Headlines

रांजणगाव महागणपती मंदिर 3 महिने बंद राहणार:जतन व संवर्धन कामांमुळे 15 एप्रिल ते 31जुलै 2026 पर्यंत भाविकांना प्रवेश नाही

श्री महागणपती मंदिर, रांजणगाव येथे सुरू असलेल्या जतन व संवर्धन कामांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, १५ एप्रिल २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ही कामे अष्टविनायक आराखड्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या निधीतून हाती घेण्यात आली आहेत. पुरातत्त्व विभागामार्फत ही दुरुस्ती व संवर्धनाची कामे मागील तीन महिन्यांपासून…

Read More

एआयने शेतीला नवी दिशा, उत्पादन वाढ शक्य:कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुणे कृषी महाविद्यालयाच्या वर्धापनदिनी आवाहन

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करून कृषी क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला. पुणे कृषी महाविद्यालयाच्या ३८ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी कृषी विद्यार्थ्यांना प्रयोगशीलता आणि नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. हा वर्धापनदिन कार्यक्रम सोमवार, १३ रोजी महाविद्यालयातील शिरनामे सभागृहात उत्साहात पार पडला….

Read More

Asha Bhosle Profile: Singers Biography, Love Story

5 तासांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूडच्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले. १९६०-७० च्या दशकातील इंडियन पॉप आणि कॅबरे आर्टिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा भोसले यांनी ८ दशकांच्या कारकिर्दीत १२,००० हून अधिक गाणी गायली आहेत. भारतीय संगीत जगतात जर एखाद्या आवाजाने प्रत्येक काळ, प्रत्येक प्रकार आणि प्रत्येक भावना अनुभवली असेल, तर त्या…

Read More

महसूलमंत्र्यांच्या हस्ते लोणीकंद येथे समाधान शिबिराचे उद्घाटन:'विकसित भारत-2047' च्या संकल्पपूर्तीसाठी शासन प्रयत्नशील – बावनकुळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत-२०४७’ च्या संकल्पपूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कल्याणकारी योजना पोहोचवण्यासाठी लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक निर्णय घेतले जात आहेत, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते लोणीकंद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित समाधान शिबिरात बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी…

Read More

चितळे बंधूंच्या अत्याधुनिक प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री करणार:भोरमध्ये 250 कोटींच्या 'रांजे व्हिजन पार्क'चे 16 एप्रिलला उद्घाटन

चितळे बंधू मिठाईवाले यांच्या भोर तालुक्यातील रांजे येथील अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन १६ एप्रिल रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. ‘रांजे व्हिजन पार्क’ असे नाव असलेल्या या प्रकल्पासाठी सुमारे २५ एकर जागेवर तब्बल २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. चितळे कुटुंबातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी इंद्रनील व केदार चितळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती…

Read More

रेडमीचा बजेट स्मार्टफोन A7 प्रो भारतात लॉन्च:जेमिनी आणि सर्कल टू सर्च सारखे AI फीचर्स, 6.9 इंच डिस्प्लेसह सुरुवातीची किंमत ₹12,499

शाओमीचा सब-ब्रँड रेडमीने सोमवारी भारतात आपला नवीन 5G स्मार्टफोन रेडमी A7 प्रो लॉन्च केला आहे. बजेट सेगमेंटमधील हा फोन मोठ्या बॅटरीसह आणि लेटेस्ट गूगल जेमिनी (Gemini) आणि सर्कल टू सर्च (Circle to Search) AI फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. यात 6.9 इंच डिस्प्ले, 6300mAh बॅटरी आणि 13MP कॅमेरा मिळेल. फोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला…

Read More

ज्ञानाधारीत अर्थव्यवस्था विकसित करावी लागेल:डॉ. अभय जेरे यांचे ‘स्टुडंट्स कन्व्हेन्शन’मध्ये प्रतिपादन

विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी जीडीपी वाढवणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी ज्ञानाधारित अर्थव्यवस्था विकसित करावी लागेल, असे मत भारताच्या नवनिर्मिती परिसंस्थेचे शिल्पकार व एआयसीटीईचे माजी उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांनी व्यक्त केले. एस.ए.ई. इंडियाच्या पश्चिम विभागातर्फे आयोजित ‘स्टुडंट्स कन्व्हेन्शन २०२५-२६’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम एआयएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडला. यावेळी व्यासपीठावर एस.ए.ई….

Read More

रील बनवणाऱ्या मुलीचा मृत्यू, बाईक दुभाजकाला धडकली:गाझियाबादमध्ये 70 च्या वेगात अपघात, मित्राची प्रकृती गंभीर

गाझियाबादमध्ये रील बनवताना बाईकवर स्टंट करत असलेल्या एका तरुणीचा डिव्हायडरला धडकून मृत्यू झाला. तरुणी भरधाव वेगाने बाईक चालवत होती, तर मागे बसलेला तरुण मोबाईलने व्हिडिओ शूट करत होता. याच दरम्यान बाईक अनियंत्रित होऊन डिव्हायडरला धडकली. धडक इतकी जोरदार होती की दोघेही अनेक फूट दूर उडून जमिनीवर पडले. दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते. स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती…

Read More

राष्ट्रउभारणीसाठी संवाद, समन्वय आवश्यक – नरेंद्र ठाकूर:पुणे येथे 'धर्माचार्य परिषद' संपन्न; पंचपरिवर्तनावरही झाले प्रबोधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख नरेंद्र ठाकूर यांनी राष्ट्रउभारणीसाठी संवाद आणि समन्वयाची गरज अधोरेखित केली. पुणे येथे आयोजित ‘धर्माचार्य परिषदे’त ते बोलत होते. यावेळी ह.भ.प. कैलास महाराज ढगे यांनी ‘पंचपरिवर्तन’ या विषयावर प्रभावी प्रबोधन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘विद्यापीठ भाग’ आणि ‘धार्मिक श्रेणी संपर्क विभाग’ यांच्या वतीने पाषाण येथील पुणे…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान:भांडेगाव येथे लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप, महसूल अधिकाऱ्यांची उपस्थिती

हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सोमवारी ता. १३ गावकऱ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करून इतर प्रश्‍नांची सोडवणूक करण्यात आली आहे. भांडेगाव येथे आयोजित कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, नायब तहसीलदार अनिता वडवळकर, नरेंद्र इंगळे, मंडळ अधिकारी शिल्पा चाटसे, पोलिस पाटील ज्ञानेश्‍वर जाधव, खांबाळा पोलिस पाटील सुरेश…

Read More