Headlines

महान धरणात अपेक्षितपेक्षा 70% तूट; जलसाठा आता 25 टक्क्यांवर:जलाशय परिचालन आराखड्याच्या तुलनेत चिंताजनक चित्र‎

अकोला शहरासह जिल्ह्यातील ६४ खेडी, बोरगाव मंजू, मूर्तिजापूर शहर आणि एमआयडीसी परिसराची तहान भागवणाऱ्या काटेपूर्णा (महान) धरणात यंदा पावसाळ्याचे सव्वा दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने जलसाठ्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. पाटबंधारे विभागाच्या जलाशय परिचालन आराखड्यानुसार ऑगस्टअखेर धरणात ९४ टक्क्यांहून अधिक साठा असणे आवश्यक असताना प्रत्यक्षात आजमितीला केवळ २५ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या…

Read More

दिंडी मार्गाची दुरवस्था; संभाजी ब्रिगेडने केले श्रद्धांजली आंदोलन:56 दिवसातच पडले खड्डे; अपघातांचे प्रमाण वाढल्याचा केला आरोप‎

शेगाव दिंडी मार्गाचे काम जून महिन्यात झाले. मात्र आता या मार्गावर खड्डे पडले असून, संभाजी ब्रिगेडने या रोडवर श्रद्धांजली आंदोलन करत सरकारी यंत्रणांचे लक्ष वेधून घेतले. हायब्रीड अॅन्युईटी अंतर्गत शेगाव पालखी मार्गाचे काम २०१९ मध्ये मंजूर झाले. शेगाव- नागझरी- पारस- निमकर्दा- गायगाव- अकोला- गोरेगाव- माझोड- वाडेगाव- मेडशी- ब्राम्हणवाडा देवा- रिसोड- लोणी आणि बीबी ते किनगाव…

Read More

सरासरीच्या 66.2 टक्केच पाऊस; जिल्ह्यात 202.30 मिमी.ची तूट:15 दिवसांपासून दडी; बळीराजा चिंताग्रस्त, व्यापाराला फटका‎

जिल्ह्यात १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यावर अवर्षणाचे सावट गडद झाले. दहा वर्षाचे आकडे पाहिले तर १८ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ५९८ मिमी पाऊस पडायला हवा होता. प्रत्यक्षात मात्र तो २०२.३० मिमीने कमी असून, ३९५.७० मिमीवरच थांबला आहे. वाढीच्या काळातच पावसाने ताण दिल्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर ही मुख्य पिके सुकत आहेत. पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतीसह ग्रामीण, शहरी…

Read More

डोमिनेटर संघाने कोरले नगरसेवक चषकावर नाव:बार्शीत ओपन बॉक्स क्रिकेट स्पर्धा उत्साहात‎

ईद-ए-मिलाद आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित नगरसेवक चषक २०२६ ही ओपन बॉक्स क्रिकेट स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. एकूण १६ संघांचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दि डोमिनेटर संघाने आय ॲण्ड टी पॉवर संघावर २८ धावांनी मात करत नगरसेवक चषक पटकावला. स्पर्धेचे उद्घाटन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेप्रसंगी सोलापूर जि….

Read More

मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती:प्रयागराजमध्ये 5 फूट पाणी साचले, 2000 विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडले; उत्तराखंडमध्ये 4 जणांचा मृत्यू

देशातील अनेक राज्यांमध्ये सतत पाऊस सुरू आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये गुरुवार सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. एअरपोर्ट रोडवरील द्वारका अंडरपाससह अनेक भागांत पाणी साचले, त्यामुळे वाटसरूंना अडचणींचा सामना करावा लागला. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये तीन दिवसांत २०५ मि.मी. पाऊस झाला आहे. शहरातील अनेक भागांत ५ फुटांपर्यंत पाणी साचले आहे. घरे आणि वसतिगृहांमध्ये पाणी शिरले. बुधवारी सुमारे २००० स्पर्धा…

Read More

जिव्हाळा, लावलेल्या लळ्यापोटी मेंढरांचा वाढदिवस:श्रावणात वाढदिवस करण्याची गावडे कुटुंबीयांची परंपरा, बॅनरवर छबी व आमदारांची उपस्थिती

सांगोला आपली उपजीविका ज्यांच्यावर अवलंबून आहे, अशा मेंढरांप्रती असलेला जिव्हाळा व्यक्त करण्याच्या हेतूने सांगोला शहरातील गावडे वस्ती येथे मेंढरांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. घरापुढे मंडप उभारला. घरातील एखाद्या सदस्याप्रमाणे वाढदिवसाचा बॅनरही लावला. विशेष म्हणजे या बॅनरवर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा फोटो प्रसिद्ध केला. अन् एवढ्या व्यापातून आमदार डॉ. देशमुख यांनी हजेरी लावून मेंढरांच्या वाढदिवसानिमित्त…

Read More

जिल्ह्यात 1033 गावांसाठी 91 पर्जन्यमापक केंद्र:पावसाच्या अर्धवट नोंदीचा बसतो फटका, पीक विमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळण्याबरोबर योजनांचा लाभ घेण्यातही अडचणी‎

अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने दडी मारली आहे. माळरानावरील खरीप पिकांनी माना टाकल्या आहेत. जिल्ह्यात असमान पाऊस पडतो. पावसाची नोंद मंडळनिहाय होते. मंडळात असलेल्या काही गावांमध्ये मोठा पाऊस तर काही ठिकाणी कोरडेठाक हवामान असते. जिल्ह्यातील १०३३ ग् . त्यामुळे योग्य पद्धतीने पावसाचे मोजमाप होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनांचा, पीक विम्याचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत….

Read More

पाणी चोरी, कमी स्टाफ,राजकीय दबावाने नीरा उजवा कालव्याचे आवर्तन विस्कळीत:तिसंगी तलाव भरण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक, आंदोलन तीव्र करणार‎

नीरा उजवा कालवा विभागातील पाण्याच्या आवर्तनाला राजकीय हस्तक्षेप, मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा आणि बेसुमार पाणी चोरीचा फटका बसला आहे. एकीकडे तिसंगी तलाव अद्याप कोरडाठाक पडलेला असताना दुसरीकडे कालव्यातून सोडलेले पाणी अपेक्षित गतीने पुढे सरकत नसल्याने लाभक . डिझेल अनुदान नाही म्हणून झाडा-झुडुपांनी कालवा पोखरला नीरा उजवा कालव्याचे सुमारे २० वर्षांपूर्वी अस्तरीकरण झालेले आहे. कालव्याच्या दोन्ही बाजूनी…

Read More

आईची मोलमजुरी, वडिलांचा बँड‎अन् मुलाची एमपीएससीत भरारी‎:कोंढवडच्या अभिषेकचे मुद्रांक निरीक्षक पदासाठी सहावे स्थान

राहुरी परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्द, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते, हे राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील अभिषेक सिताराम चव्हाण यांनी सिद्ध केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मुद्रांक निरीक्षक पदासाठी जाहीर झालेल्या शिफारस पात्र उमेदवारांच्या यादीत त्यांनी अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गातून २७३.५० गुण मिळवत सहावे स्थान पटकावले. त्यांच्या या यशामुळे क्लास वन…

Read More

नालेगावच्या आखाड्यात कुस्तीचा थरार; सोलापूर येथील माऊली कोकाटे विजेता:कुस्तीप्रेमींची तुफान गर्दी, प्रेक्षकांच्या कडकडाटात पटकावली मानाची गदा‎

शहरातील सीना नदीकाठी असलेल्या श्री वारुळाचा मारुती मंदिर परिसरात नागपंचमीनिमित्त भरलेल्या यात्रेच्या उत्साहात कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्याने हिंदुत्व प्रतिष्ठान व नालेगाव ग्रामस्थांच्यावतीने नगरसेवक महेश लोंढे यांच्या पुढाकारातून झालेल्या या कुस्ती मैदानात राज्यभरातील नामवंत कुस्तीपटूंनी सहभाग घेत लाल मातीच्या आखाड्यात आपल्या कुस्ती कौशल्याचे दर्शन घडविले. तोडीस तोड कुस्तीपटू आमनेसामने…

Read More