Headlines

चापानेर येथे तीन घरे फोडली, मंदिरातही चोरी:सुमारे साडेसहा लाख रुपयांचे दागिने लंपास, नागरिकांच्या घरांच्या बाहेरून लावून घेतल्या कड्या; कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद‎

कन्नड तालुक्यातील चापानेर येथे बुधवारी रात्री चोरांनी धुमाकूळ घातला. जैन मंदिरासह तीन घरे फोडली. चोरी करताना आजूबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावून घेतल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. चोरट्यांनी साडेसहा लाखांचे दागिने लंपास केले. . चापानेर येथे निवृत्त कर्मचारी अशोक विनायक माळोदे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडला. परंतु चोरांच्या हाती काही लागले नाही. त्यानंतर त्यांनी रामहरी कचरू भाडाईत…

Read More

पैठण, सिल्लोडला बंद, गंगापुरात निषेध मोर्चा:दिल्लीत विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित आघाडीचे आंदोलन‎

दिल्ली आंदोलनातील विद्यार्थी लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी महाराष्ट्र बंद पाळला होता. या जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सिल्लोड, पैठण, कन्नड, सोयगाव, पाचोड, गंगापूर, लासूर स्टेशन येथे बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. काही ठिकाणी मोर्चा काढला. आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन दिले. काही ठिकाणी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गुरुवार…

Read More

महाराष्ट्रात 23 जुलैपर्यंत महिन्याच्या सरासरीपेक्षा 34 टक्के अधिक पाऊस:आज पुणे घाट परिसराला रेड, नाशिकला ऑरेंज, नंदुरबार, अकोल्याला यलो अलर्ट

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली पावसाची हजेरी गुरुवारीही कायम राहिली. अनेक भागांत संततधार सुरू होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्यात पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असून त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होईल. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैमध्ये मात्र मान्सूनने दमदार पुनरागमन केले आहे. २३ जुलैपर्यंत राज्यात जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षा ३४ टक्के…

Read More

अंबरनाथ हादरले:ठाण्यामध्ये लिव्ह-इन पार्टनरच्या मुलास ठार मारले, आरोपी अटकेत

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ पश्चिम भागात आपल्या लिव्ह-इन पार्टनरच्या ७ वर्षीय मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील एका रुग्णालयात उपचारादरम्यान या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर ही कारवाई केली. आरोपी विकास हुकूम सिंग (२४) याने हसनैन ऊर्फ जउद्दीन याला बेदम मारहाण केली. हसनैनची आई सकीना (२८) हिने आपल्या पतीपासून विभक्त होऊन आरोपीसोबत राहण्यास…

Read More

केतनच्या हत्येसाठी लोहगड निश्चित करण्यापूर्वी अन्य ठिकाणांची पाहणी:केतनला जखमी करण्यासाठी ‘सुपारी’ देण्याच्या पर्यायावर चर्चा

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील तपासात कटाच्या नियोजनासंदर्भातील आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केतनचा मृत्यू अपघात असल्याचे भासवण्यासाठी लोहगड किल्ल्याची निवड करण्यापूर्वी सिया आणि चेतन यांनी लोणावळा परिसरातील अनेक दुर्गम ठिकाणांची माहिती घेतल्याचे तपासातून पुढे आले आहे. यामध्ये लोणावळ्यातील टायगर पॉइंट, लोहगडलगतचा विसापूर किल्ला तसेच परिसरातील अन्य किल्ल्यांचा समावेश होता, अशी माहिती तपास पथकातील एका…

Read More

धाराशिव जिल्ह्यात गैरव्यवहार:22,400 शेतकऱ्यांना कागदोपत्री कृषी साहित्य, 21 कोटींचा घोटाळा

जिल्ह्यातील २२ हजार ४०० शेतकऱ्यांना कृषी साहित्य फक्त कागदावर वाटप करून २१ कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे एक गुंठाही शेती नाही तसेच मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या नावाचा गैरवापर करत त्यांना हे कृषी साहित्य वाटप करण्यात आले असे कागदावर दाखवण्यात आले आहे. माहिती अधिकारात ही माहिती समोर आली आली आहे, त्याचे पुरावे ‘दिव्य मराठी’कडे आहेत….

Read More

सोनम वांगचुक यांनी 27 व्या दिवशी उपोषण सोडले:मंत्री नड्डा मध्यरात्री 12.30 वा. मेदांतात, ज्यूस पाजला; CJP समर्थकांनी बॅरिकेड्स तोडले, आंदोलन सुरूच

पेपरफुटीविरोधात उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांनी २७ व्या दिवशी उपोषण सोडले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजता गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात पोहोचले. तिथे त्यांनी वांगचुक यांना सरबत पाजून त्यांचे उपोषण सोडवले. वांगचुक यांनी उपोषण संपवल्याबद्दल कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आनंद व्यक्त केला. मात्र,…

Read More

महाराष्ट्रात 8.61 टक्के विद्यार्थी शिकतात- भुसे:केंद्र सरकारकडून फक्त 3.06 टक्के निधी मिळताे

एकीकडे परिक्षांतील गैरप्रकारांवरून केंद्र सरकारवर विद्यार्थी, युवक व विरोधक तुटून पडलेले असताना आता केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या शिक्षणासाठी आवश्यक निधी मिळत नसल्याची आकडेवारीच महायुती सरकारमधील शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मांडल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असताना, केंद्राच्या ‘समग्र शिक्षा’ अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला अवघा ३.०६…

Read More

‘माउली… माउली’च्या गजरात बाजीराव विहीर रिंगण सोहळा:आज पालखी सोहळा पंढरपूरकडे करणार प्रस्थान

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रिंगण बाजीराव विहीर (ता. पंढरपूर) येथे लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडले. वाखरीच्या पालखी तळावर दाखल झालेल्या विविध संतांच्या दिंडी सोहळ्यातील हजारो वारकरी बाजीराव विहीर परिसरात दाखल झाले होते. सायंकाळी ५.३० वाजता माउलींचा सोहळा रिंगणस्थळी आला. यानंतर सेवेकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर खांद्यावरून पालखी नाचवत रिंगण पाहण्यासाठी थांबलेल्या वारकऱ्यांच्या…

Read More

श्रींगोदेत शेततळ्यात बुडालेल्या 2 मुलींचा रुग्णवाहिका न मिळाल्याने उपचाराविना मृत्यू:संतप्त ग्रामस्थांकडून लोणी व्यंकनाथ आरोग्य केंद्राला 4 तास टाळे

अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदे तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने उपचाराअभावी दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना गुरुवारी घडली. आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे संतप्त गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र . गुरुवारी सकाळी ९ वाजता आनंदी अनिल कांडेकर (४) व वीरा प्रवीण कांडेकर (३) या दोन मुली खेळताना शेततळ्यात पडल्या. गावकऱ्यांनी त्यांना तात्काळ बाहेर काढून प्राथमिक…

Read More