Headlines

संभाजीनगरसह राज्यातील 8 दूध डेअरींवरील एफडीएच्या कारवाईला हायकोर्टाची स्थगिती:त्रुटी सुधारण्यास 14 दिवस मुदत दिली नाही

गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर दूध आणि अन्न विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, या कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहिल्यानगर आणि जालना येथील ८ दूध डेअरींवरील कारवाईला अंतरिम स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती संतोष चपळगावकर यांच्यासमोर या याचिकांवर सुनावणी…

Read More

आषाढी सोहळ्यानंतर पंढरपुरातून लाखो वारकरी परतीच्या मार्गावर:दुपारपर्यंत वाहतूक सुरळीत झाल्याचे चित्र

श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस पूर्ण झाल्यानंतर आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडताच लाखो वारकऱ्यांनी रविवारी परतीचा प्रवास सुरू केला आहे. यामुळे पंढरपूरचे बसस्थानक, रेल्वेस्थानक तसेच प्रमुख रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. दरम्यान, मंदिर परिसर, दर्शनरांग वगळता शहरात सर्वत्र वातावरण अगदी सामान्य झाल्याचे दिसून येते. शनिवारी एकादशी सोहळा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री…

Read More

प्रगतिशील शेतकरी:सेंद्रिय कर्ब संवर्धनातून प्रति एकर 82 टन ऊस उत्पादन, जुन्नरमधील शेतकऱ्याचा ‘सुपरकेन’ तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग

जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे येथील प्रयोगशील शेतकरी विकास हरिभाऊ चव्हाण यांनी सेंद्रिय कर्ब संवर्धन, पाचट व्यवस्थापन आणि ‘सुपरकेन’ रोपवाटिका तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ साधली आहे. त्यांच्या ४० एकर शेतीमध्ये प्रति एकर सरासरी ८२ टन ऊस उत्पादन मिळत आहे. एका हंगामात एकरी सुमारे २ लाख ३० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो….

Read More

जायकवाडी धरणात पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ:53 टक्के साठा; मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना सिंचनाची आशा

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. जायकवाडी धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून, धरणातील पाणीसाठा ५३ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे रब्बी हंगामासाठी सिंचनाचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. रविवारी रात्री धरणात ४७ हजार क्युसेक पाण्याची आवक…

Read More

संसद मार्चमध्ये पोलिसांच्या कारवाईविरोधात सोमवारी सुनावणी:सुप्रीम कोर्टात 2 याचिका दाखल; पोलिसांवर अवाजवी बळाचा वापर केल्याचा आरोप

सर्वोच्च न्यायालय सोमवारी दोन वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी करणार आहे. या याचिकांमध्ये आरोप आहे की, NEET पेपरफुटी आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अत्याचार केले. या याचिका २० जुलैच्या संसद मार्चशी संबंधित आहेत, जो कॉकरोच जनता पार्टीने आयोजित केला होता. २७ जुलैच्या कॉज लिस्टनुसार, या याचिका सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही….

Read More

स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना साडेचार कोटींची वीज सवलत:छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील पावणेतीन लाख ग्राहकांना लाभ

आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना विजेचा अचूक वापर कळतो, तसेच वापरावर नियंत्रण ठेवणेही शक्य होते. महावितरण घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीजवापरावर मोठी सवलत देत आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील पावणेतीन लाख घरगुती ग्राहकांना आतापर्यंत साडेचार कोटी रुपयांहून अधिक रकमेची सवलत मिळाली आहे. ही सवलत मिळवण्यासाठी ग्राहकांनी स्मार्ट टीओडी मीटर बसवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे….

Read More

पाच वर्षीय चिमुकलीच्या डोळ्यात पेन्सिल घुसली:घाटी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया, दृष्टी वाचवण्यात यश

एका पाच वर्षीय मुलीच्या डोळ्यात खेळताना पेन्सिल घुसली. या घटनेत चिमुरडी गंभीर जखमी झाली होती. या पाच वर्षीय चिमुकलीची दृष्टी वाचवण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील डॉक्टरांना यश आले आहे. नेत्रशल्य चिकित्सा शास्त्र विभागाने यशस्वी शस्त्रक्रिया करून चिमुकलीला नवजीवन दिले. सुरुवातीला या चिमुकलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शस्त्रक्रियेची गुंतागुंत आणि…

Read More

अमरावतीच्या विकासावर अजितदादांचे प्रतिबिंब- संजय खोडके:जनसेवा सप्ताहात २५०० दाखल्यांचे वितरण, विविध योजनांचा लाभ

अमरावती शहराच्या विकासावर लोकनेते अजितदादा पवार यांच्या कार्याचे प्रतिबिंब उमटले आहे, असे प्रतिपादन आमदार संजय खोडके यांनी केले. जनसेवा सप्ताहांतर्गत आयोजित महाराजस्व अभियान व समाधान शिबिरात त्यांनी हे मत व्यक्त केले. या शिबिरात सुमारे २५०० विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले, ज्यामुळे नागरिकांना अनेक योजनांचा लाभ घेता आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत…

Read More

कवी शिवा इंगोले यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन:डॉ. अनिल सकपाळ म्हणाले- भारतीय तत्त्वज्ञानाचा संघर्ष समजून घ्या

ज्येष्ठ कवी व साहित्यिक शिवा इंगोले यांच्या “अक्षराचा तिसरा डोळा” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुंबईत पार पडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशनच्या वतीने साहित्यिक बाबुराव बागुल यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. अनिल सकपाळ यांनी सांगितले की, “कवी हा संस्कृतीला प्रश्न…

Read More

महात्मा फुले हायस्कूल व प्राथमिक विभागातर्फे पालखी सोहळा उत्साहात संपन्न:वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाली विद्यार्थी

25/07/ 2026 शनिवार रोजी देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने महात्मा फुले हायस्कूल व प्राथमिक शाळेतर्फे पारंपरिक पालखी सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल वानखेडे, तसेच प्राथमिकचे मुख्याध्यापक अफसर शेख यांनी पालखीचे पूजन करून पालखी सोहळ्याची सुरुवात केली. मालती वाल्हे यांनी वारीची वैशिष्ट्ये सांगितली. या कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी होत भक्तिमय…

Read More