Headlines

री-नीट: 5 विद्यार्थ्यांसह 24 जणांना अटक:बिहारमध्ये 40 लाख घेऊन डमी विद्यार्थी परीक्षेला बसले, फिंगरप्रिंट घेणाऱ्या बायोमेट्रिक कंपनीचे 14 कर्मचारीही सामील

३ मे रोजी पेपरफुटीनंतर रविवारी नीट-युजी २०२६ ची पुन्हा परीक्षा झाली. यादरम्यान बिहारमध्ये एका मोठ्या सॉल्वर गँगचा पर्दाफाश झाला. खऱ्या परीक्षार्थीच्या जागी बसण्यास वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांनी ३०-४० लाखांत डील ठरवली होती. पोलिसांनी या प्रकरणात गँगच्या म्होरक्यासह पीएमसीएच, गयाजी मेडिकल कॉलेज, एम्स रायबरेली व बीएचयूच्या ५ मेडिकल विद्यार्थ्यांसह एकूण २४ जणांना अटक केली. यात परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचे फिंगरप्रिंट…

Read More

राममंदिर देणगी चोरी प्रकरणी आज-उद्या FIR दाखल?:टिन्नू यादवसह 80 जणांवर गुन्हा दाखल होणार; SIT आज योगींना देणार अहवाल

राम मंदिरातून देणगी चोरीच्या प्रकरणाची चौकशी करणारे विशेष तपास पथक (SIT) आज मुख्यमंत्री योगी यांना प्राथमिक अहवाल सादर करू शकते. रविवारी संध्याकाळी पथक योगींना भेटण्यासाठी पोहोचले होते. परंतु, भेट होऊ शकली नाही. मुख्यमंत्री आधीच नियोजित असलेल्या पावसाळी अधिवेशनासह इतर बैठकांमध्ये व्यस्त होते. एसआयटीने 7 पेन ड्राइव्हमध्ये डेटा सुरक्षित केला आहे. 6 दिवसांच्या चौकशीत 150 संशयितांची…

Read More

73 गुन्हे दाखल; 2.32 कोटींचा मुद्देमाल ताब्यात:ग्रामीण पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’

ग्रामीण पोलिस दलाने जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध एकाच वेळी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवून मोठी कारवाई केली आहे. शनिवारी रात्री ६ ते २१ जूनच्या पहाटे ६ वाजेपर्यंत राबवलेल्या या धडक मोहिमेत जिल्ह्यात ७३ गुन्हे दाखल करून ७७ आरोपींना अटक केली. कारवाईत १ कोटी ९८ लाखांची ११ वाळूची वाहने, गावठी कट्टे, तलवार, गुटखा, गोमांसासह २ कोटी ३२…

Read More

वीजपुरवठा सुरळीत करा; कायगाव येथील शेतकऱ्यांचा उपकेंद्रावर मोर्चा:८ तास वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी, महावितरणविरोधात संताप‎

शेतीपंपांसाठी सहा तास मिळणारा वीजपुरवठा आणि त्यातही वारंवार होणाऱ्या खंडित पुरवठ्यामुळे कायगाव (ता. गंगापूर) परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी मध्यरात्री गणेशवाडी येथील वीज उपकेंद्रावर मोर्चा काढला. महावितरणविरोधात संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारला आणि नियमित व सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी केली. यापूर्वी शेतीपंपांसाठी दररोज आठ तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून हा कालावधी…

Read More

नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे 10 आमदारनिवडून आणण्याचे लक्ष्य : दिलीप खैरे:पदभार स्वीकारताच संघटन बळकटीचा निर्धार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर दिलीप खैरे यांनी मुंबई नाका येथील पक्ष कार्यालयात पदभार स्वीकारला. या वेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करून नाशिकमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा क्रमांक एकचा पक्ष बनवण्याचा व नाशिक जिल्ह्यात आगामी निवडणुकीत १० आमदार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्यांनी दाखवलेल्या…

Read More

उद्धव म्हणाले- भाजप इतरांची मुले चोरते:शिवसेना 30 वर्षे काँग्रेसशी लढली, पण त्यांनी पक्ष फोडला नाही, भाजपने हे पाप केले

शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी पक्षातील फुटीवर बोलताना सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेने 30 वर्षे काँग्रेसशी लढा दिला. पण काँग्रेसने कधीही शिवसेनेला संपवण्याचा किंवा तिचे नाव हिरावून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मुंबईतील भांडुप येथे पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले- शिवसेनेने ज्या भाजपला तिच्या सुरुवातीच्या काळात पुढे जाण्यास मदत…

Read More

वणीत मंडप काढताना उच्चदाब वाहिनी धक्क्याने तरुणाचा मृत्यू:तारा 15 फुटांवर; संतप्त ग्रामस्थांचा महावितरणवर निष्काळजीपणाचा आरोप

शहरातील वृंदावन नगर परिसरात लग्नाचा मंडप काढताना लोखंडी पाईप ११ केव्ही उच्चदाब विजवाहिनीच्या संपर्कात आल्याने २७ वर्षीय मंडप व्यावसायिकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी महावितरणविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवरे येथील ऋषीकेश कैलास मत्सागर (२७) हा शनिवारी सायंकाळी मंडप काढण्यासाठी वृंदावन नगर येथे गेला होता. काम सुरू असताना लोखंडी पाईपचा वरून गेलेल्या…

Read More

लोणच्यासाठी दररोज तब्बल 20 टन कैरीची जळगावात‎ आवक:10 ऐवजी 15 रुपये किलो कैरी फोडण्याचे दर‎, 60 रुपये किलोने विक्री‎

शहरातील बाजारपेठेत सध्या लोणच्याची‎कैरी खरेदी ‎‎करण्यासाठी ग्राहकांची झुंबड‎उडाली आहे. वर्षभर हे ‎लोणचे नागरिकांच्या‎तोंडाला चव देत असते, त्यामुळे ‎जूनमध्ये‎लोणच्याची कैरी फोडून ती खरेदी‎करण्यासाठी ‎गृहिणी व नागरिक बाजारपेठेत‎येत असतात. सध्या‎ फोडलेली लोणच्याची‎कैरी दर्जानुसार ६० ते ८० रुपये किलो ‎‎दराने‎मिळत आहे.‎ तर त्या यंदा १० ऐवजी १५ रुपये‎किलोने फाेडून मिळत आहे. घाट, छत्रपती‎संभाजीनगर व जिल्ह्यातील काही ‎भागातून‎मोठ्या आकाराच्या…

Read More

चांदवडकरांनो, पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरा:नगराध्यक्ष वैभव बागूल यांचे नागरिकांना आवाहन‎

यंदा जून महिन्याचा मध्य उलटून गेला तरी मान्सूनने अपेक्षित गती घेतलेली नाही. तालुक्यात व चांदवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ओझरखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. या संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर, नागरिक व शेतकरी बांधवांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नगराध्यक्ष वैभव बागूल यांनी केले आहे. शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने…

Read More

Rajasthan Hail; MP-UP Heatwave Alert; June Rain Deficit

भोपाळ/जयपूर/लखनौ/पाटणा7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मान्सूनच्या पावसाच्या नोंदीच्या १२६ वर्षांच्या इतिहासात जून महिना दुसरा सर्वात कोरडा ठरण्याची चिन्हे आहेत. ४ जून ते २१ जून या कालावधीत देशात ५७.४ मिमी पाऊस झाला आहे, जो सामान्यपेक्षा ४२.२% कमी आहे. यापूर्वी २००९ मध्ये संपूर्ण जून महिन्यात अपेक्षित पावसापेक्षा ४९% कमी पाऊस नोंदवला गेला होता. यामुळे मध्य आणि वायव्य भारतातील…

Read More