Headlines

24 तासांत चोराला अटक;‎ महिलेचे दागिने केले परत:अक्कलकोट उत्तर पोलिसांच्या पथकाची कामगिरी

अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याच्या डी.बी. पथकाने वेगवान व तांत्रिक तपासाच्या जोरावर अवघ्या २४ तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीला अटक केली. चोरीस गेलेली अर्ध्या तोळ्याची बोरमाळ आणि पेन्शनची रू १२,६०० रोख रक्कमही पोलिसांनी हस्तगत करून ज्येष्ठ महिलेला दिलासा दिला आहे. समर्थ नगर येथील श्रीमती लक्ष्मीबाई रामचंद्र गड्डद (वय ७७) या फत्तेसिंह चौकातील के.पी. कॉम्प्युटर्स एसबीआय…

Read More

14 ऑगस्टला रक्तदानासह महाआरोग्य शिबिर:नियोजनासाठी महापौर श्रीचंद तेजवानी यांची आढावा बैठक

महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त १४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिर, रक्त तपासणी व सर्वसमावेशक आरोग्य शिबिराच्या पार्श्वभूमीवर गुरुवार ६ रोजी महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक झाली. बैठकीत शिबिराच्या नियोजनासंदर्भात विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. रक्तदान शिबिरासाठी आवश्यक सुविधा, रक्तपेढ्यांशी समन्वय, रक्तदात्यांची नोंदणी, वैद्यकीय पथकांची नियुक्ती, रक्तसंकलनासाठी आवश्यक साहित्य, नागरिकांच्या आरोग्य…

Read More

तुम्ही आमचे शोषण करणार अन् आम्हालाच हीन समजणार?:प्रसाद लाड समोर आले तर कानशीलात लगावेन, ओबीसीचे उपकार फेडा- लक्ष्मण हाके

आम्ही जर लोकप्रतिनिधींना निवडून देणारे आहोत, निवडून येणारे असतो तर आम्हाला हक्काच्या आरक्षणासाठी संघर्ष करण्याची काय गरज होती? असा सवाल करत ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी भाजप नेते प्रसाद लाड आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आमची मते घेऊन राजकारण करायचे, आमचेच शोषण करायचे आणि नंतर आम्हालाच हीन समजायचे, या भावनेमुळे…

Read More

महाराष्ट्रातील दु:ख-फडणवीसांकडून होणारा त्रास सांगण्यासाठीच शिंदे वारंवार दिल्लीला जातात:काँग्रेस नेते नाना पटोले यांचा महायुतीला टोला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात जो काही त्रास होत आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होणाऱ्या त्रासाचे दु:ख सांगण्यासाठीच ते वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करत असतात, असा टोला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी लगावला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उच्चस्तरीय भेट घेणार आहेत. या महत्त्वपूर्ण भेटीवर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले…

Read More

मराठ्यांच्या नोंदी रद्द करण्याचा सरकारचा कट!:नेत्यांची पोरं परदेशात, कार्यकर्त्यांच्या लेकरांसाठी मी लढतोय; पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या सुरुवातीलाच जरांगेंचा घणाघात

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. आगामी २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज अंतरवाली सराटी येथून आपल्या ‘पश्चिम महाराष्ट्र’ दौऱ्याला सुरुवात केली आहे. हा दौरा १२ ऑगस्टपर्यंत चालणार असून, यादरम्यान ते विविध जिल्ह्यांत जाऊन समाजाशी संवाद साधणार आहेत. मात्र, दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वीच माध्यमांशी…

Read More

नीट पेपरफुटीचा कट महिन्यांपूर्वी रचला गेला:CBI च्या आरोपपत्रात दावा- NTA चे तज्ञ प्रश्न लक्षात ठेवत होते, हॉटेलमध्ये जाऊन चिठ्ठ्यांवर लिहित होते

नीट-यूजी 2026 पेपरफुटी ही शेवटच्या क्षणाची घटना नव्हती, तर त्याचा कट अनेक महिन्यांपूर्वी रचण्यात आला होता. हा दावा सीबीआयने दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात दाखल केलेल्या 94 पानांच्या आरोपपत्रात केला आहे. हे आरोपपत्र 28 जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. यासंबंधीची माहिती शुक्रवारी समोर आली. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, नीटचा पेपर तयार करताना एनटीएचे तीन तज्ज्ञ प्रश्न लक्षात…

Read More

पुण्यात हवाई दलातील तोतया जवान पकडला:बनावट ओळखपत्र, गणवेश जप्त; लोहगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल

पुण्यात हवाई दलाचा तोतया जवान पकडण्यात आला आहे. शुभम विलास अंबुरे (वय 26) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून हवाई दलाचे बनावट ओळखपत्र आणि गणवेश जप्त करण्यात आला असून, लोहगाव पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी हवाई दलातील जवान ब्रिजेशकुमार मिश्रा (वय 48) यांनी लोहगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंबुरे…

Read More

मोहन भागवतांनी संघाच्या भाषेत सरकारला फटकारले:पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घ्यावी, मनसे नेते संदीप देशपांडेंचा टोला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ‘Gen Z’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भागवत यांनी सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला नाही, असे म्हटल्याचा उल्लेख करत देशपांडे म्हणाले की, “संघाच्या भाषेत सरकारला जितके फटकारता येईल तितके मोहन भागवतांनी फटकारले आहे.” पत्रकार परिषदेत बोलताना देशपांडे यांनी…

Read More

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय:दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या 114 PDF मासिकांवर बंदी; डिजिटल स्वरूपात ठेवले तरी होणार कारवाई

देशाच्या सुरक्षेला आणि अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींवर महाराष्ट्र सरकारने मोठा प्रहार केला आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) तपासादरम्यान समोर आलेल्या गंभीर माहितीनंतर, राज्य सरकारने दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या तब्बल 114 ‘पीडीएफ मासिकांवर’ तत्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. तसेच, या सर्व देशविघातक साहित्याच्या जप्तीचे आदेशही राज्य सरकारकडून अधिकृतपणे जारी करण्यात आले आहेत. नेमके काय आहे प्रकरण?…

Read More

40 वर्षांनंतर बोफोर्स प्रकरण बंद:SCने अंतिम याचिका फेटाळली, घोटाळ्याच्या आरोपांमुळे राजीव गांधी 1989 ची निवडणूक हरले होते

सुमारे 40 वर्षांपूर्वीच्या बोफोर्स घोटाळ्यावरील सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी शेवटची याचिकाही फेटाळून लावली. यामुळे आता हे प्रकरण पूर्णपणे संपुष्टात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने सांगितले की, आता या प्रकरणात पुढील सुनावणीची गरज नाही. 2005 च्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाला आव्हान देणारी अपीलही न्यायालयाने ऐकण्यास नकार दिला,…

Read More