लाडकी बहीण बंद करा, शेतकऱ्यांना पैसे द्या:सदावर्तेंची मागणी; म्हणाले- मराठा महामंडळाला 150 कोटी दिले इतरांना 15 हजार कोटी द्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत मोठी मागणी केली आहे. राज्यात शेतकरी, शेतमजूर आणि अल्पभूधारक आर्थिक अडचणीत असताना सरकारने प्राधान्यक्रम बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. पैशांची कमतरता असेल तर लाडकी बहीण योजना बंद करा, पण शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत द्या, अशी थेट मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली….