कळमकोंडा शिवारात कारमधून आलेल्या चोरट्यांनी सहा शेळ्या-दोन बोकड पळविले:हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, कारदेखील चोरीची असल्याचा संशय
हिंगोली तालुक्यातील कळमकोंडा शिवारात कारमधून आलेल्या चोरट्यांनी तीन शेतकऱ्यांच्या मालकिच्या सहा शेळ्या व दोन बोकड पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 12 गुन्हा दाखल झाला आहे. तर चोरट्यांनी वापरलेली कार देखील चोरीची असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांत जनावरे चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यामध्ये जनावरांना…