Headlines

वर्षभरात 7 हजार 600 कापडी पिशव्यांचे केले वितरण:प्लास्टिकमुक्त अकोला; भंडाऱ्यात प्लास्टिक डिस्पोजेबलचा वापर टाळण्यासाठी स्टिलची ताटेही उपलब्ध‎

पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या “माय वसुधा विकास संस्थे’तर्फे वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येतात. लोकांनी प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर टाळावा, यासाठी निःशुल्क कापडी पिशव्या वाटप केल्या जातात. गत पर्यावरण दिनापासून आजपर्यंत एक वर्षात सुमारे ७ हजार ६०० कापडी पिशव्या संस्थेतर्फे निःशुल्क वितरीत करण्यात आल्या. गत १५ वर्षात तर ४३ हजार ६०० कापडी पिशव्या वाटत करण्यात आल्याचे…

Read More

कर थकित ठेवणाऱ्या दोन मालमत्तांना सील:व्यापाऱ्यांकडे 36 लाखाची थकबाकी, पालिकेची कठोर पावले उचलण्यास सुरुवात‎

मालमत्ता कर थकित ठेवणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेने मागील काही दिवसांपासून कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार शहरात सुरू असलेल्या विशेष वसुली मोहिमेअंतर्गत ४ जून रोजी राजापेठ (मध्य झोन क्र. २) भागात मोठी कारवाई करण्यात आली. वारंवार नोटिसा देऊनही कराचा भरणा न करणाऱ्या दोन मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांवर अखेर प्रशासनाने सील ठोकले. वार्ड…

Read More

लेखक, तंत्रज्ञांसारखी मंडळी समाजासाठी मोठी देणं:ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सत्कार समारंभात मान्यवरांचा अभिप्राय, शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव‎

. लेखक, तंत्रज्ञ, संशोधक, खेळाडू, कलावंत ही गुणी मंडळी समाजासाठी मोठी देणगी आहे. त्यामुळे या वारशाची जपणूक करणे हे आपले प्रत्येकाचेच कर्तव्य असल्याचा अभिप्राय ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदविला. मोर्शीच्या आर. आर. लाहोटी विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिलीपसिंह खांबरे यांचे चिरंजीव प्रा. पंकजसिंह खांबरे यांची जेएसपीएम विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट डायरेक्टर पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार…

Read More

पालखी सोहळ्यात सुविधांसह स्वच्छतेला प्राधान्य द्यावे:पालखी तळावरील अतिक्रमणे तात्काळ काढा

आषाढी शुद्ध एकादशी सोहळा दि. २५ जुलै रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संताच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. या कालावधीत वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखीतळ, विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी, आरोग्य, सुरक्षा, स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना…

Read More

अवैध दारूच्या धंद्याला चाप: यापुढे पोलिस पाटीलच असतील जबाबदार:अकोले तालुक्यातील अवैध दारूविरोधात आता "ऑपरेशन क्लीन'' सुरू होणार‎

“गावात अवैध दारू विकली जाते आणि पोलीस पाटील डोळे मिटून बसतात, हे आता खपवून घेतले जाणार नाही,” असा सज्जड दम संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी दिला आहे. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या सूचनेनंतर महसूल, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची तातडीची बैठक अकोले तहसील कार्यालयात पार पडली. यात अवैध दारू माफियांविरोधात “ऑपरेशन क्लीन’ छेडण्याचा निर्धार करण्यात…

Read More

…हुश्श, तनपुरे अखेर बिनविरोध! पण अपक्ष पानसरेंनी 6तास फोडला घाम:महायुतीची 5 तास रणनिती, शेवटच्या मिनिटाला पानसरेंनी आणला ट्विस्ट‎

दत्तात्रेय पानसरे (अपक्ष), मच्छिंद्र धुमाळ (अपक्ष) आणि करण ससाणे (अपक्ष) हे ५ उमेदवार रिंगणात होते. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीने पूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यानुसार ४ उमेदवारांनी माघार घेणे अपेक्षित होते. . मात्र, दुपारी २:५९ वाजता अपक्ष उमेदवार दत्ता पानसरे यांचे सूचक शाहबाज सय्यद यांनी माघारीचा अर्ज दिला आणि तिथून पुढे चक्रे वेगाने फिरली….

Read More

एल-निनोचे संकट: पिण्याच्या पाण्याचे नियोजन आधीच करा:जिल्हाधिकारी डॉ. आशियांचे निर्देश, अनधिकृत पाणी उपशावर होणार कारवाई‎

अहिल्यानगर एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या पाणी आणि चारा टंचाईच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. आगामी काळात पर्जन्यमानावर होणारा परिणाम लक्षात घेता, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हास्तरीय आढावा बैठकीत सर्व संबंधित विभागांना ‘वॉटर-फेडर’ नियोजनाचे निर्देश दिले आहेत. “टंचाईची परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन आधीच करा, असे डॉ. आशिया यांनी…

Read More

जिल्हा परिषद नवीन इमारतीला 3वेळा मुदतवाढ मिळाली तरीही काम अर्धवटच:सभापती गरड यांनी कंत्राटदार, अधिकाऱ्यांना धरले धारेवर‎

जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम तब्बल तीन वेळा मुदतवाढ देऊनही अद्याप अपूर्णच आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काम पूर्ण नसतानाही कंत्राटदाराला आतापर्यंत तब्बल ५९ पैकी ५७ कोटी रुपयांची बिले अदा करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. प्रशासकीय काळामध्ये कंत्राटदाराला अधिकाऱ्यांनी पाठीशी घातल्यानेच कामाची गती मंदावली. कामाचा दर्जाही राखला गेला नसल्याचे बांधकाम सभापती सचिन गरड यांनी…

Read More

आई-वडिलांना चारधाम यात्रा घडवणाऱ्या मुलांच्या इच्छा पूर्ण होतात- इंदुरीकर महाराज:चारधाम यात्रेनंतर आयोजित गंगापूजन कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन‎

ज्या मुलाने आपल्या आई-वडिलांची सेवा केली, वयोवृद्ध आई-वडिलांना चारधाम यात्रा घडवली, अशा मुलाच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात, असे प्रतिपादन प्रख्यात कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कन्नड येथे माजी आमदार तेजस्विनी जाधव यांच्या चारधाम यात्रा-पूर्तिप्रीत्य र्थ आयोजित कीर्तनात केले. कन्नड शहरातील साई मंदिर प्रांगणात ऐंशी वर्षीय माजी आमदार तेजस्विनी जाधव यांच्या चारधाम यात्रेनंतर आयोजित गंगापूजन कार्यक्रमात इंदुरीकर…

Read More

विसापूर वनपरिक्षेत्रात पाणवठे कोरडे; वन्यजीवांचा मानवी वस्तीकडे मोर्चा:42 अंशांवरील तापमानामुळे पाण्याची तीव्र टंचाई; वन विभागाविरोधात संताप‎

तालुक्यातील कातरवाडी, रापली, वडगाव पंगू, समिट, तळेगावरोही तसेच येवला तालुक्यातील कातरणी, विसापूर वनपरिक्षेत्रातील जंगलांमध्ये वन्यजीवांसाठी तयार करण्यात आलेले कृत्रिम पाणवठे पूर्णपणे कोरडे पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सध्या परिसरातील तापमा . शासनाकडून वन्यजीव संवर्धनासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात असताना अनेक पाणवठ्यांमध्ये पाण्याचा एक थेंबही नसल्याने वन विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले…

Read More