उजनी 5 मे च्या दरम्यान ‘मायनस’मध्ये सिंचनासाठी 10हजार क्युसेक विसर्ग:धरणातून रोज 2% घट, धरण पाणी साठा व्यवस्थापन कळीचा मुद्दा ठरणार
सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. येत्या ५ मेपर्यंत धरण ‘प्लस’मधून ‘मायनस’मध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या सिंचन आवर्तनामुळे दररोज सुमारे १.१४ टीएमसी (२.१२ टक्के) पाणी सोडले जात असल्याने पाणी पातळी कमी होत आहे. एल निनोचे सावट घोंघावत असल्याने धरण पाणी व्यवस्थापन कळीचा मुद्दा…