Headlines

कोल्हापुरी बंधारा फुटल्याचा फटका:बोरगाव बाजार परिसरात पाणीटंचाई, विकत घ्यावे लागते पाणी; पिके, पशुधनही संकटात‎

बोरगाव बाजार गावासह परिसरातील अनेक गावांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. गावात सुमारे १० ते १२ दिवसांनी एकदाच नळाद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे. अनेक कुटुंबांना खासगी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाण्याच्या कमतरतेचा फटका केवळ नागरिकांनाच नव्हे तर शेतकरी आणि…

Read More

मुख्यमंत्री पंचायत अभियान मूल्यांकन समितीने केली उंडणगावची पाहणी

उंडणगाव ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियान मूल्यांकन समितीने नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान समितीच्या सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात राबविण्यात आलेल्या विविध लोकाभिमुख विकासकामांची, स्वच्छता मोहिमेची आणि प्रशासकीय कामकाजाची पाहणी करून आढावा घेतला. मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना अधिक सक्षम, पारदर्शक आणि विकासाभिमुख बनविण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून…

Read More

लासलगावला 12 वर्षांपासून विनामूल्य योगाचे धडे:‘अंबिका योग कुटीर’तर्फे ऑनलाईन व ऑफलाईन पाच प्रशिक्षकांकडून आरोग्याचा जागर‎

आजच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण जीवनशैलीत निरोगी आरोग्य राखणे हे मोठे आव्हान बनले आहे. अशा काळात येथे १२ वर्षांपासून ‘आरोग्य यज्ञ’ सुरू आहे. मुंबई-ठाणे येथील ‘अंबिका योग कुटीर’च्या लासलगाव शाखेने ७०० हून अधिक नागरिकांना योगाचे विनामूल्य धडे देऊन त्यांचे जीवन निरोगी बनवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. योगसाधनेचा वर्ग सन २०१४ पासून सुरू झालेल्या या शाखेच्या वतीने…

Read More

जून महिना उलटूनही पावसाचा अजून पत्ता नाही:बळीराजा चिंतेत, ढोरकीन परिसरात धूळपेरण्या वाया जाण्याची भीती‎

जून महिना संपत आला तरी ढोरकीन आणि परिसरात पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. जिकडे पहावे तिकडे निरभ्र आकाश, कडक ऊन आणि वेगवान वाऱ्यांमुळे शेतातील ओल नष्ट झाली असून, खरीप हंगाम धोक्यात आला आहे. मागील दोन वर्षांतील अतिवृष्टीचे संकट झेलून सावरलेला शेतकरी आता दुष्काळाच्या छायेत सापडला आहे. यंदा वेळेवर पाऊस होईल या आशेने…

Read More

पैठण तालुक्यात 17 % खरिपाची पेरणी:कापूस, तूर, सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल‎

पैठण मान्सूनचे आगमन होऊन जवळपास महिना होत आला आहे, तरीही पैठण तालुक्यात अद्याप पावसाचा एकही थेंब पडलेला नाही. जून महिना संपत आला तरी अनेक गावांमधील शिवारे कोरडीठाक आहेत. अशा परिस्थितीतही तालुक्यातील काही बागायतदार शेतकऱ्यांनी मोठा धोका पत्करत खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. तालुक्यात आतापर्यंत सुमारे १७ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असल्याची माहिती तालुका…

Read More

दिल्ली- ट्रेनमध्ये चढण्यावरून प्रवाशाची मारहाण करून हत्या:योगा एक्सप्रेसमध्ये सीटवरून वाद; मुझफ्फरनगरमधून 8 जणांना ताब्यात घेतले

दिल्लीतील शाहदरा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक-3 वर शनिवारी सकाळी योगा एक्सप्रेसच्या जनरल बोगीमध्ये चढण्यावरून वाद झाला. सीट मिळवण्याच्या आणि चढण्याच्या घाईत सुरू झालेला वाद काही मिनिटांतच जीवघेणा हल्ला बनला. आरोप आहे की, प्रवाशांच्या एका गटाने 32 वर्षीय पंकज धामा यांना घेरून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. पंकज प्लॅटफॉर्मवर कोसळून बेशुद्ध झाले. त्यांना जीटीबी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे…

Read More

डॉ. संतोष पाटील यांची थेट वनमंत्र्यांकडे तक्रार‎:रसायनाचे 23 ड्रम वनक्षेत्रामधून गायब

सिल्लोड-सोयगाव तालुक्यात येणाऱ्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा वन विभागाच्या हद्दीत तोंडापूर धरणाच्या पाठीमागील ‘राक्सा बीट’ (कक्ष क्र. ५०५ डी) मध्ये १६ जून रोजी आढळलेले घातक रसायनाचे २३ ड्रम अचानक गायब झाले आहेत. या गंभीर प्रकारामुळे वन्यजीव संरक्षक डॉ. संतोष पाटील आणि भूषण कानडजे यांनी थेट वनमंत्र्यांकडे तक्रार करत दोषी वन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी…

Read More

जिल्हा बँकेची निवडणूक महायुती एकत्र लढणार:अध्यक्षपदासाठी मंत्री अतुल सावे, विलास भुमरे, समीर सत्तार यांची नावे चर्चेत‎

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजप महायुती करूनच निवडणूक लढण्याचे निश्चित झाले आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे मुंबईत महायुतीच्या प्रमुखांची बैठक पार पडली. त्यामध्ये एकत्र निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे मनपा आणि जिल्हा परिषदेत स्वतंत्र निवडणुका लढवलेले हे तीनही पक्ष सहकाराची निवडणूक एकमेकांच्या साथीने लढणार आहेत. छत्रपती संभाजीनगरात २१…

Read More

50 हजार रोपे पडून:11 हजार हेक्टर वनक्षेत्र संकटामध्ये; 3 वर्षांपासून वृक्षलागवड निधी नाही, कन्नडला वन विभागाच्या 850 हेक्टरवर अतिक्रमण‎

तालुक्यातील ११ हजार हेक्टर विस्तीर्ण वनक्षेत्राची प्रादेशिक वन विभागाकडे आहे. मात्र, तीन वर्षांपासून शासनाकडून वृक्षलागवडीसाठी निधीच उपलब्ध झालेला नसल्याने जंगलांचे संवर्धन करणे जिकरीचे झाले आहे. तसेच दोन वाटिकांमध्ये ५० हजार रोपे तयार असून, त्याला मागणी नसल्याने ही झाडे तशीच पडून आहे. त्यात विभागाच्या ८५० हेक्टरवर अतिक्रमण असून, अपुऱ्या मनुष्यबळामुळे या विभागाला गैरसोयीचा सामना करावा लागत…

Read More

15 वर्षांपूर्वीचा बंधारा, 10 वर्षांपासून कोरडाठाकच:वसई शिवारातील शेतकऱ्यांची होतेय गैरसोय‎

सिल्लोड तालुक्यातील वसई शिवारातील गट नंबर १८५ मधील सिमेंट बंधारा गेल्या दहा वर्षांपासून दगड, गोटे आणि गाळाने पूर्णपणे साचला आहे. पावसाळ्यात यात पाण्याचा एक थेंबही साचत नसल्याने, हा बंधारा परिसरातील शेतकऱ्यांसाठी ‘देखना’ ठरत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बांधकाम विभागाकडून सुमारे १५ वर्षांपूर्वी या ठिकाणी सिमेंट काँक्रीट बंधारा उभारण्यात आला होता….

Read More