धीरेंद्र शास्त्रींचा दावा- ऑक्सिजन बंद होऊनही मुलगा वाचला:नागपुरात ‘चमत्कारा’च्या दाव्यावरून नवा वाद
वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुन्हा एकदा नव्या वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर सुरू असलेल्या रामकथा कार्यक्रमादरम्यान ‘दिव्य दरबार’मध्ये त्यांनी एका गंभीर आजाराने ग्रस्त बालकाचा जीव “चमत्काराने” वाचल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती (ANIS) आक्रमक झाली असून, त्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. कार्यक्रमात बोलताना शास्त्री यांनी…