Headlines

पायी दिंडी:महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग दर्शन पायी दिंडीचे जाफराबादला स्वागत

जाफराबाद तालुक्यातील जवखेडा ठेंग येथील जनार्दन स्वामी यांच्या प्रेरणेने श्री ज्ञानेश्वर आश्रमाचे परमपूज्य ज्ञानेश्वर माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी निघालेल्या पायी दिंडीचे जाफराबाद शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी झाली. जयघोष झाला. टाळ-मृदंगाचा गजर झाला. भक्तिमय वातावरणात नागरिकांनी दिंडीचे स्वागत केले. ३१ जुलै रोजी जवखेडा ठेंग येथील श्री ज्ञानेश्वर आश्रमातून सुमारे ५०…

Read More

ऑगस्टमध्ये 5 बदल- व्यावसायिक सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त:तत्काळ तिकिटासाठी नवीन टोकन प्रणाली; CKYC 2.0 ची नवीन प्रणालीही लागू

आज म्हणजेच, 1 ऑगस्ट 2026 पासून कमर्शियल सिलेंडर सरासरी 200 रुपयांपर्यंत स्वस्त झाला आहे. तर, तात्काळ ट्रेन बुकिंगचे नियम आणि CKYC चे नियम बदलले आहेत. याशिवाय 3 ते 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आरबीआयच्या बैठकीत नवीन व्याजदरांवर निर्णय घेतला जाईल, ज्याचा तुमच्या ईएमआयवर परिणाम होऊ शकतो. ऑगस्टमध्ये होणारे 5 मोठे बदल… 1. कमर्शियल गॅस सिलेंडर सरासरी…

Read More

नागरिकांचे हाल:पिंपळगाव रेणुकाईच्या रस्त्यावर पाण्याचे तळे, गुडघाभर पाण्यातून जीवघेणा प्रवास

भोकरदन तालुक्यातील जुईधरण फाटा ते वालसांवगी फाटा या महत्त्वाच्या रस्त्याचे काम रखडले आहे. नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिंपळगाव रेणुकाई मुख्य फाट्याजवळ रस्ता खोदून ठेवलेल्या ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. मोठे डोह तयार झाले आहेत. वाहनचालक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. रोज…

Read More

सामाजिक उपक्रम:दानापूर येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वीकारली वृक्षसंगोपनाची जबाबदारी

दैनिक दिव्य मराठीच्या “एक वृक्ष, एक जीवन’ या पर्यावरणपूरक अभियानाला भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेने प्रतिसाद दिला आहे. शाळेतील दहा विद्यार्थ्यांनी स्वखर्चाने वृक्षरोपे आणून लागवड केली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः लावलेल्या वृक्षाच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे शाळा परिसर अधिक हिरवागार होण्यास मोठी मदत होणार आहे. ३० जुलै…

Read More

विद्यापीठात 10 ऑगस्टपासून हेल्मेट नसेल तर नसणार एन्ट्री:दुचाकीचालकांसह मागे बसणाऱ्यालाही सक्ती; प्रशासनाचा इशारा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात येत्या १० ऑगस्टपासून दुचाकी वाहनांसाठी हेल्मेट वापरणे पूर्णपणे अनिवार्य करण्यात आले आहे. आता केवळ दुचाकीचालकालाच नव्हे, तर मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणे बंधनकारक असेल. हेल्मेट नसल्यास विद्यापीठ परिसरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात…

Read More

जायकवाडीत 14,177 क्युसेकने आवक:पाणीसाठा 75 टक्क्यांवर, आमदार विलास भुमरे यांनी धरणाला भेट देऊन केली पाहणी

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग काहीसा मंदावला आहे. मात्र, गोदावरी खोऱ्यातील वरच्या धरणांतून अद्याप विसर्ग सुरू असल्याने पुढील काही दिवस धरणातील आवकमध्ये चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत जायकवाडीत १४,०१३ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. यामुळे धरणातील उपयुक्त पाणीसाठा ७५ टक्क्यांवर पोहोचला असून, ५७.२६ टीएमसी (१६२१.६०३…

Read More

टेलिग्रामद्वारे डी.फार्मसीचा विद्यार्थी चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या विळख्यात:490 अश्लील व्हिडिओ, फोटो मोबाइलमध्ये आढळले; तरुणावर गुन्हा

टेलिग्रामच्या माध्यमातून आलेल्या चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या व्हिडिओंचा शौक एका तरुणाला महागात पडला आहे. अक्षय प्रकाशराव गायकवाड (२८, रा. साईनगर, भावसिंगपुरा) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर छावणी पोलिस ठाण्यात ‘पॉक्सो’ व ‘आयटी ॲक्ट’नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सायबर ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली. विशेष म्हणजे, आरोपी हा डी. फार्मसीचा विद्यार्थी असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी…

Read More

उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; एक ठार:वडील-भाऊ गंभीर जखमी; पाऊस, धुक्यामुळे वाळूजच्या बकवालनगरमध्ये दुर्घटना

सिडको वाळूज महानगरातून बजाज कंपनीत कामासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील तिघांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोखंडी सळयांनी भरलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने, २२ वर्षांचा तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर, त्याचे वडील आणि लहान भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी पहाटे ५.५५ वाजेच्या सुमारास बकवाल नगर परिसरात घडली….

Read More

दिव्य मराठी मुलाखत:5 महिन्यांत वेरूळ कचरा अन् अतिक्रमणमुक्त करणार- जिल्हाधिकारी गौडा, कुंभमेळ्यापूर्वीच विकासकामे पूर्ण करण्याचा निर्धाार

जिल्ह्याला कुंभमेळ्यानिमित्त मोठी संधी चालून आली आहे. आपल्याकडे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. यासोबतच वेरूळ लेणी, अजिंठा लेण्यांसारखी जागतिक वारसा स्थळे आहेत. दरम्यान नाशिक येथे कुंभमेळ्यासाठी येणाऱ्यां भाविकांपैकी ३० ते ४० टक्के नागरिक छत्रपती संभाजीनगरला येणार आहेत. यासाठी घृष्णेश्वर विकास आराखड्याचे काम वेगाने सुरू आहे. यासोबतच वेरूळ परिसर पुढील ५ महिन्यांत कचरामुक्त करणार…

Read More

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी:यंदा ऑगस्ट महिन्यांत शाळांना 12 दिवस सुट्या

शाळेचे नवे शैक्षणिक सत्र सुरू होऊन आता २ महिने उलटले आहेत. लवकरच विद्यार्थ्यांच्या पहिल्या घटक चाचणीची लगबग सुरू होईल. मात्र, अभ्यासाच्या या धावपळीत विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात विद्यार्थ्यांना केवळ ९ सुट्या मिळाल्या होत्या; यंदा मात्र सण आणि उत्सवांमुळे यात वाढ झाली असून, ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांना एकाच महिन्यात तब्बल १२ सुट्या मिळणार…

Read More