Headlines

शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे‎:पैठण तालुक्यात यंदा पावसाच्या खंडामुळे अर्थव्यवस्थेला फटका

गेल्या महिनाभरापासून पावसाने मारलेल्या दडीमुळे पैठण तालुका आणि लगतच्या ग्रामीण भागातील शेती संकटात सापडली असून, त्याचा थेट आणि गंभीर परिणाम संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर जाणवू लागला आहे. शेतमालाचे अपेक्षित उत्पादन, शेतीतील पुढील कामे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबाबत तीव्र अनिश्चितता निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. पावसाअभावी निर्माण झालेल्या या मंदीची झळ आता…

Read More

अग्निवीरांना राज्याच्या गट-क संवर्गात नोकऱ्या:महाराष्ट्र सरकारचा निर्णय, आदेशही जारी

भारतीय सैन्यदलातून ४ वर्षांची देशसेवा पूर्ण करून अग्निवीरांची पहिली तुकडी बाहेर पडत आहे. या शूर जवानांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र शासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांमधील गणवेशधारी गट-क संवर्गात माजी अग्निवीरांना सामावून घेण्यासाठी तब्बल १००० अधिसंख्य पदे निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या ४ प्रमुख विभागांत अग्निवीरांना संधी : गृह विभाग: पोलिस…

Read More

कांदा दर नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा आणू:नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री मिश्किलपणे म्हणाले, यंदा कांदा भेट मिळाला नाही

नाशिकचा कांदा वर्षातून दोन वेळा आमच्या डोळ्यात नक्कीच पाणी आणतो. पण दर कमी राहिल्यास वर्षभर ताे शेतकऱ्यांच्या डाेळ्यांमध्ये अश्रू आणताे. अशा स्थितीत नाशिकमधील कार्यक्रमांमध्ये आम्हाला अनेकदा कांदे भेट म्हणून मिळतात. मात्र सध्या कांदा महाग असल्याने कुणी या कार्यक्रमात कांदे घेऊन आले नाही. ती भेट मिळाली असती तर नक्कीच घरी नेली असती. शेतकऱ्यांच्या कष्टाचा पूर्ण आदर…

Read More

दिल्ली-NCR मध्ये CNG ₹3.89 ने महाग:किंमत ₹83 प्रति किलोवरून वाढून जवळपास ₹87 झाली; या वर्षी 5व्यांदा दर वाढले

दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो ₹3.89 ची वाढ झाली आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) नुसार, नवीन दर शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाले. त्यानंतर दिल्लीत सीएनजी ₹83.09 वरून वाढून ₹86.98 प्रति किलो होईल. या वर्षी सीएनजीच्या दरात झालेली ही पाचवी वाढ आहे. IGL नुसार, यावेळी दर वाढवण्यामागची मुख्य कारणे म्हणजे एलएनजीची वाढती आयात किंमत, आंतरराष्ट्रीय…

Read More

संभाजीनगरात खनिकर्म उपसंचालकांचा मृतदेह आढळला:व्हिसेरा राखून ठेवला; नैसर्गिक मृत्यूचा पोलिसांचा अंदाज, कारण मात्र अद्याप अस्पष्ट

भूविज्ञान आणि खनिकर्म (गौण खनिज) विभागाचे प्रादेशिक उपसंचालक डॉ. सुयोग अनिल जगताप (४१) यांचा त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळला. शुक्रवारी सकाळी सिडकोएन-१ परिसरात हा प्रकार उघड झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा ‘व्हिसेरा’ राखून ठेवला आहे. हा नैसर्गिक मृत्यू असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. जगताप यांचे मूळ कुटुंब पुण्यात वास्तव्यास आहे….

Read More

पेपरफुटी रोखण्यासाठी प्रणालीत मोठा बदल शक्य:निलेकणींच्या टास्क फोर्सने मागवल्या सूचना, 13 सप्टेंबरपर्यंत हिंदी व प्रादेशिक भाषेत मत नोंदवा…

पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार परीक्षा प्रणालीत मोठ्या सुधारणांची तयारी करत आहे. एनटीएसह सार्वजनिक परीक्षा कशा घ्याव्यात, त्यांची सुरक्षा कशी मजबूत करावी आणि गैरप्रकार झाल्यास कुणाची जबाबदारी असावी- याची समीक्षा सुरू आहे. यासाठी इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली जुलै महिन्यात स्थापन झालेल्या हाय-पॉवर टास्क फोर्सने शुक्रवारी लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. १३ सप्टेंबरपर्यंत…

Read More

मनोज जरांगे पाटील यांचे 3 वर्षांतील 11 वे उपोषण आजपासून:जालन्यातील 1700 पोलिसांच्या सुट्या रद्द, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्याची नवी मागणी

मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून आंतरवाली सराटीत आमरण उपोषणास बसत आहेत. ३ वर्षांतील त्यांचे हे ११ वे आंदोलन आहे. जालन्यातील सर्व १७०० पोलिसांच्या सुट्या २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान रद्द केल्या आहेत. आरक्षणासोबत विद्यार्थ्यांना सवलती, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्याची नवी मागणी आहे. आंतरवालीत ४०० पोलिस तैनात, ४ राहुट्या आंतरवालीत ४०० पोलिस, ४ डीवायएसपी, ११…

Read More

‘राखी आणि राजीनामा मुबारक’:अभिजीत दिपकेंच्या 'झुरळ' राखीची जोरदार चर्चा! सोशल मीडियावर PHOTO व्हायरल

संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले असून, त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दिपके यांनी शेअर केलेल्या झुरळाच्या थीमवरील राखीची आणि त्यावर लिहिलेल्या मजकुराची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म…

Read More

Raigad CGST Additional Commissioner Arrested in Bribery Case

रायगड जिल्ह्यातील केंद्रीय वस्तू व सेवा कर (CGST) विभागात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत भ्रष्टाचाराचे एक मोठे प्रकरण उघडकीस आणले आहे. एका दगडखाणी व्यवसायाशी संबंधित प्रकरण निकाली काढण्यासाठी तब्बल 40 लाख रुपयांची लाच स्वीकारताना सीब . सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, एका दगड उत्खनन कंपनीचे जीएसटी आणि रॉयल्टीशी संबंधित प्रलंबित प्रकरण बंद करण्याच्या मोबदल्यात या…

Read More

नागपुरात बिअर बारबाहेर कुख्यात गुंडाची निर्घृण हत्या:पत्नीचा फोन आल्याने बारबाहेर आला अन् घात झाला, उपचारादरम्यान अक्षय वंजारीचा मृत्यू

नागपूरच्या नंदनवन परिसरात पुन्हा एकदा गँगवॉरचा थरार पाहायला मिळाला असून, कुख्यात गुन्हेगार अक्षय वंजारी याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी, 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी एका बिअर बारबाहेर त्याच्यावर धारदार चाकू आणि लोखंडी हत्यारांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा बुधवारी, 26 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी…

Read More