संघर्षाचा मार्ग सोडा, लोकांची गैरसोय टाळा:समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका, चर्चेतूनच मार्ग काढू; जरांगेंच्या उपोषणावर अशोक चव्हाणांचे आवाहन
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी आपले 11 वे आमरण उपोषण सुरू केले असून, दुसरीकडे ओबीसी समाजानेही उपोषणाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत, संघर्षाचा मार्ग सोडून चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे. “समाजाला न्याय देण्याची शासनाची भूमिका असून, सरकारने जरांगेंच्या मागण्यांना वेळोवेळी प्रतिसाद दिलेला…