MP-बिहारमध्ये वीज पडून 8 जणांचा मृत्यू:उत्तराखंडमध्ये राफ्टिंगवर बंदी; IMD चा जुलैमध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज
मध्य प्रदेशात मान्सून सक्रिय होताच वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढला आहे. हरदा आणि खरगोनमध्ये वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाला, तर बैतूलमध्ये एकाच कुटुंबातील चार जण जखमी झालेत. चंपा नदीला आलेल्या पुरात दुचाकीसह दोन तरुण वाहून गेले. बिहारमध्येही वीज पडून 5 जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे मंगळवारी सायंकाळी 4 वाजता पिकनिकसाठी गेलेले 3…