Headlines

टंचाई कायम:हरसुलला खतांसाठी पहाटेपासून रांगा, बफर स्टॉक सर्वसामान्यांना खुला करण्याची मागणी‎

या आदिवासीबहुल परिसरामध्ये भात लागवडीच्या ऐन हंगामात खतांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. खत मिळवण्यासाठी पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला. दिवसभरात कृषी विभागाच्या मध्यस्थीनंतर सहकारी संस्था व खत विक्रेत्यांना ६८३ गोणी खताचे वाटप करण्यात आले असले, तरी परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आहे. सहकारी संस्थेत केवळ सभासदांनाच खत दिले जात असल्याने सर्वसामान्य शेतकरी खासगी विक्रेत्यांवर अवलंबून…

Read More

दहा दिवसांत पीक विमा द्या, अन्यथा सरण आंदोलन:निफाड येथे आयाेजित पीक विमा योजना तक्रार निवारण समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा‎

खरीप २०२५ मधील अतिवृष्टीमुळे ९० टक्के पीक हातचे गेल्यानंतरही विमा कंपनीने उत्पन्नात घट नाही, असे कारण देत सर्व दावे फेटाळल्याने देवगाव मंडळातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. . तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांच्या उपस्थित झालेल्या तालुकास्तरीय पीक विमा तक्रार निवारण समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या मनमानी कारभाराचा पाढाच…

Read More

अचूक नोंदींसाठी बीएलओंना नागरिकांचे सहकार्य आवश्यक:इगतपुरीचे तहसीलदार अभिजीत बारवकर यांचे आवाहन‎

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत प्रत्येक पात्र नागरिकाची अचूक नोंद होणे आवश्यक असून, बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांना नागरिकांनी पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अभिजित बारवकर यांनी केले. तहसील कार्यालयात आयोजित बीएलओ व बीएलए यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. बैठकीस निवडणूक…

Read More

स्वच्छ सुंदर बसस्थानकाचा दावा, मात्र प्रत्यक्षात चिखल-गैरसोयींचा सामना:सटाणा बसस्थानकाच्या आवार कार्यशाळेची दुरवस्था, प्रवासी हैराण‎

राज्यस्तरीय ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान २०२५-२६’मध्ये सलग दुसऱ्यांदा प्रादेशिक स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून १० लाख रुपयांचे पारितोषिक पटकावलेल्या सटाणा बसस्थानकातील आगार कार्यशाळेत चिखल, दुर्गंधी, अस्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या अपुऱ्या सुविधां . आगाराच्या कार्यशाळा आवारात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. उन्हाळ्यात धुळीचा त्रास तर पावसाळ्यात चिखलामुळे कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज करताना अडचणींचा सामना…

Read More

Uttarakhand-Himachal Landslides | 438 Roads Closed; Rajasthan-Gujarat Clouds Missing

Marathi News National Uttarakhand Himachal Landslides | 438 Roads Closed; Rajasthan Gujarat Clouds Missing भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मध्य प्रदेश, राजस्थानसह देशातील 10 राज्यांमध्ये पुढील 5 दिवस मान्सून कमकुवत राहील. या राज्यांमध्ये पावसाची शक्यता कमी आहे. याचे कारण म्हणजे देशाच्या पश्चिम भागातून ढग नाहीसे होणे. नवीन उपग्रह प्रतिमांमध्ये ढग उत्तराखंड, यूपी, बिहार, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा…

Read More

सावळदबारा परिसरात सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती:आता शेतकऱ्यांच्या नजरा मोठ्या पावसाकडे, यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा‎

अजिंठा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या सावळदबारा आणि परिसरात यंदा मान्सूनने वेळेत हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. सुरुवातीलाच समाधानकारक आणि पेरणीलायक पाऊस झाल्याने यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक मका व कपाशीच्या पिकाला फाटा देत सोयाबीन पिकाला पसंती दिली आहे. परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी पेरणी झालेल्या सोयाबीनची उगवण उत्कृष्ट झाली असून, सध्या शेतातील कोवळी हिरवीगार रोपे डोलताना…

Read More

‘एसआयआर'च्या कामात दिरंगाई केल्यास कारवाई:जिल्हाधिकारी गौडा यांचा कर्मचाऱ्यांना इशारा‎

शासनाच्या वतीने आयोजित विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करावे. या राष्ट्रीय महत्त्वाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिला. कन्नड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. तालुक्यात केवळ १७ टक्केच उद्दिष्ट पूर्ण झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेची झाडाझडती घेतली. उपविभागीय…

Read More

देवगाव रंगारी ते गल्लेबोरगाव राज्य मार्गाची दुरवस्था:वाहनधारक त्रस्त, 6 किमी प्रवासाला लागतोय 40 मिनिटांचा वेळ, विद्यार्थ्यांचे हाल‎

कन्नड आणि खुलताबाद तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या गावांना जोडणारा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील थेट अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग अशी ओळख असलेला राज्य महामार्ग क्रमांक ३९ म्हणजेच अमळनेर-नाग द-कन्नड-गल ्लेबोरगाव-देवगाव रंगारी-लासूर स्टेशन ते कायगाव टोका हा रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर जागोजागी जीवघेणे खड्डे पडले असून डांबरीकरण पूर्णपणे उखडून गेले आहे. गेल्या १५ ते…

Read More

बोरगाव चकल्यात संत ज्ञानेश्वर महाराज माउली पालखीचा पहिला रिंगण सोहळा:भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी; दीड दिवसाचा मुक्काम‎

तालुक्यातील आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज माउली यांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा शुक्रवारी बीड जिल्ह्यातील शिरूर येथील बोरगाव चकल्यात पार पडला. पालखीप्रमुख ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराज माउली, माता रुक्मिणी व पिता विठ्ठलपंत यांच्या पालखी रथ सोहळ्याचे शुक्रवारी संत वामनभाऊ महाराजांची जन्मभूमी असलेल्या बोरगाव चकला येथे अभूतपूर्व…

Read More

पाडळी ग्रामस्थांचे पैठणच्या पंचायत समितीसमोर ‘ढोल बजाव’ आंदोलन:रोजगार हमी योजनेंतर्गत घरकुले, विहिरीची थकीत बिले देण्याची मागणी ‎

रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेली घरकुले, सिंचन विहिरी आणि गाय गोठ्यांची कामे पूर्ण करूनही गेल्या दोन वर्षांपासून हक्काचा मोबदला न मिळाल्याने पैठण तालुक्यातील पाडळी-गाजीपूर येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून, शुक्रवारी पंचायत समिती येथे ढोल बजाव आंदो . काम पूर्ण होऊन दोन वर्षे उलटली, तरी बिले थकीत असल्याने लाभार्थ्यांची कोंडी झाली आहे. याबाबत पंचायत समितीकडे वारंवार…

Read More