Headlines

तीस दिंड्या अन् हजारो वारकऱ्यांसह ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याला सुरुवात:नेवाशातून पालखी सोहळा मार्गस्थ, नेवासेत पहिला रिंगण सोहळा‎

संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या श्रीक्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पायी पालखी दिंडीचे बुधवारी पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. शासनाची अधिकृत मान्यता मिळाल्यानंतरचा हा पहिलाच पालख . दिंडीचे नेतृत्व ज्ञानेश्वर मंदिराचे देविदास महाराज म्हस्के, ह.भ.प. रामभाऊ राऊत आणि राम महाराज झिंजुरके यांनी केले. प्रस्थानापूर्वी माऊलींच्या पादुकांचे व पैस खांबाचे पूजन भास्करगिरीजी…

Read More

‘चिखलाचा तुडवीत रस्ता, शाळेकडं चल गं माझ्या सखी…’,:केडगावच्या महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाच्या मुलींची व्यथा निबंध स्वरूपात मांडण्याचा हा प्रयोग‎

माझ्या शाळेचा रस्ता म्हणजे केवळ एक पाऊलवाट नसून, माझ्या स्वप्नांचा आणि रोजच्या संघर्षाचा एक चिखलमय प्रवास आहे. जेव्हा उन्हाळ्याच्या दोन महिन्यांच्या सुट्या होत्या, तेव्हा आमची मनपा शांत बसली. पण जसा पावसाळा लागला आणि शाळा सुरू झाली, तसे मनपाने आमच्या केडगाव उपनगरात रस्त्याचे काम हाती घेतले. महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्ता काँक्रिटसाठी खोदून ठेवला….

Read More

जीर्ण इमारत अन् सुरक्षेचाच खोळंबा; जामखेडचे कारागृह कायमस्वरूपी बंद:62 कैद्यांना नाशिक जेलमध्ये हलवले; कारागृहाबाहेर नातेवाईकांची गर्दी

इमारतींची अत्यंत जीर्ण झालेली अवस्था, सुरक्षेचे गंभीर प्रश्न आणि राज्यातील इतर कारागृहांतून कैदी पळून जाण्याच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत राज्य शासनाने अखेर जामखेडचे दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शासनाच्या आदेशानुसार गुरुवारी, ९ जुलै रोजी जामखेडमधील सर्व ६२ आरोपींना कडेकोट पोलिस बंदोबस्तात नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात (सेंट्रल जेल) स्थलांतरित करण्यात आले….

Read More

अर्शद वारसीने मरणासन्न आईला पाजले नाही पाणी:आजही पश्चात्ताप करतात, कधी लिपस्टिक विकली, 'सर्किट'च्या यशाची अपेक्षा नव्हती

14 वर्षांच्या वयात अर्शद वारसी यांनी असे दुःख पाहिले, ज्यामुळे ते वेळेआधीच मोठे झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आईला पाणी दिले नव्हते आणि काही तासांनंतर त्यांचे निधन झाले. या गोष्टीची खंत त्यांना आजही आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आणि त्यांना शाळा सोडावी लागली. त्यांनी बसमध्ये आणि घरोघरी जाऊन लिपस्टिक विकली, फोटो लॅबमध्ये नोकरी…

Read More

गैरव्यवहाराच्या मुद्द्यांनी चांदवडची सभा वादळी:शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांना भाजपमधील काही नगरसेवकांचाही पाठिंबा‎

नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष वैभव बागुल यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडली. तब्बल पाच तास चाललेली ही सभा शिवसेना नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या भंगाराच्या कथित गैरव्यवहारासह घनकचरा व्यवस्थापनातील अनियमिततेच्या प्रश्नांवरुन गाजली. या मुद्द्यांवर भाजपातील काही नगरसेवकांनीही पाठिंबा दिल्याने या मुद्यांवर उत्तरे देताना प्रशासनाला विविध प्रश्नांना सामोरे जावे लागले. सभेत विविध ६५ विषयांवर चर्चा होऊन…

Read More

दिव्य मराठीच्या वृत्ताची दखल:खादगाव–गवारे वस्ती रस्ता; लोकप्रतिनिधींकडून पाहणी, गावकऱ्यांनी मानले आभार‎

खादगाव ते गवारे वस्ती घोडेगाव या तीन किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘ दिव्य मराठी’मध्ये वृत्त प्रकाशित होताच स्थानिक लोकप्रतिनिधींनी या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या ५ ते ७ वर्षांपासून या रस्त्यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला जात होता. मात्र, प्रशासनाकडून दाद न मिळाल्याने आणि पावसामुळे रस्त्यावर प्रचंड चिखल झाल्याने २०० हून अधिक शेतकऱ्यांचे हाल…

Read More

सिल्लोडमध्ये ‘एक विद्यार्थी, एक झाड’ उपक्रम:10 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प, ‘वृक्षवल्ली टीम सिल्लोड’च्या वतीने श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात उपक्रम‎

वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज बनली आहे. समाजातील प्रत्येक घटकाने केवळ झाड न लावता त्याचे संगोपन करणे आवश्यक आहे, याच उद्देशाने येथील ‘वृक्षवल्ली टीम सिल्लोड’च्या वतीने १०,००० वृक्ष लागवडी . कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजनाने झाली. या प्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक निशांत म्हस्के होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून…

Read More

लासूरगावच्या शिवना नदीवरील पुलावर खड्डे, पाणी तुंबल्यामुळे अपघाताचा धोका:शिवना नदीच्या पुलावरील लोखंडी कठडे तुटले, तात्काळ दुरुस्तीची मागणी‎

लासूरगाव (ता. वैजापूर) येथील शिवना नदीवरील पुलाची अत्यंत दुरवस्था झाली असून, पुलावर पडलेले खड्डे आणि तुटलेले लोखंडी कठडे यांमुळे प्रवास जीवघेणा ठरत आहे. काही दिवसांपूर्वी शिवना नदीला आलेल्या पुराचे पाणी पुलावरून गेल्याने पुलाची अवस्था अत्यंत वाईट झाल . शिवना नदीवरील पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. सार्वजनिक…

Read More

पिंपळवाडी येथे मुर्डेश्वर-पैठण पायी दिंडीचे भक्तिमय स्वागत:सलग 14 व्या वर्षी दिंडीचा पंढरीकडे प्रवास‎

श्री संत शांतिब्रह्म एकनाथ महाराज पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या श्रीक्षेत्र मुर्डेश्वर-पैठण पायी दिंडी क्रमांक १२ चे पिंपळवाडी (पिराची परिसर) येथे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने स्वागत केले. घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढून, पुष्पवृष्टी करत आणि विठ्ठलनामाच्या गजरात दिंडीचे स्वागत करण्यात आल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. या वेळी दिंडीचे चालक-मालक ओंकारगिरीजी महाराज (मुर्डेश्वर संस्थान)…

Read More

कांद्याच्या भावामध्ये आठ दिवसांत 500 रुपयांची वाढ‎:पैठण बाजार समितीत 3,308 क्विंटलची आवक; 1,600 ते 2,200 रुपयांपर्यंत मिळाला दर‎

गेल्या काही महिन्यांपासून कमी दरामुळे अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला असून, अवघ्या आठ दिवसांत कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल ५०० रुपयांची वाढ झाली आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये कांद्याची मागणी वाढल्यामुळे पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे महिन्यांपासून साठवून ठेवलेला कांदा विक्रीसाठी बाजारात आणण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली असून, बाजार समिती…

Read More