अश्विनी भिडेंचा इगो मोदींपेक्षा जास्त- देशपांडे:विद्यार्थ्यांवरील अन्याय अन् चेंबूर दुर्घटनेतील दोषींवर कारवाईसाठी उद्या मनसेचे आंदोलन
दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीचार्ज आणि मुंबईतील चेंबूर येथे महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे गेलेला बळी, असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. “आंदोलकांवर लाठ्या चालवणारे पोलीस ‘कायर’ आहेत आणि बीएमसीच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना पंतप्रधान मोदींपेक्षाही जास्त इगो आहे,” असा घणाघात देशपांडे यांनी केला….