Headlines

Maharashtra Zilla Parishad Election 2026; 50 Percent Reservation Impact

राज्यात गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा पाळून निवडणुका घेण्याची पूर्ण तयारी दर्शवली आहे. त्य . 50% आरक्षणाच्या मर्यादेमुळे जागांच्या समीकरणात बदल 50 टक्क्यांची घटनात्मक मर्यादा ओलांडली गेल्यामुळे राज्यातील 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडल्या होत्या….

Read More

जंतर-मंतरवर जखमी पोलिसांच्या कुटुंबीयांची पत्रकार परिषद:म्हणाले- पोलिसांविरुद्ध चुकीचे नॅरेटिव्ह केले, वडील घरी आले तेव्हा गणवेश रक्ताने लाल झाला होता

दिल्ली पोलीस आणि सुरक्षा दलांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर-मंतरवरील आंदोलनावर आणि २० जुलै रोजी संसद मार्चमध्ये झालेल्या हिंसाचारावर आपली बाजू मांडली. एका पोलीस जवानाची मुलगी गुंजन म्हणाली, ‘माझे वडील आघाडीवर होते. ते जेव्हा घरी यायचे, तेव्हा म्हणायचे की हे आता विद्यार्थ्यांचे आंदोलन राहिले नाही, यात चुकीचे लोक सामील झाले…

Read More

सहकार मंत्र्यांच्याच जिल्ह्यात सावकारांचा सुळसुळाट, पण खात्याला माहितीच नाही!:अवैध सावकारकीसह मायक्रो फायनान्सवरून बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल

“अवैध सावकारकी आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी गोरगरीब व शेतकऱ्यांची अक्षरशः लूट चालवली आहे. अनेक जण जामीनदार झाले म्हणून कोट्यवधींच्या जमिनी सावकारांनी बळकावल्या आहेत. हा प्रकार एकाच जिल्ह्यात नव्हे, तर राज्याच्या सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर सुरू असूनही खात्याला किंवा मंत्र्यांना याची साधी माहितीच नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे,” असा जोरदार हल्लाबोल शिवसेना आमदार बच्चू कडू…

Read More

नीतीश भारद्वाज यांनी रणबीर कपूरला दिला सल्ला:रामायणाचा ट्रेलर पाहिल्यानंतर म्हणाले- कृपया आपल्या वाणीला आता आणखी प्रदूषित करू नका

टीव्ही सीरियल ‘महाभारत’मध्ये भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज यांनी गुरुवारी नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाच्या ट्रेलरवर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX), कलाकारांच्या अभिनयाची आणि संगीताची प्रशंसा करत रणबीर कपूरला सल्ला दिला. नितीश भारद्वाज यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘रामायण’चा ट्रेलर शेअर करत लिहिले, सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटासाठी हे 100% ऑस्करचे हक्कदार आहे….

Read More

संजय राऊत यांचा चंद्रकांत पाटलांना टोला:दगडावरील हातांचे ठसे आधारशी लिंक करण्याच्या शोधाबद्दल विज्ञानाचे नोबेल द्या, शहांच्या हस्ते टिळक पुरस्कार देण्यासही विरोध

“दगडावरचे हातांचे ठसे घेऊन ते आधार कार्डला लिंक केले जातील, हा चंद्रकांत पाटील यांनी लावलेला शोध अत्यंत मोठा आहे. अशा प्रकारचा शोध आतापर्यंत कोणीही लावला नव्हता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला शिफारस करून चंद्रकांत पाटील यांना या वर्षीचा विज्ञान व संशोधनातील ‘नोबेल पुरस्कार’ द्यायला हवा,” असा खोचक टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे…

Read More

साईचरणी 4.21 लाखांची सोनसाखळी:गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता, दहीहंडी फोडून उत्सवाचा भक्तिमय समारो

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने २८ जुलैपासून सुरू असलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाची गुरुवारी भक्तिमय वातावरणात सांगता झाली. वेदश्री वैभव ओक यांच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी साईभक्तांनी उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घेतला. सांगता दिनी सकाळी ६.५० वाजता संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व त्यांच्या पत्नी वैशाली दराडे यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा…

Read More

आत्मबुद्धी जागृत करण्यासाठी अखंड नामस्मरण आवश्यक:हभप गंगाधर महाराज झाडे यांचे प्रतिपादन, हरिनाम सप्ताहाची सांगता‎

“परमेश्वराचा अंश प्रत्येक प्राणीमात्रामध्ये आहे. मात्र त्या परमसत्याची जाणीव करून घेण्याची बुद्धी केवळ मनुष्याला लाभली आहे. जीव हा मुळात परमेश्वरस्वरूपच असल्यामुळे स्वतःची खरी ओळख करून घेण्यासाठी नामस्मरणाशिवाय दुसरा कोणताही सहज आणि शाश्वत मार्ग नाही. देह, अहंकार, मोह आणि मायेच्या पाशात अडकलेल्या मनाला मुक्त करण्याचे सामर्थ्य केवळ भगवंताच्या नामात आहे. देहबुद्धीचा विसर पडून आत्मबुद्धी जागृत व्हावी,…

Read More

टाळ-मृदंगाचा निनाद अन् विठूनामाचा गजर:गुरुपौर्णिमेनिमित्त बालदिंडी सोहळा!

कर्नल परब संचलित सनबीम्स प्री-प्रायमरी शाळेच्यावतीने गुरुपौर्णिमेनिमित्त बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीच्या माध्यमातून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा उत्साह, टाळ-मृदंगाचा निनाद आणि ‘विठ्ठल… विठ्ठल…’च्या अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला सर्वोच्च स्थान असून विद्यार्थ्यांच्या मनात गुरुंचे महत्त्व लहानपणापासूनच रुजावे तसेच गुरुजनांविषयी आदर, कृतज्ञता आणि…

Read More

गणितीय कौशल्य, बौद्धिक क्षमता विकसित करणे आवश्यक:आमदार अमोल खताळ यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचार, गणितीय कौशल्य आणि बौद्धिक क्षमता विकसित करणे ही काळाची गरज आहे. एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीने गेल्या ४३ वर्षांपासून अबॅकसच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण केली आहे. ५० व्या राष्ट्रीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन ही केवळ स्पर्धा नसून भारतीय शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी चळवळ आहे, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ…

Read More

वर्ध्यात मध्यरात्री थरार:पुरात वाहून गेलेल्या तरुणाला झाडाने दिले जीवदान; रात्रभराच्या थरारानंतर पहाटे सुखरूप बचाव

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात गुरुवारी रात्री एक अंगावर काटा आणणारी थरारक घटना घडली. अल्लीपूर-टाकली मार्गावरील यशोदा नदीला आलेल्या पुरात अक्षय माटे नावाचा तरुण अचानक पाण्याच्या वेगात वाहून गेला. पुराच्या प्रचंड वेगामुळे तो तब्बल १५० ते २०० मीटर अंतरापर्यंत वाहून गेला, मात्र प्रसंगावधान राखत त्याने एका मोठ्या झाडाला घट्ट पकडले आणि त्यावर चढून स्वतःचे प्राण वाचवले….

Read More