Headlines

अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करावा:नांदगावी उपवर्गीकरण संघर्ष समितीतर्फे आंदोलन करत प्रशासनास निवेदन‎

अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी उपवर्गीकरण संघर्ष समिती, नांदगावच्या वतीने शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय संविधानातील समानता, सामाजिक न्याय आणि बंधुता या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे. या निर्णयामुळे अनुसूचित जातींमध्ये फूट पडण्याची तसेच सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे…

Read More

तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली:आता अन्न-औषध प्रशासनाच्या मैदानात; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी गाजलेल्या खात्यात सरकारकडून जबाबदारी

राज्य प्रशासनात आपल्या कडक कार्यपद्धती आणि धडाकेबाज निर्णयांसाठी ओळखले जाणारे वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या मुंढे यांनी आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कारकिर्दीतील ही 25वी बदली ठरली आहे. त्यामुळे प्रशासनात पुन्हा एकदा चर्चांना…

Read More

संभाजीनगरात ४०० आठवड्यांपासून अधिकारी, डाॅक्टर, वकिलांचे श्रमदान:दर रविवारी 2 तासांच्या स्वच्छता मोहिमेतून बदलला शहराचा चेहरामाेहरा

‘केवळ कर भरणे म्हणजे नागरिकांचे कर्तव्य संपत नाही, तर शहराप्रति आपलेही काही देणे लागते,’ या जाणिवेतून शहरात सुरू झालेली स्वच्छता मोहीम आता एक आदर्श लोकचळवळ बनली आहे. २७ ऑक्टोबर २०१६ रोजी उद्योजक सुनील किर्दक, विंग कमांडर टी. आर. जाधव आणि मानसिंग पवार यांच्या संकल्पनेतून ही चळवळ उभी राहिली. मराठा समाज प्रतिष्ठानच्या वसतिगृहातील अवघ्या १५० ग्रामीण…

Read More

सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय:यंदापासूनच प्रवेश सुरू; श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित

सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्लाय सुरु करण्यास व त्यासाठी सोलापुरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तरावरचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे नाव यापुढे शासकीय अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था (गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँण्ड टेक्नॉलॉजी), सोलापूर असे करण्यास…

Read More

"विदर्भ चेंबर पत्रिका’ भविष्याचा दस्तऐवज:गुप्ता यांचे प्रतिपादन; खा. धोत्रेंसह मान्यवरांची उपस्थिती‎

गत ९३ वर्षांची गौरवशाली परंपरा व व्यापारी-उद्योग क्षेत्राची अविरत सेवा या संकल्पासह विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, अकोला यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये चेंबरचे मुख्य मुखपत्र असणाऱ्या “विदर्भ चेंबर पत्रिके’चे प्रकाशन करण्यात आले. स्थानिक पोलिस लॉन येथे झालेल्या या कार्यक्रमात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय महासचिव तथा दिल्लीचे खासदार प्रवीण खंडेलवाल, कैटचे राष्ट्रीय अध्यक्ष…

Read More

रहाटगावात संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन:आकाश लक्षणे महाराजांच्या वाणीतून अधिक मासानिमित्त कथा संपन्न

अमरावती नजीकच्या रहाटगाव येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्राच्यावतीने अधिक मासानिमित्त संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमद् भागवताचार्य, वाणीभूषण गुरुवर्य ह.भ.प. श्री आकाश लक्षणे महाराज यांच्या सुमधुरवाणीतून ही कथा संपन्न झाली. कथेच्या समारोपात महाराजांनी परीक्षित राजाला मिळालेला शाप आणि श्रीमद् भागवत कथेचे महत्त्व विषद केले. त्यांनी सांगितले की, महाभारताच्या…

Read More

हिंगोली जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागात 53.95 लाखांचा अपहार:कनिष्ठ सहाय्यकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील कनिष्ठ सहाय्यकाने ५३.९५ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. २८ गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशीच्या हालचाली सुरु केल्या आहेत. हिंगोलील जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील कनिष्ठ सहाय्यक (लेखा) एस. सी. जावळे यांनी तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून बँकेतून रक्कम काढण्याचा प्रयत्न…

Read More

'ज्याचा दरबार लागत होता, त्याला दरबारी बनवले':नितीश कुमारविषयी आनंद मोहन यांचा JDU नेत्यांवर हल्ला; म्हणाले -आम्हालाही उत्तर देता येते

माजी खासदार आणि बाहुबली नेते आनंद मोहन यांनी पुन्हा एकदा नाव न घेता जेडीयूच्या काही नेत्यांवर तीव्र हल्ला चढवला आहे. मुजफ्फरपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी म्हटले की, ‘विधानसभा निवडणुकीत ’25 ते 30, पुन्हा नितीश’ अशी घोषणा देण्यात आली होती, पण निवडणूक जिंकल्यानंतर अशा कोणत्या परिस्थिती निर्माण झाल्या की नितीश कुमार यांना सत्तेपासून दूर करण्यात आले?’ ते…

Read More

100 स्टार्टअप्सना दरमहा 25 हजार रुपयांचे सीड फंडिंग:विद्यापीठ-अमृत संस्थेचा करार; नवउद्योजकांना मिळणार आर्थिक व तांत्रिक बळ

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या ‘अमृत’ संस्था (पुणे) यांच्यात नुकताच सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. या करारानुसार, विद्यापीठातील १०० नवसंशोधकांची टप्प्याटप्प्याने निवड केली जाईल, ज्यापैकी सुरुवातीला २५ स्टार्टअप्सना या योजनेचा लाभ मिळेल. निवड झालेल्या प्रत्येक स्टार्टअपला ‘अमृत’ संस्थेकडून एका वर्षासाठी दरमहा २५ हजार रुपयांची फेलोशिप किंवा सीड…

Read More

अकोल्यात पत्नीचा चाकूने भोसकून खून;‎ 2 चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले‎:‘मुलाला मारू नका'' म्हणून आईमध्ये पडली अन् गेला जीव‎

येथून जवळच असलेल्या बोरगाव‎ मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ‎‎यावलखेड येथे गुरुवारी सकाळी ‎‎‎घडलेल्या ‎‎‎धक्कादायक ‎‎‎घटनेत पतीने ‎‎‎कौटुंबिक‎‎ वादातून‎‎ पत्नीवर ‎‎धारदार शस्त्राने ‎‎‎हल्ला करून‎ तिची हत्या केल्याची घटना‎ उघडकीस आली. या घटनेमुळे ‎‎परिसरात मोठी खळबळ उडाली ‎‎असून, दोन लहान मुलांचे मातृछत्र ‎‎हरपले आहे. शहरातील डाबकी‎रोड पोलिस ठाणे हद्दीत अन्नपूर्णा‎माता मंदिर परिसरात पतीने ‎पत्नीचा खून करुन जाळून…

Read More