शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे:पैठण तालुक्यात यंदा पावसाच्या खंडामुळे अर्थव्यवस्थेला फटका
गेल्या महिनाभरापासून पावसाने मारलेल्या दडीमुळे पैठण तालुका आणि लगतच्या ग्रामीण भागातील शेती संकटात सापडली असून, त्याचा थेट आणि गंभीर परिणाम संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर जाणवू लागला आहे. शेतमालाचे अपेक्षित उत्पादन, शेतीतील पुढील कामे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबाबत तीव्र अनिश्चितता निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. पावसाअभावी निर्माण झालेल्या या मंदीची झळ आता…