Headlines

SUV उंटाला धडकून 5 वेळा उलटली, मेजरचा मृत्यू:एक महिन्यापूर्वी लग्न झाले होते, आर्मी स्टेशनजवळ अपघात, 2 लेफ्टनंट जखमी

जैसलमेरमध्ये लष्कराची टाटा सफारी उंटाला धडकून चार ते पाच वेळा उलटली. या अपघातात एसयूव्ही चालवणारे लष्कराचे मेजर हमजा आरिफ (२६) यांचा मृत्यू झाला. गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजता शहरापासून सुमारे १८ किलोमीटर दूर असलेल्या थईयात येथे झालेल्या अपघातात कारमधील २ लेफ्टनंटही गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. तिन्ही जखमींना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले….

Read More

भरत एन्काउंटर: पहिली गोळी झाडणारा STF जवान अटक:बिहार मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर 6 दिवसांनी कारवाई; आत्मसमर्पणानंतर 5 गोळ्या झाडल्याचा आरोप

बिहारमधील भोजपूर येथील भरत तिवारी एन्काउंटर प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर गोळीबार करणाऱ्या बिहार एसटीएफ जवान अक्षय कुमारला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. भरत तिवारीचा एन्काउंटर १७ जून रोजी झाला होता. त्याची आई आशा देवी यांनी अक्षय कुमारवर हत्येचा आरोप केला होता. पोलिसांनी आरोपी जवानाला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे….

Read More

भंडारदरा धरणाच्या पाण्यावर पहिला हक्क अकोलेकरांचाच:घडामोड शेती व पिण्यासाठी मुबलक पाणी मिळायला हवे- आ. लहामटे

तालुक्यातील धरणे भरली हा आनंदाचा क्षण आहे. मात्र भंडारदऱ्यातील पाण्यावर पहिला हक्क हा अकोले तालुक्याचाच राहिला पाहिजे. तालुक्यातील जनतेला पिण्यासाठी आणि शेतीसाठी मुबलक पाणी मिळालेच पाहिजे. हा आमचा घटनात्मक आणि नैसर्गिक अधिकार आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले. प्रवरेवरील भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या पूर्ण क्षमतेने भरल्याने गुरुवारी सकाळी जलाशयावर आमदार डॉ. लहामटे यांच्या…

Read More

हिंगोलीत 30 पैकी 27 मंडळात अतिवृष्टी:नदी, नाल्यांना पूर; सेनगावात पुलावरून कार वाहून गेली, चौघे बचावले

हिंगोली जिल्ह्यात मागील २४ तासात झालेल्या धुवाधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला असून कयाधू नदीच्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात मागील चोविस तासात ३० पैकी तब्बल २७ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सेनगाव तालुक्यातील रामप्रसादनगर भागात पुराच्या पाण्यात कार वाहून गेली. मात्र सुदैवाने कार मधील चौघेही बालंबाल बचावले आहे. हिंगोली जिल्हयाला पावसाचा रेड अलर्ट…

Read More

15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अहिल्यानगरमध्ये पावसाची हजेरी:चार तास रिमझिम सरी; जिल्ह्यात 60 दिवसांत 213 मिमी पाऊस

गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असलेल्या अहिल्यानगर शहरासह परिसरात गुरुवारी पावसाने हजेरी लावली. तब्बल चार तास रिमझिम सरी सुरू होत्या. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ०.८ मिमी पावसाची नोंद झाली. जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात २१३ मिमी पाऊस झाला. यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीला पावसाने मोठी ओढ दिली होती. जूनच्या पहिल्या १८ दिवसांत केवळ ३१ मिमी पाऊस झाला होता….

Read More

बँक काय तुमच्या बापाची आहे का?:शेतकऱ्यांना अरेरावी करणे बँक मॅनेजरला महागात, 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्यक्षाने लगावली कानशिलात

कर्जमाफी योजनेची विचारपूस करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांशी उद्धट वर्तन करत “बँक काय तुमच्या बापाची आहे का?” अशी अरेरावीची भाषा करणाऱ्या बँक मॅनेजरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षाने थेट बँकेतच कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत हा खळबळजनक प्रकार घडला असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड…

Read More

हिंगोलीकरांना दिलासा:शहरात कयाधू नदीचे खोलीकरण झाल्याने पुराचा धोका कमी

हिंगोली शहरालगत कयाधूू नदी पात्राचे खोलीकरण झाल्यामुळे मागील चोविस तासात झालेल्या मुसळधार पावसातही परिसरातील पुराचा धोका कमी झाल्याने नागरीकांना काहीप्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. या शिवाय नदीच्या पात्रात पाणी साठवणुकीत वाढ झाल्याचे चित्र आहे. हिंगोली शहरालगत कयाधू नदी वाहते. या नदीचे पात्र उथळ असल्याने पडलेला पाऊस वाहून जातो या शिवाय खोलीकरणा अभावी अरुंद झालेल्या…

Read More

मनोज जरांगेंवर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही:राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही, फडणवीसांबाबतचा गैरसमज दूर झाल्याचाही दावा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर आणि कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी भाजपवर केलेल्या ‘धमकी व ऑफर’च्या दाव्यावर राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली आहे. “सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतले असून अंमलबजावणीचा विस्तृत अहवाल जरांगेंना पाठवला जात आहे, त्यामुळे त्यांच्यावर आंदोलनाची वेळ…

Read More

50 फूट पाण्यात बिबट्याचा ‘जीवनसंघर्ष’:वांजुळपोईत 100 फुटांच्या‎विहिरीत पडला; पाईपच्या‎ आधाराने वाचला‎

राहुरी तालुक्यातील वांजुळपोई शिवारात दादासाहेब नाना कोळपे यांच्या शेतातील सुमारे १०० फूट खोल व ५० फूट पाणी असलेल्या विहिरीत बिबट्या पडल्याचे गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास निदर्शनास आले. या घटनेची माहिती परिसरात पसरताच शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी उशिरा घटनास्थळी पोहोचून बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले. वांजुळपोई परिसरात यापूर्वीही अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले…

Read More

अल्पवयीन मुलीवर अत्याचार:51 वर्षीय नराधमाला अटक

अल्पवयीन मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या एका तासात आरोपीला अटक केली. विठ्ठल मुरलीधर फरतारे (वय ५१, रा. मोहोज देवडे, ता. पाथर्डी, सध्या रा. पारनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. २९ जुलै रोजी पीडित मुलीच्या…

Read More