अखेर पावसाची प्रतीक्षा संपणार?:राज्यातील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट; 20 जुलैनंतर मान्सून आणखी सक्रिय होण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा सक्रिय होण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला असून, पुढील दोन-तीन दिवसांत अनेक जिल्ह्यांत हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली…