Headlines

चाकण औद्योगिक पट्ट्यात वाहतूक कोंडीवर 'ॲक्शन प्लॅन':31 ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्तीचे निर्देश, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि अन्य पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून कालबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीला आमदार बाबाजी काळे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार…

Read More

JPMorgan Alert | India Food Inflation & Subsidy Burden to Rise in 2027

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक 2027 पर्यंत भारतात खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दर वाढू शकतात. हा इशारा मल्टीनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस फर्म जेपी मॉर्गनने दिला आहे. अहवालानुसार, भारत सरकारवर 3 लाख कोटी रुपयांच्या सबसिडीचा बोजा वाढेल. फर्मने दावा केला आहे की, महागाईचा परिणाम संपूर्ण जगावर होईल. खतांची कमतरता, भू-राजकीय तणाव आणि शक्तिशाली अल निनो वादळामुळे हे संकट अधिक गडद…

Read More

'एआय युगाचा वेध' पुस्तकाचे प्रकाशन:डॉ. दीपक शिकारपूर यांचे पुस्तक संतुलित, परिपूर्ण – डॉ. अरविंद नातू

डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘एआय युगाचा वेध’ या पुस्तकाचे आणि ऑडिओ बुकचे मंगळवारी (दि. १८) प्रकाशन झाले. आयसरचे अध्यक्ष डॉ. अरविंद नातू यांनी या पुस्तकाचे कौतुक करत ते कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी समग्र वेध घेणारे, संतुलित आणि परिपूर्ण असल्याचे म्हटले. अमलताश बुक्सतर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन बी. एम. सी. सी. आवारातील डॉ. सायरस पूनावाला…

Read More

पुणे शहरात सार्वजनिक वाहतूक वापर फक्त 11 टक्के:केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ: कोंडी सोडवण्यासाठी तर्कशुद्ध आराखडा हवा

पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चिंता व्यक्त केली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केवळ ११ टक्के असल्याने, तर्कशुद्ध वाहतूक सुधारणा आराखड्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. यामुळेच पुणेकरांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळू शकेल, असे ते म्हणाले. पुणे शहराची लोकसंख्या ६० ते ६५ लाखांपर्यंत पोहोचली असून,…

Read More

किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे 19वे पर्व पुण्यात:22-23 ऑगस्टला, 'ब्रॉट टू यू बाय अर्थ' संकल्पनेवर आधारित

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे १९वे पर्व पुण्यात २२ आणि २३ ऑगस्ट रोजी पुणे इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित करण्यात येणार आहे. ‘ब्रॉट टू यू बाय अर्थ’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. निसर्गाशी नाते दृढ करणे, हवामान बदल आणि संवेदनशील पर्यावरणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती…

Read More

नागपूरच्या 12 नामांकित शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी!:शाळा परिसरात मोठी खळबळ, खालिस्तानी संघटनेच्या नावे ई-मेल; पोलिस अलर्ट मोडवर

नागपूरमधील 12 नामांकित शाळांना मंगळवारी सकाळी ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर हा धमकीचा संदेश धडकला. मुख्याध्यापकांनी हा ई-मेल पाहिल्यानंतर तातडीने याची माहिती पोलिसांना दिली, ज्यामुळे शिक्षण क्षेत्रासह पोलिस प्रशासनातही एकच धांदल उडाली. या ई-मेलमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, या शाळा विद्यार्थ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक…

Read More

कॉंग्रेससाठी 'वंदे मातरम्' ही लढाऊ घोषणा:अपमान करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही- पृथ्वीराज चव्हाण; अमित शहांसह संघावरही साधला निशाणा

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी तसेच सोनिया गांधी यांच्यावर स्वातंत्र्यदिनी वंदे मातरम् गीताचा अपमान केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. यावर कॉंग्रेसच्या नेत्यांकडून देखील स्पष्टीकरण दिले जात आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील पत्रकारांशी बोलताना यावर भाष्य केले आहे. तसेच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका देखील केली आहे. पृथ्वीराज चव्हाण…

Read More

शिवसेना पक्ष-चिन्ह खटल्याची सर्वोच्च सुनावणी:विधिमंडळ पक्षात फूट मान्य नाही, अध्यक्षांनी अधिकारक्षेत्र ओलांडले; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, आमदारांचे अपात्रता प्रकरण आणि शिवसेना पक्ष-चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडत आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिल्याविरोधात, तसेच निवडणूक आयोगाने (ECI) शिंदे गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दाखल केलेल्या याचिकांवर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती जे. व्ही….

Read More

'स्कूल ठीक करो' मोहिमेचा दणका:हिंगोलीत दारुडा मुख्याध्यापक निलंबित; पण 4 नव्या शिक्षकांसाठी अभिजीत दिपकेंचे आंदोलन सुरू

कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांच्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानाचा मोठा दणका हिंगोली जिल्ह्यात पाहायला मिळाला आहे. भरदिवसा शाळेत दारू पिऊन झोपणाऱ्या लिंबाळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला अखेर निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अभिजीत दिपके यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ते हिंगोलीत पोहोचण्यापूर्वीच प्रशासनाने ही कारवाई केली. मात्र, कारवाई होऊनही शाळेला 4…

Read More

नागपूरच्या गौरव खोडतकरने 1500 मीटर शर्यतीत दुसरे स्थान पटकावले:तेलंगणातील इंडियन अथलेटिक्स सिरिजमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत यश

नागपूरच्या गौरव खोडतकरने राष्ट्रीय स्तरावरील ‘इंडियन अथलेटिक्स सिरिज १३’ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तेलंगणातील हनमकोंडा येथे पार पडलेल्या या स्पर्धेत त्याने पुरुषांच्या १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत दुसरे स्थान पटकावले. गौरवने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. गौरव खोडतकरने १५०० मीटरची शर्यत ३ मिनिटे ४७.९० सेकंदात पूर्ण केली. राष्ट्रीय स्तरावरील धावपटूंसाठी १५०० मीटरची शर्यत ३ मिनिटे ४८ सेकंदांच्या…

Read More