विद्यार्थ्यांची माफी मागा, गुन्हे मागे घ्या:काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, लाठीमार प्रकरणावरही संताप
नीट परीक्षा, पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन हे पूर्णपणे स्वयंस्फूर्त असून शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेत बदल व्हावेत, हीच त्यामागची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी विद्यार्थ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्याची, लाठीमाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागण्याची आणि…