कोपरगाव तालुक्याला अवकाळीचा फटका:फळबागांचे मोठे नुकसान, आ. आशुतोष काळेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, पीके उद्ध्वस्त
कोपरगाव तालुक्यात अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाने ग्रामीण भागाला झोडपून काढले. या अवकाळी संकटामुळे अनेक गावांतील नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वादळामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली असून, अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. वीजवाहिन्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. या पार्श्वभूमीवर, स्थानिक आमदार आशुतोष काळे…