवड नगरपरिषदेने बाजारतळ परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली होती. या कारवाईपूर्वी सर्व नोंदणीकृत हॉकर्स व टपरीधारकांनी ‘प्रथम पर्यायी…

Read More

कळवणला आश्रमशाळांमध्ये 325 पदे रिक्त:विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम, रिक्त पदे त्वरित न भरल्यास आंदोलन, परिवर्तन कामगार सेनेचा इशारा‎

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तब्बल ३२५ पदे रिक्त असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. अनेक शाळांमध्ये अध्यापन व्यवस्था विस्कळीत झाली असून विद्यार्थ . आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय आश्रमशाळाच शिक्षणाचा मुख्य आधार आहेत. मात्र शिक्षकांच्या कमतरतेमुळे अनेक विषयांचे नियमित अध्यापन होत नसून काही ठिकाणी एकाच शिक्षकावर अनेक…

Read More

गंज बाजार पोलिस चौकी बंद असल्याने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांत असुरक्षिता:चौकी ठराविक कालावधीत तरी सुरु ठेवण्याची मागणी‎

शहरातील गंज बाजार आणि परिसर गेल्या काही वर्षांत वेगाने विकसित झाला आहे. येथील व्यावसायिक दुकाने, नागरी वसाहती आणि परिणामी वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. मात्र, याच मुख्य बाजारपेठेच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली गंज बाजार पोलीस चौकी गेल्या अनेक महिन्यांपासून कुलूपबंद आहे. ही चौकी बंद असल्याने संपूर्ण परिसरात सध्या असुरक्षिततेचे वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न…

Read More