कालवा आवर्तनामुळे सव्वा लाख हेक्टरला लाभ:पुराचे वाहून जाणारे पाणी कालव्यातून सोडल्याने नियंत्रण, पाऊस नसल्याने पिके, खरिपाला हाेती गरज
उजनी धरणातून पूर नियंत्रणासाठी नदीपात्रातून व डाव्या कालव्यातून सोडलेले आवर्तन लाभ क्षेत्रातील पिकांसाठी नि शेतक-यांसाठी फायदेशीर ठरत आहे. भीमा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची एकूण लांबी सुमारे १३८ किलोमीटर आहे. या कालव्यामुळे पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे १ ते १.२५ लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळतो. जिल्ह्यात सर्वाधिक सिंचनाचा लाभ माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळतो. सुमारे ४५ ते…