Headlines

कृषी:कांदा दरात झालेल्या घसरणीने बळीराजाच्या अडचणीमध्ये वाढ; प्रतिक्विंटल १२०० पर्यंत घसरण, शेतकरी भाववाढीच्या प्रतिक्षेत

प्रतिनिधी | अहिल्यानगर महिनाभराच्या कालावधीत जिल्हाभरातील कांद्याच्या दरामध्ये मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला कांद्याला मिळणारा भाव एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लक्षणीयरीत्या खाली आला असून, यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम झाला आहे. मागील महिनाभरातील स्थिती पाहता सुमारे प्रतिक्विंटल सुमारे ३०० रुपयांची घसरण झाली आहे. सद्यस्थितीत एक नंबर कांदा अवघा ९०० ते १२००…

Read More

लुधियानात नशेत धुंद युवक-युवतीचा व्हिडिओ:उभे राहू शकत नव्हते, बस स्टँडवर रस्त्याच्या मधोमध डोलत राहिले; तरुणी चेहरा लपवताना दिसली

लुधियानामध्ये नशेत धुंद असलेल्या एका मुला-मुलीचा व्हिडिओ समोर आला आहे. बस स्टँडजवळ दोघे इतके नशेत होते की त्यांना चालताही येत नव्हते. युवक आपले डोके खाली घालून उभा होता आणि युवती नशेत डोलत होती. यावेळी मुलगी आपला चेहरा लपवताना दिसली. हा व्हिडिओ रविवार (12 एप्रिल) चा असल्याचे सांगितले जात आहे. 6 दिवसांपूर्वीही बस स्टँडजवळचा एक व्हिडिओ…

Read More

महात्मा फुलेंच्या विचारातून समताधिष्ठित समाज निर्मिती शक्य:डॉ. महेबूब सय्यद

प्रतिनिधी | अहिल्यानगर शेतकरी, कष्टकरी आणि कामगार वर्गाला न्याय देण्यासाठी महात्मा जोतीराव फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. आजच्या काळात त्यांच्या विचारांचे तंतोतंत अनुकरण केल्यास खऱ्या अर्थाने समताधिष्ठित समाजाची निर्मिती होईल, असे प्रतिपादन सामाजिक विचारवंत व समीक्षक प्रा. डॉ. महेबूब सय्यद यांनी केले. आत्मनिर्धार फाऊंडेशनच्यावतीने महात्मा जोतीराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथील…

Read More

हिंगोली पोलिसांची अभिमानास्पद कामगिरी:सीसीटीएनएस कामगिरीत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, २०१ पैकी मिळाले २०० गुण

पोलिस दलाच्या सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये हिंगोली जिल्हा पोलिस दलाने २०१ पैकी २०० गुण मिळवत राज्यातील ५३ पोलिस घटकामधून दुसरा क्रमांक मिळविला आहे. तर नांदेड परिक्षेत्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. राज्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हिंगोली जिल्हा पोलिस दलाच्या कामगिरीचे कौतgक केले आहे. राज्यात पोलिस दलाने सीसीटीएनएस प्रणाली सुरु केली आहे. यामध्ये गुन्हयांची ऑनलाईन नोंद करणे, गुन्ह्याचा तपास…

Read More

रशियाकडून तेल आयात दररोज 18.48 कोटी बॅरलवर पोहोचले:मार्चमध्ये 2 वर्षांचा उच्चांक; मध्य पूर्वेतील तणावानंतर भारताने खरेदी वाढवली

मध्य पूर्वेकडील वाढता तणाव आणि होर्मुझ मार्गावरील पुरवठ्यावर परिणाम झाल्यानंतर भारताने पुन्हा एकदा रशियाकडे मोर्चा वळवला आहे. आपल्या कच्च्या तेलाच्या गरजांपैकी सुमारे 90% आयात करणाऱ्या भारताने गेल्या दोन महिन्यांत रशियन क्रूडच्या खरेदीत मोठी वाढ केली आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारात तेलाची टंचाई वाढली आहे, त्यामुळे भारतीय रिफायनर्स आता रशियाकडून अधिकाधिक तेल मिळवण्याचा…

Read More

सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हावे असे वाटत असेल तर शुभेच्छा:पण असे राजकीय वातावरण तापत नाही, गिरीश महाजनांचा राऊतांना टोला

अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले असून, महायुतीच्या उमेदवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रविवारी (१२ एप्रिल) प्रचाराचा नारळ फोडला. यावेळेस आयोजित सभेत राजकीय भाषणांपेक्षा भावनांचा कल्लोळ अधिक पाहायला मिळाला. मंत्री अदिती तटकरे यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा…

Read More

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात केजरीवाल स्वतः बाजू मांडतील:मागील सुनावणीत न्यायमूर्ती स्वर्ण कांता यांना खटल्यातून बाजूला होण्याची मागणी केली होती

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या प्रकरणातील न्यायाधीश स्वर्ण कांता शर्मा यांना स्वतःला बाजूला (रिक्यूज) करण्याची मागणी करतील. केजरीवाल स्वतः आपली बाजू मांडतील. ते न्यायालयात पोहोचले आहेत. यापूर्वी या प्रकरणी 6 एप्रिल रोजी सुनावणी झाली होती. तेव्हा न्यायालयाने CBI ला उत्तर दाखल करण्याचे निर्देश…

Read More

बिबट्यांपासून बचावासाठी नागपूर विद्यापीठाने बनवला 'स्मार्ट पिंजरा':हल्ला होताच स्पीकर वाजतात, लोकांना मदतीचा मिळतो इशारा

विदर्भ आणि मराठवाड्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संशोधकांनी एक अभिनव उपाय शोधला आहे. त्यांनी ॲल्युमिनियमपासून ‘स्मार्ट पिंजरा’ तयार केला आहे, जो बिबट्याच्या हल्ल्यापासून संरक्षण देण्यासोबतच आजूबाजूच्या लोकांना सतर्क करतो. विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संजय जानराव ढोबळे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. अमित…

Read More

बार्टीच्या महासंचालकांना दणका:फेलोशिप जाहिरात प्रसिद्ध न केल्याने राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने बजावली नोटीस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी २०२३ च्या पीएचडी संशोधकांसाठीची फेलोशिप जाहिरात अद्याप प्रसिद्ध न केल्यामुळे, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (NCSC) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करत बार्टीच्या महासंचालकांना नोटीस बजावली असून ३० दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश…

Read More

हॉलिडे होम आता फक्त छंद नाही, तर कमाईचे साधनही:2026 पर्यंत 37 हजार कोटींची बाजारपेठ; भाड्याने 12% पर्यंत परतावा

गोवा, अलिबाग, कसौली आणि कुमाऊंच्या टेकड्यांसारख्या पर्यटन स्थळांवर आता लोक फक्त सुट्ट्या घालवण्यासाठी घरे खरेदी करत नाहीत. एक नवीन ट्रेंड उदयास आला आहे. हा आहे ‘भाड्याचे उत्पन्न’ (रेंटल इन्कम) मिळवण्याचा. म्हणजे, जो कधी जीवनशैलीसाठी घेतलेला निर्णय होता, तो आता एक गुंतवणूक धोरण बनला आहे. डोंगराळ प्रदेशातील आणि किनारी भागातील घरे भाड्याने देणे नवीन नाही, पण…

Read More