टंचाई कायम:हरसुलला खतांसाठी पहाटेपासून रांगा, बफर स्टॉक सर्वसामान्यांना खुला करण्याची मागणी
या आदिवासीबहुल परिसरामध्ये भात लागवडीच्या ऐन हंगामात खतांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. खत मिळवण्यासाठी पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला. दिवसभरात कृषी विभागाच्या मध्यस्थीनंतर सहकारी संस्था व खत विक्रेत्यांना ६८३ गोणी खताचे वाटप करण्यात आले असले, तरी परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आहे. सहकारी संस्थेत केवळ सभासदांनाच खत दिले जात असल्याने सर्वसामान्य शेतकरी खासगी विक्रेत्यांवर अवलंबून…