Headlines

नेवाशात पोलिसांची मध्यरात्री कारवाई; 48 किलो गांजा जप्त, वाकडी शिवारातील शेडवर छापा; एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा‎

नेवासे तालुक्यातील वाकडी परिसरात पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास मोठी कारवाई करत गांजा विक्रीच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केला. बेकायदेशीरपणे गांजाची साठवणूक व विक्रीच्या तयारीत असलेल्या दोन जणांना नेवासा पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून ४ लाख ७८ हजार ६० रुपयांचा तब्बल ४७.८२८ किलो गांजा जप्त केला आहे. २४ जुलैच्या रात्री ११.५० ते २५ जुलैच्या पहाटे १.५० च्या सुमारास…

Read More

पैठणमधील विकासकामे, प्रलंबित‎प्रश्न मार्गी लावा- आमदार भुमरे‎:एसटीपी, पाणीपुरवठा, हद्दवाढ, प्राधिकरणाचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा

पैठण शहर व तालुक्यातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार विलास भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पैठण-आपेगाव विकास प्राधिकरण, पैठण नगर परिषद तसेच पुरातत्त्व विभागाच्या विविध प्रलंबित व सुरू असलेल्या…

Read More

50 युवकांचा सहभाग:बोरगाव अर्ज येथून शिर्डी पायी दिंडीचे उत्साहात झाले प्रस्थान, 29 जुलै रोजी शिर्डीला पोहोचणार‎

फुलंब्री बोरगाव अर्ज येथून साईभक्तांच्या शिर्डी पायी दिंडीचे गुरुवारी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले. गेल्या १६ वर्षांची परंपरा जपत बोरगाव अर्ज येथील तरुणांनी यंदाही या पायी वारीचे आयोजन केले आहे. सकाळी आठ वाजता स्थानिक साई मंदिरात साईबाबांचे भावपूर्ण पूजन व महाआरती करून दिंडीचा शुभारंभ झाला. त्यानंतर टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘साईनाथ महाराज की जय’च्या जयघोषात गावातून…

Read More

महाराष्ट्र, गुजरात, ओडिशात पावसाचा रेड अलर्ट:आसाममध्ये 66 मृत्यू, पुराचा 7 लाख लोकांना फटका; हिमाचलमध्ये भूस्खलन, 134 रस्ते बंद

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे गुजरात, बंगाल, ओडिशा, महाराष्ट्र आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पण हा पाऊस अजूनही सामान्यपेक्षा 16.1% कमी आहे. उत्तर भारतात 31 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहील. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख आणि उत्तराखंडमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. हिमाचल, उत्तराखंड, पंजाबसह अनेक…

Read More

लासलगाव-विंचूर मार्गावरील अर्धवट पुलाला कारची धडक:जीवितहानी टळली; वारंवार अपघातांमुळे वाहनचालकांमध्ये भीती‎

लासलगाव-विंचूर पाच किलोमीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना रस्त्यावरील दोन ठिकाणी अर्धवट तोडून ठेवलेल्या पुलांपैकी एका पुलाला शुक्रवारी चारचाकी वाहनाची जोरदार धडक बसली. अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याने वारंवार अपघात घडत असून, वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लासलगाव-विंचूर रस्त्यावरील दोन ठिकाणी पुलांचे काम सुरू…

Read More

वनोलीत 586 लाभार्थ्यांना योजनांचा लाभ:6 हजार नागरिकांची उपस्थिती, रक्तदान शिबिर व विविध सेवांचा लाभ एकाच ठिकाणी‎

येवला एरंडगाव येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून ३ हजार ११ लाभ व सेवांचे वितरण करण्यात आले. या शिबिरात शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला. तसेच क्यूआर कोडयुक्त स्मार्ट रेशन कार्डच्या प्रतिकृतीचे अनावरण अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. एरंडगाव…

Read More

सप्तशृंगी गडावरील पाणीप्रश्न सुटला:भवानी पाझर तलाव ओव्हरफ्लो; नागरिकांमध्ये समाधान, आज हाेणार जलपूजन‎

सप्तशृंगी गडाला पाणीपुरवठा होणारा भवानी पाझर तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे सप्तशृंगी गडाचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. यामुळे नागरिक व भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, रविवारी (दि.२६) प्रशासक आणि आणि माजी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात येणार आहे. तालुक्यात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या सप्तशृंग गडावर असलेला भवानी पाझर तलाव दरवर्षी संपूर्ण क्षमतेने भरतो. डोंगराळ भागात आणि…

Read More

300 जणांना शासकीय ‎योजना मंजुरीपत्र वाटप‎:लासूर येथे आमदार प्रशांत बंब यांची उपस्थिती

लासूर स्टेशन लासूर स्टेशन येथे विविध शासकीय योजनांतील ३०० पात्र लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात आमदार प्रशांत बंब यांच्या शुभहस्ते ही प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी बोलताना आमदार प्रशांत बंब म्हणाले की, राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा थेट लाभ शेवटच्या घटकापर्यंत…

Read More

गावकरी चिंतेत:नरला गावामधील 40 वर्षांपूर्वीची पाण्याची टाकी आली मोडकळीस, जिल्हा प्रशासनाने दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांमधून मागणी‎

खामगाव फुलंब्री तालुक्यातील नरला येथील संपूर्ण गावाला गेली ४० वर्षांपासून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाण्याची टाकी आता पूर्णपणे जीर्ण झाली आहे. टाकीच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून त्यातून सतत पाणीगळती होत आहे. ही टाकी कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाल्याने, संपूर्ण नरला गावावर पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. १२० लोकसंक्या असलेल्या नरला गावातील स्थानिक…

Read More

वारकरी संप्रदायाने माणसातील ईश्वराला जागे केले- अब्दुल जावेद:कन्नड शहरात आषाढी एकादशीनिमित्त राबवले विविध उपक्रम‎

वारकरी संप्रदायाने जाती-धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन माणसातील ईश्वराला जागे केले आहे. सामाजिक समता, बंधुता आणि सलोखा हाच आषाढी एकादशीचा खरा संदेश आहे, असे प्रतिपादन नगरसेवक अब्दुल जावेद यांनी केले. आषाढी एकादशीनिमित्त पिशोर नाका येथे नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्नेहमिलन, वारकऱ्यांचे स्वागत व खिचडी वाटप कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती डॉ….

Read More