अहिल्यानगर:वेगवान युगात "आनंद चालीसा' ठरतेय मानसिक शांततेचा मार्ग
आजच्या वेगवान युगात प्रचंड धावपळ आणि सतत जिंकण्याच्या स्पर्धेमुळे मानवाची मानसिक शांतता हरवत चालली आहे. अशा काळात मानसिक स्थैर्य आणि आत्मिक समाधानासाठी जप, तप, आराधना आणि धर्माचरण अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी महाराज यांनी केले. नवी पेठ येथील जैन स्थानकात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या ‘आनंद चालीसा’ पाठाच्या वर्षपूर्ती सोहळ्यात ते बोलत…