Headlines

आज 17 केंद्रांवर 6 हजार 538 विद्यार्थी देणार ‘नीट’ परीक्षा

नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात नीट पेपर रविवार, २१ जून रोजी होणार आहे. १७ परीक्षा केंद्रावर ६ हजार ५३८ विद्यार्थी नीट देणार आहेत. हे केंद्र अकोला व मूर्तिजापूर येथील आहेत. परीक्षा केंद्रात सकाळी ११ वाजेपासून प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशाचा अवधी १.३० वाजता संपणार आहे. दुपारी २ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत परीक्षा होणार आहे….

Read More

महेश नवमी उत्सवास प्रारंभ; विविध सांस्कृतिक उपक्रमाचे केले आयोजन:महिला मंडळाच्या वतीने नृत्य अभिनय अन् वक्तृत्व स्पर्धा‎

सकल माहेश्वरी समाजाचे महेश नवमी पर्व महानगरात शुक्रवारपासून प्रारंभ झाले आहे. यास समाजाचे महिला-पुरुष उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. स्थानीय माहेश्वरी भवनात उत्सवात माहेश्वरी समाज ट्रस्ट, माहेश्वरी महिला मंडळ, प्रगती मंडळ, नवयुवती मंडळ, वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ तथा वरिष्ठ नागरिक महिला प्रकोष्ठच्या वतीने विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम सुरू आहे. भवनात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी…

Read More

पावसाच्या दांडीमुळे यंदा पेरण्या खोळंबल्या:नजरा आभाळाकडे, कृषीतज्ज्ञांनी धीर घरण्याचे केले आवाहन‎

खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असली तरी जिल्ह्यातील शेतकरी अजुनही मान्सुनच्या मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. जुन महिन्याची २० तारीख उलटली तरी अद्याप पावसाने हजेरी लावली नसल्यामुळे आधीच आर्थिक विवंचनेत असलेला बळीराजा चिंतातूर झाला आहे. जिल्ह्यात पावसाअभावी मोठ्या प्रमाणात पेरण्या खोळंबल्या आहेत. कृषीतज्ज्ञांनी शेतकऱ्यांना आताच पेरणी न करण्याचे आवाहन केले आहे. मृग नक्षत्राच्या आगमनानंतरही अपेक्षित पाऊस…

Read More

शेतरस्त्यांची दुरावस्था; पावसाळ्यात शेतकऱ्यांचे हाल:दुरूस्तीची मागणी, जिल्हा प्रशासन, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष‎

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्र्यांना थेट ईमेल पाठवून आणि वृत्तपत्रांमधून सातत्याने आवाज उठवूनही अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उरळ बु. ते लोहारा येथील शेत रस्त्यांचा प्रश्न रेंगाळलेलाच आहे. मान्सून जूनच्या अखेरीस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांची रस्त्याअभावी गैरसोय होणार आहे. प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांमध्ये…

Read More

सरसकट कर्जमाफीसाठी विकास मंचाचे निवेदन

राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मधील निकषांमुळे सर्व शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळणार नसल्याचा आरोप करत शेतकरी विकास मंचने चांदूर बाजारच्या तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. निवडणूक काळात शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र नव्या शासन निर्णयामध्ये विविध अटी व शर्ती…

Read More

14 केंद्रांवर 4,770 विद्यार्थी देणार आज ‘नीट’ची परीक्षा:पेपर पोहोचवण्यासाठी 14 सुरक्षित गाड्यांची सोय‎

शहरातील १४ केंद्रांवर ४ हजार ७७० विद्यार्थी रविवारी २१ जून रोजी नीटची पुर्नपरीक्षा देतील. ही परीक्षा सुरक्षित, शांततेत व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. परीक्षेशी संबंधित सर्वच विभागांचा एकमेकांशी संपर्क असावा, यासाठी शनिवारी २० रोजी मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक जबाबदार अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल क्रमांक एकमेकांकडे दिले. त्यामुळे संपर्क साधण्यास मदत…

Read More

विहिर निकामी; 2 किमीची पायपीट:मोरगडचे आदिवासी झिऱ्यातून काढताहेत पाणी, प्रशासनाने खोदलेली विहिरही बंद‎

पावसाळा सुरु झाला. परंतु मेळघाट अजूनही पाण्यासाठी त्राही-त्राही करतो आहे. चिखलदरा तालुक्यातील मोरगडच्या आदिवासींना गावाशेजारील नदीपात्रात झिरा खोदून पाणी मिळवावे लागत आहे. तर पाण्यासाठी प्रशासनाने तयार केलेली माखल्याची विहिर चक्क बंद पडली आहे. त्यामुळे दोन किलोमीटरची पायपीट करुन महिलांना पाणी आणावे लागत आहे. मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील मोरगड येथे गेल्या आठ दिवसांपासून गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर…

Read More

तरुणावर चाकूहल्ला; हवेत गोळीबार:असोरिया पेट्रोल पंप परिसरातील घटना; जुन्या वादातून हल्ला झाल्याचा संशय‎

नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असोरिया पेट्रोल पंपासमोर एका ३६ वर्षीय तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला. त्यानंतर त्याच ठिकाणी हवेत गोळीबारही झाल्याची धक्कादायक घटना घडली. हा प्रकार जुन्या वैमनस्यातून घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना शनिवारी (दि. २०) रात्री सुमारे नऊ वाजताच्या सुमारास घडली. शोएब अहमद एजाज अहमद (३६, रा. आझाद कॉलनी, अमरावती)…

Read More

शंकर नगरात गजानन महाराज विजयग्रंथ महापारायण सोहळा:पादुका दर्शन सोहळा, महाप्रसादालाही अनेकांची उपस्थिती‎

गंगा सावित्री निवासस्थान शंकर नगर येथे संत गजानन महाराज विजयग्रंथ महापारायण व पादुका दर्शन सोहळयामध्ये शेकडो महिला व गजानन भक्तांनी २१ अध्याय वाचून श्री संत गजानन महाराजांचा आशीर्वाद घेतला. याप्रसंगी शेकडो भाविकांनी पादुकांचे दर्शन घेत महाप्रसादाचाही लाभ घेतला. अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साहात हा सोहळा झाला. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिरसाने ओतप्रोत भरून गेला होता. भाजप…

Read More

काळानुसार पालकांनीही पालकत्वात बदल स्वीकारावा:डॉ. जयंत पांढरीकर, तारुण्यावस्थेतील मुलांच्या पालकांना ज्येष्ठ किशोरवस्था तज्ज्ञांचे आवाहन‎

आज वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात किशोरावस्थेतील मुले भरकटत जाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या पालकांनी काळानुसार पालकत्वातही बदल स्वीकारावा, असे आवाहन बालरोग व तरुण्यावस्था तज्ज्ञ डॉ. जयंत पांढरीकर, तसेच सर्वच तज्ज्ञांनी पनवेल येथील पालकांच्या भरगच्च कार्यक्रमात केले. महाराष्ट्र राज्य किशोरवस्थातज्ज्ञ संघटना व रायगड बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या वतीने पनवेल, मुंबई येथे वासुदेव बळवंत फडके सभागृहात “बदलत्या…

Read More