Headlines

जिल्ह्यामध्ये खरिपाची पिके पिवळी पडू लागली:पेरण्या 38 टक्क्यांनी घटल्या, पाऊस लांबल्यास दुबार पेरणीचे संकट, जिल्ह्याचे पेरणी क्षेत्र 3.23 लाख हेक्टर‎

जिल्ह्यात ४ ते ८ जुलै दरम्यान झालेल्या पावसामुळे खरीप पेरण्यांनी चांगलाच वेग घेतला होता. मात्र, गेल्या सात दिवसांपासून पावसाने पुन्हा ब्रेक घेतल्याने आणि कडक ऊन पडू लागल्याने खरीप हंगामातील पिके आता काही प्रमाणात पिवळी पडू लागली आहेत. गेल्या वर्षीच्य . जून महिन्यातील बहुतांशी दिवस कोरडे गेल्याने सुरुवातीला केवळ २० टक्केच पेरण्या झाल्या होत्या. त्यानंतर जुलैच्या…

Read More

पिंपळदरावाडी तलाव काम: सव्वातीन कोटींच्या दंडावरून राजकीय घमासान

तालुक्यातील आढळा खोऱ्यातील पिंपळदरावाडी येथील जलसंधारण विभागाच्या साठवण तलावाच्या कामावरून राजकीय आणि सामाजिक वाद चांगलाच पेटला आहे. एकीकडे अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी प्रशासनाने ठेकेदाराला तब्बल सव्वा तीन कोटींचा दंड आकारला असताना, दुसरीकडे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी या कारवाईमागे ‘राजकीय दबाव’ असल्याचा आरोप केला आहे. अकोले तालुक्यातील विकासकामांमध्ये राजकारणातून दबाव आणला जात असल्याच्या या…

Read More

कष्टकऱ्यांची चहावर चर्चा‎:आम्ही केवळ मतदार नाही, शहर स्वच्छ ठेवणारे श्रमिक; रामवाडीत घुमला कष्टकऱ्यांचा आवाज

आम्ही केवळ मतदार नाही, तर शहर स्वच्छ ठेवणारे श्रमिक आहोत. अनेक वर्षांपासून शहराची स्वच्छता राखण्यासाठी योगदान देऊनही रोजगाराची शाश्वती नाही, अशी खंत व्यक्त करत स्थानिक कचरा वेचक श्रमिकांना रोजगारात प्राधान्य मिळावे, अशी मागणी रामवाडी येथे आयोजित बैठकीत करण्यात आली. बेंगळुरू येथील ‘हसरू दला’ संस्थेच्या सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर (पायलट प्रकल्प) आयोजित करण्यात आलेल्या ‘कष्टकऱ्यांची चहावर चर्चा’…

Read More

Ayodhya Ram Mandir Donation Theft; Ramashankar Mishra & Subhash Case

लखनऊ9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात अटक केलेल्या 8 आरोपींमध्ये रमाशंकर मिश्रा आणि सुभाष चंद्र श्रीवास्तव यांचाही समावेश आहे. दैनिक दिव्य मराठीची टीम दोघांच्या घरी पोहोचली. त्यांच्या कुटुंबियांशी आणि शेजाऱ्यांशी बोलली. रमाशंकरचे कुटुंब अयोध्येतील राम सखा बगिया मंदिराच्या 2 खोल्यांमध्ये राहते. पोलिसांना त्याच्या बँक खात्यात 7.32 लाख रुपये मिळाले आहेत. कुटुंबाचा दावा…

Read More

पिंपळदरी परिसरात पावसाअभावी पिके संकटात:रिमझिम पावसावर पेरण्या आटोपल्या, आता शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे‎

परिसरात यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणीची कामे उरकून घेतली. मात्र, पेरण्या आटोपल्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने बळीराजाची चिंता कमालीची वाढली असून, आता संपूर्ण परिसराला दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. पेरणी झालेल्या शेतांमध्ये पिकांची उगवण सुरू झाली असली, तरी पुरेशा ओलाव्याअभावी अनेक ठिकाणी कोवळी रोपे कोमेजून जाण्याची भीती निर्माण झाली…

Read More

जुने वीज मीटर पुन्हा बसविण्याची मागणी:मोहीम तात्पुरती स्थगित‎, सटाण्यात ठेकेदाराने विनापरवानगी स्मार्ट मीटर बसविल्याचा नागरिकांचा आरोप

शहरात महावितरण व संबंधित ठेकेदारांकडून ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कोणतीही पूर्वसूचना, लेखी परवानगी किंवा ग्राहकांची संमती न घेता जुने डिजिटल मीटर काढून स्मार्ट मीटर बसविले जात असल् . सटाणा शहरातील अभिमन्यूनगर परिसरात वायरमन, ठेकेदारांचे कर्मचारी व महावितरणचे अधिकारी ग्राहकांना आवश्यक माहिती न देता थेट मीटर बदलत असल्याचा…

Read More

वणीत लाईन-लेव्हलचा बोजवारा, उघडे पाईप अन् निकृष्ट चेंबरबांधणीने संताप:शाहू महाराजनगरमधील प्रकार; अवघ्या 10 इंची पाईपचा वापर‎

शहरातील शाहू महाराजनगर येथे पेसा अंतर्गत ठक्करबाप्पा योजनेतून सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामावर नागरिकांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. लाखो रुपयांचा शासकीय निधी खर्च करूनही अनेक ठिकाणी पाईप उघड्यावर पडलेले असून, चेंबरची उभारणी जुन्या सिमेंटच्या गटारीवरच करण्यात आल्याचा आरोप होत आहे. लाईन-लेव्हल न राखता आणि तांत्रिक निकषांकडे दुर्लक्ष करून काम सुरू असल्याने या योजनेच्या गुणवत्तेबाबत…

Read More

जय बाबाजी भक्त परिवारातर्फे 11,000 वृक्षरोपांची लागवड:नाशिकच्या विविध तालुक्यांसह राज्यभरातील आश्रमांत वृक्षारोपण‎

जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने राज्यभरातील तसेच राज्याबाहेरील विविध आश्रमांमध्ये ११,००० वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सर्वांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्पही केला. सततच्या वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत असून, त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर “निसर्गाचे आपण देणे लागतो’ या भावनेतून पर्यावरण संरक्षणासाठी जय बाबाजी भक्त परिवारातर्फे दरवर्षी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येते….

Read More

सौंदाणेत रामदेव बाबा मंदिरात चोरी:5.5 किलो दागिने व रोकड लंपास, मागील दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश, पंचक्रोशीत संताप‎

श्री रामदेवजी बाबा मंदिरात रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास १२ लाख रुपयांची धाडसी चोरी झाली. कडेकोट सुरक्षा आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असतानाही चोरट्यांनी मंदिराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून ५.५ किलो चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली. चोरट्यांचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीत तीव्र संताप व्यक्त होत असून, चोरांना तत्काळ…

Read More

नदीचे खोलीकरण ठरले वरदान; चारनेरच्या जुना नदीला पाणी:परिसरातील दीड हजार एकर शेतीला होणार फायदा‎

चारनेरवाडी शिवारातील डोंगर परिसरातून वाहणाऱ्या जुना नदीचे खोलीकरण केल्याचा सकारात्मक परिणाम अवघ्या दोन-तीन दिवसांच्या पावसानंतर दिसून आला आहे. खोलीकरणामुळे नदीत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला असून नदीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या उपक्रमामुळे परिसरातील कोरडवाहू शेतीला मोठा दिलासा मिळाला असून सुमारे एक हजार ते दीड हजार एकर जमीन ओलिताखाली येण्याची शक्यता निर्माण झाली आहे….

Read More