Headlines

हरित अमरावतीसाठी नागरिकांचे एक पाऊल पुढे,:बडनेरा ते शिंगणापूर चौफुलीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा लागणार वड, पिंपळ, कडूनिंबाची झाडे‎

वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती-यवतमाळ मार्गावरील बडनेरा ते शिंगणापूर चौफुली तसेच चांदूर रेल्वे मार्गावरील राजुरा गावापर्यंत रस्त्य . या दोन्ही प्रमुख मार्गांच्या अनेक भागात सावली देणाऱ्या वृक्षांचा अभाव जाणवत असल्याने उन्हाळ्यात प्रवाशांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतो. बडनेरा ते शिंगणापूर चौफुली…

Read More

नेरपिंगळाई येथील गणेश चौकात गुंजला ‘बदलाव जरूरी हैं’चा नारा:महिला, युवक, विद्यार्थी व शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती‎

‘बदलाव जरूरी है…चलो दिल्ली!’ या घोषणांनी येथील गणेश चौक परिसर दुमदुमून गेला. १ सप्टेंबरच्या ‘चलो दिल्ली’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आयोजित केलेल्या जनजागरण सभेमुळे असे झाले होते. सभेला महिला, युवक, विद्यार्थी, शेतकरी तसेच नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाला समविचारी राजकीय पक्ष आणि मित्रपक्षांच्या पदाधिकारी-कार्यकर्त् यांनीही हजेरी लावली होती. तरुणाईसमोरील बेरोजगारी, शिक्षणाच्या वाढत्या खर्चाचा प्रश्न…

Read More

अंबा नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर महापौरांचा दणका:दंडांची कारवाई, हॉस्पिटलचा जैव वैद्यकीय कचरा नाल्यात टाकणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश‎

शहरातील नाले, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिकेने आता कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. शहरातील राजकमल चौक ते राजापेठ या मार्गादरम्यान मध्यभागी असलेल्या अंबा नाल्याची महापौर श्रीचंद तेजवानी यांनी रविवार, ३० ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. संबंधितांकडून दोन दंड आकारण्यात आले. शहर स्वच्छ ठेवणे…

Read More

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार:सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मुसळधार सरींचा अंदाज, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम

ऑगस्ट महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने राज्यातील अनेक भागांत पावसाची तूट कायम आहे. मात्र, सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता असून, राज्यातील काही भागांत मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार,…

Read More

गायक अंकित हत्याकांड, 2 शूटर्सचे एन्काउंटर:यूपी पोलिसांची कारवाई, हरियाणाला जात होते पळून; 20 राऊंड गोळीबार, 2 फरार

हरियाणवी गायक अंकित बालियान हत्याकांडातील दोन शूटर सुमित आणि मोहित यांना यूपी पोलिसांनी सोमवारी सकाळी एका चकमकीत ठार केले. शामलीचे एसपी नरेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, दोन्ही शूटर बाईकने शामलीहून सोनीपत (हरियाणा) च्या दिशेने पळून जात होते. खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी त्यांना घेरले. पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनाही गोळीबार करावा लागला. दोन्ही…

Read More

90 हजार मातीच्या बाप्पांमधून निसर्गरक्षणाचा दिला संदेश:यंदा घराघरांत विराजमान होणार पर्यावरणपूरक गणेशमूर्ती : मूर्तींच्या किमतीत 10 ते 15 टक्क्यांची झाली वाढ‎

लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे पंधरा दिवस उरले असून, घराघरांत आणि गल्लीबोळांत गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. यंदाचा गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सवापुरता मर्यादित न राहता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ठरणार आहे. मूर्तिकारांनी गेल्या आठ महिन्यांपासून अथक परिश्रम घेत तब्बल ९० हजार ते १ लाख मातीच्या गणेशमूर्ती साकारल्या आहेत. पर्यावरणपूरक मूर्तींच्या वाढत्या मागणीमुळे यंदाच्या गणेशोत्सवाला निसर्गरक्षणाची…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:श्रावण सोमवारी जुळून आला संकष्टीचा दुर्मिळ योग, पिता-पुत्राच्या पूजेसाठी उसळणार मंदिरांत गर्दी‎

श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी श्रीगणेशाला समर्पित असून, यंदा २०२६ मध्ये ही संकष्टी चतुर्थी सोमवारी ३१ ऑगस्ट रोजी तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या दुर्मिळ तसेच विशेष योगायोगावर आलेली आहे. यामुळे या सोमवारी शिवालय व श्री गणेश मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. ही हेरंब संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी महादेवाला बिल्वपत्र व श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करणे हितावह…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:मनपा रोज देणार 200 जन्म-मृत्यू दाखले; १० हजार प्रलंबित अर्जांवर ॲक्शन प्लॅन

आयडी अर्थात मंजुरी (डिजिटल अनुमती) देण्याचे अधिकार शासनाने गोठवल्यामुळे महानगर पालिकेत सध्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळण्यास किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे १० हजारावर अर्ज प्रलंबित आहेत. ते निकाली काढण्यासाठी मनपाने कालबद्ध कार्यक्रम आखला असून सर्वप्रथम प्रलंबित अर्जांचे अतिरिक्त मनुष्यबळ वापरून विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार ४५०० अर्ज मनपाच्या जन्म-मृत्यू विभागात मंजूर केले जातील,…

Read More

जलतरणात अमरावतीचे वर्चस्व; हव्याप्रच्या खेळाडूंचे सुवर्ण यश:52 व्या राज्यस्तरीय वॉटर पोलो चॅम्पियनशिपमध्ये अजिंक्यपद‎

तब्बल १४ वर्षांनी तीन दिवस रंगलेल्या ५२ व्या ज्युनिअर राज्यस्तरीय वॉटर पोलो चॅम्पियनशिप २०२६ मध्ये यजमान श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीच्या मुले व मुलींच्या संघाने आक्रमक सांघिक खेळासह दणदणीत यश मिळवून डंका मिरवला. दोन्ही गटांत जेतेपदासह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. मंडळाच्या मुलांच्या तसेच मुलींच्या संघांनी उत्कृष्ट सांघिक खेळ, वेग, कौशल्याच्या बळावर प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून…

Read More

आसिम रियाजची भव्या सिंगला कायदेशीर नोटीस:भव्याने म्हटले होते- तो वेडा माणूस, मारामारी करतो; धर्म परिवर्तनाचे झाले आहेत आरोप

बिग बॉस 13 फेम आसिम रियाजने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर भव्या सिंगला कायदेशीर नोटीस (सीज अँड डिजिस्ट) पाठवली आहे. भव्याने एका पॉडकास्टमध्ये आसिमवर मारहाण केल्याचा आणि दुबईमध्ये एका महिलेच्या पैशांवर अवलंबून असल्याचा गंभीर आरोप केला होता. IANS नुसार, आसिमच्या वकिलांनी हे दावे पूर्णपणे खोटे आणि बदनामी करणारे असल्याचे म्हटले आहे. नोटीसमध्ये भव्या आणि संबंधित मीडिया प्लॅटफॉर्म्सना…

Read More