मेळघाटातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली:बिजूधावडीतील 25 ते 30 विद्यार्थ्यांना तीव्र पोटदुखी, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील टिटंबा आश्रमशाळेतील 69 विद्यार्थ्यांना विषबाधेसदृश त्रास झाल्यानंतर, आता बिजूधावडी आश्रमशाळेतील 25 ते 30 विद्यार्थ्यांना अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याची घटना समोर आली आहे. एकापाठोपाठ दोन आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने पालकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण पसरले आहे. शनिवारी (दि. 25) रात्री टिटंबा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला होता….