Headlines

जात प्रमाणपत्र जाणीवपूर्वक रद्द केले असल्यास कारवाई करणार:मंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांचा इशारा, नेमके काय म्हणाले विखे पाटील?

जात प्रमाणपत्र रद्द होण्याच्या बाबतीतील वस्तुस्थिती तपासण्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून, जात पडताळणी समिती ही घटनात्मक असल्यामुळे यामध्ये काही त्रुटी राहणार नाहीत याची मला खात्री आहे. याबाबत जाणीवपूर्वक काही झाले असेल, तर त्यावर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली….

Read More

सोने तारण फसवणूक, 19 तक्रारी दाखल:केरळहून पथक दाखल, उद्या स्ट्रांगरुममधील ऐवजाची मोजदाद होणार

अमरावती येथील एसटी स्टँड रोडवरील विमको टॉवरमधील एका वित्तीय संस्थेच्या स्थानिक शाखा व्यवस्थापकाने काही ग्राहकांचे सोने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला आहे. मंगळवारी दुपारी ही बाब उघडकीस आली, त्यानंतर सोने गहाण ठेवणाऱ्या ग्राहकांनी पोलिसांत तक्रारी नोंदवण्यास सुरुवात केली. मंगळवार सायंकाळपर्यंत सुमारे 19 ग्राहकांच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी कंपनीच्या कार्यालयावर…

Read More

विदर्भ साहित्य संघाच्या अमरावती शाखेची नवीन कार्यकारिणी:डॉ. श्यामसुंदर निकम अध्यक्षपदी, इतर पदाधिकाऱ्यांची निवड

विदर्भ साहित्य संघाच्या अमरावती शाखेची नूतन कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. तपोवनातील संत अच्युत महाराज खुले सभागृहात पार पडलेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. निवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक आणि लेखक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. वि.सा. संघाचे केंद्रीय शाखा समन्वयक विवेक कवठेकर यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी निवडण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष…

Read More

होमगार्ड उजळणी प्रशिक्षणाचा समारोप, तोटेवाड यांचे मार्गदर्शन:जवानांना कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि सेवाभावाचा संदेश दिला

काँग्रेसनगर येथील होमगार्ड प्रशिक्षण केंद्रात सुरू असलेल्या उजळणी प्रशिक्षण शिबिराचा समारोप गुरुवारी, ६ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी होमगार्ड जवानांना कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि सेवाभावाचा संदेश दिला. होमगार्ड ही केवळ एक स्वयंसेवी संघटना नसून, संकटाच्या प्रत्येक क्षणी नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणारी विश्वासार्ह शक्ती आहे, असे तोटेवाड…

Read More

नांदगाव तालुक्याला विशेष पॅकेज द्या: शेतकऱ्यांची मागणी:अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी ‘विशेष पॅकेज’ची मागणी केली आहे. शिवसेना (उबाठा) समन्वयक प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वाखाली आज, गुरुवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. पारंपरिक एनडीआरएफ निकषांनुसार मदत न देता, विशेष पॅकेज देण्याची त्यांची मागणी आहे. गेल्या आठवड्यात ३० व ३१ जुलै रोजी नांदगाव तालुक्यात सलग ३५ तास मुसळधार पाऊस…

Read More

रायपुर आश्रम शाळेत माध्यमिकला एकही शिक्षक नाही:24 पैकी 14 पदे रिक्त, आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर

चिखलदरा तालुक्यातील रायपुर येथील निवासी आदिवासी आश्रमशाळेत माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एकही शिक्षक उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शाळेतील एकूण २४ मंजूर पदांपैकी तब्बल १४ पदे रिक्त आहेत, ज्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. ‘खोज’ संस्थेचे ॲड. बंड्या साने यांनी या गंभीर शैक्षणिक अनुशेषाकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी आदिवासी विकास विभागाचे अपर…

Read More

एसआयआरला पुन्हा मुदतवाढ:प्रारूप यादी आता 24 ऑगस्ट रोजी, बीएलओ 17 पर्यंत घेणार घरभेटी

भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, आता १७ ऑगस्टपर्यंत मतदारांच्या गणना अर्जांची नोंदणी आणि डीजीटायझेशन केले जाईल, तर प्रारूप मतदार यादी २४ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नवीन कार्यक्रमानुसार, बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ)…

Read More

'शिवसेना कोणाची? जनतेनेच निकाल दिला':विरोधकांवर एकनाथ शिंदे यांचा घणाघात, विरोधकांची 'जुनी कॅसेट' सुरू असल्याचा टोला

शिवसेना पक्षाच्या मालकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर कडाडून हल्ला चढवत, “शिवसेना कोणाची याचा निकाल महाराष्ट्राच्या जनतेने आधीच दिला आहे. आम्ही 40 आमदारांसह बाहेर पडलो आणि जनतेने आम्हाला 60 आमदारांपर्यंत पोहोचवून आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले,” असे ठाम शब्दांत सांगितले. एकनाथ शिंदे म्हणाले, “जनतेच्या न्यायालयात आमचा विजय आधीच झाला आहे. त्यामुळे…

Read More

'त्वचादानासाठी देशात सक्षम यंत्रणा उभारा':खासदार विनोद तावडेंची राज्यसभेत आग्रही मागणी; 'नोटो'अंतर्गत स्किन बँक्स वाढवण्याचे आवाहन

गंभीररीत्या भाजलेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी देशात त्वचादान आणि ‘स्किन बँकिंग’ची व्यवस्था अधिक मजबूत करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्यसभा खासदार विनोद तावडे यांनी आज राज्यसभेत केले. या संवेदनशील मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधताना त्यांनी संपूर्ण देशभरात त्वचादानासाठी व्यापक यंत्रणा उभारण्याची मागणी केली. तसेच ‘नोटो’ (NOTTO) अंतर्गत देशभरात स्किन बँक्सची स्थापना, कोल्ड-चेन नेटवर्कची…

Read More

Namdev Dhasal Poem Controversy; Poet Santosh Dounde Faces Police Complaint

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले जगविख्यात कवी नामदेव ढसाळ यांची कविता पोस्ट केल्याबद्दल कवी संतोष दौंडे यांच्याविरोधात पोलिस ठाण्यामध्ये तक्रार झाल्याची माहिती समोर आलीय. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल झालीय. कवी स . संतोष दौंडे सुद्धा स्वतः कवी आहेत. त्यांचा ‘निर्जनांचे प्रदेश’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. मात्र, कविता पोस्ट केल्याचे प्रकरण थेट…

Read More