मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 'जन जंगल' पुस्तकाचे प्रकाशन:किशोर रिठे यांच्या पुस्तकात 5 दशकांतील वन्यजीव संवर्धनाचा आढावा
जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र वन्यजीव विभागातर्फे नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेत (IIM) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ निसर्ग व वन्यजीव अभ्यासक आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) संचालक किशोर रिठे यांच्या ‘जन जंगल’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मराठीत लिहिलेल्या या पुस्तकात भारतातील…