Headlines

ऑगस्टमध्ये कमी पाऊस, देशात सप्टेंबरमध्येही कमकुवतच:47% जिल्ह्यांत कमी पाऊस किंवा दुष्काळी स्थिती

ऑगस्टनंतर आता सप्टेंबरमध्येही देशभरात मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या महिन्यात सरासरी १६७.९ मिमी पाऊस पडतो, परंतु तो ९१% म्हणजेच सुमारे १५३ मिमीपेक्षाही कमी राहण्याचा अंदाज आहे. या वर्षी मान्सूनच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये पावसाची स्थिती बरीच चढ-उताराची राहिली आहे. जूनमध्ये ३५% कमी, जुलैमध्ये १% जास्त…

Read More

160 कोटींचा शालार्थ आयडी घोटाळा:लिपिक साळुंखे शिरपूरमधून ताब्यात, अपहारातील आणखी एक मास्टरमाइंड गळाला, बडे मासे लवकरच येणार

शिक्षण क्षेत्रातील १६० कोटींचा बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती वाढतच असून संस्थाचालक, मुख्याध्यापक, एजंट, शिक्षणाधिकारी ते शिक्षण संचालक अशा सर्वांच्या संगनमताने तब्बल ८४१ बोगस शिक्षक भरती केल्याचे तपासात उघडकीस आले. हा तपास राजकीय क्षेत्रातील शिक्षणसम्राटांच्या उंबरठ्यावर पोहोचला असून पोलिस आयुक्तांनी स्वतंत्र एसआयटी स्थापन करुन या तपासाला गती दिली आहे. याच प्रकरणात शिक्षणाधिकारी प्रशांत वाडिले याचा…

Read More

एफडीएचा छापा:नवी मुंबईत मुदत संपलेले वेफर्स, नूडल्स पुन्हा बाजारात; 76 लाखांचा माल जप्त, 24 ते 29 ऑगस्टदरम्यान तुर्भेच्या ‘मेसर्स साधना एंटरप्रायझेस’वर कारवाई

नवी मुंबईतील तुर्भे येथे नामांकित कंपन्यांच्या खाद्यपदार्थांच्या एक्स्पायरी (मुदत समाप्ती) तारखा बदलून ते पुन्हा बाजारात विकणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) पर्दाफाश केला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या टोळीकडून ७६ ल . एफडीए आणि नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने २४ ते २९ ऑगस्टदरम्यान तुर्भे येथील “मेसर्स साधना एंटरप्रायझेस’वर हा संयुक्त छापा टाकला….

Read More

डॉ. राजेंद्र रुपनवर मृत्यू प्रकरण:डॉ. भगवान पवार, डॉ. लीना मदने यांच्यासह पाच जणांना तत्काळ अटक करा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर तीव्र जनआक्रोश

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीना मदने यांच्यासह संबंधित पाच जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी आणि या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, या मागणीसाठी डॉ. रुपनवर यांचे नातेवाईक व हजारो नागरिकांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयाबाहेर तीव्र जनआक्रोश आंदोलन करत ठिय्या मांडला. डॉ….

Read More

'मसुद्यावर भूमिका स्पष्ट करा, मगच पुढचा निर्णय':राधाकृष्ण विखे पाटलांचे मनोज जरांगेंना आवाहन; बोलतानाही पथ्य पाळण्याचा दिला सल्ला

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. तसेच त्यांच्या भेटीसाठी आज शासनाचे शिष्टमंडळ गेले होते. मात्र जरांगे यांनी सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावत, अधिकाऱ्यांना का पाठवले, नेत्यांना येता येत नाही का? असा सवाल केला. तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. त्यानंतर विखे पाटील, मंत्री उदय सामंत…

Read More

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मूक मोर्चा:प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन, कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची मागणी

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनने मंगळवारी, १ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेवर ‘हक्क मूक मोर्चा’ काढला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हा परिषद मुख्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व युनियनचे मानद अध्यक्ष कमलाकर वनवे, जिल्हाध्यक्ष आशिष भागवत आणि सरचिटणीस…

Read More

जीएमसीमध्ये 13 लाखाचे व्हेंटिलेटर 22 लाखांत खरेदी:भ्रष्टाचार चव्हाट्यावर; माजी पालकमंत्री डॉ. देशमुख यांची विद्यमान पालकमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

डफरीन हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर स्फोटाचे प्रकरण ताजे असतानाच अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) व्हेंटिलेटर खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. जीएसटीसह १३.१२ लाख रुपये मूळ किंमत असलेले व्हेंटिलेटर तब्बल २२.५५ लाख रुपयांना खरेदी करण्यात आले. माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी याबाबत सप्रमाण आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. राज्याचे अर्थ व नियोजन खाते…

Read More

'अधिकाऱ्यांना का पाठवलं, नेत्यांना येता येत नाही का?':मनोज जरांगेंनी सरकारच्या शिष्टमंडळाचा प्रस्ताव नाकारला; सकाळपर्यंतचा दिला अल्टिमेटम

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून सुरू केलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. राज्य सरकारच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील चर्चेसाठी येतील अशी शक्यता होती. मात्र, सरकारने रात्री उशिरा जालन्याचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि विखे पाटील यांचे ओएसडी राहुल कोठाडे यांना जरांगे यांच्या भेटीसाठी पाठवले. सरकारच्या या भूमिकेवर मनोज जरांगे यांनी तीव्र संताप…

Read More

हर्सूलमध्ये 8 एकरांवरील 700 अनधिकृत प्लॉटवर मनपाचा जेसीबी:भूमाफियांवर कारवाई, पक्क्या घरांनाही नोटिसा बजावणार; मनपा आयुक्तांनी दिले आदेश

छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्या भूमाफियांवर महानगरपालिकेने मोठी कारवाई केली आहे. मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार, मंगळवारी (१ सप्टेंबर) अतिक्रमण विभागाने हर्सूल परिसरातील ८ एकरांवरील सुमारे ७०० अनधिकृत प्लॉटवर जेसीबी फिरवला. या कारवाईमुळे भूमाफियांना मोठा धक्का बसला आहे. अतिक्रमण विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले की, केवळ रिकाम्या प्लॉटवरच नाही, तर अनधिकृतपणे बांधलेल्या…

Read More

फुलंब्रीत विविध पक्षांचे अनेक पदाधिकारी शिवसेनेत दाखल:श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मुंबईत पक्षप्रवेश; स्थानिक समीकरणे बदलण्याची शक्यता

फुलंब्री विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढत आहे. विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईत शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश झाला. यामुळे आगामी काळात फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधाकिसन पठाडे यांचे तिकीट नाकारल्यानंतर भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा)…

Read More